भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, (जिमाका) दि.
11 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात
प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजना सुरु केलेली आहे. योजनेंतर्गत यापुर्वी दिलेल्या मुदतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना
अर्ज भरता आले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज
ऑनलाईन पोर्टलद्वारे स्विकारण्यात आलेले आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित
आहेत. योजनाचे ऑनलाईन अर्ज भरण्याची व भरलेल्या अर्जाची प्रत आवश्यक सर्व कागदपत्रांसह
जमा करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत होती. तथापि योजनेची व्याप्ती तालुका स्तरापर्यंत
असल्यामुळे विहित मुदतीत अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे शासनाने
15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांनी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे,
असे आवाहन सहाय्यक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.
> बँक तपशिलही विद्यार्थ्यांनी द्यावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज
यापुर्वी अनेक विद्यार्थ्यांनी भरले आहेत, त्यांनी सुध्दा बँक तपशिल भरण्यासाठी विद्यार्थी
लॉगीनमध्ये नवीन टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी
बँक तपशिल भरुन अर्ज करावा. अन्यथा सदर योजनेचा लाभ दिल्या जाणार नाही, यांची नोंद
घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना अर्जाची सद्य:स्थिती त्यांच्या लॉगीनमध्ये आयडी व पासवर्ड
वापरुन पाहता येणार आहे.
0000000
Comments
Post a Comment