Tuesday 10 December 2019

DIO BULDANA NEWS 10.12.2019

राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथालयांना असमान निधी योजनेतून अर्थसहाय्य
·        20 डिसेंबर 2019 पर्यंत ग्रंथालयांनी अर्ज करावे
बुलडाणा, दि.१० :  भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2019-20 साठी असमान निधी योजनेतंर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.     
         ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य,  राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, ५०,६०, ७५, १००, १२५ आणि १५० वे महोत्सवी वर्ष असल्यास हे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य आणि बाल ग्रंथालय व राजा राममोहन ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य या योजनेतून देण्यात येते. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
   या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी संकेतस्थळावर संपर्क साधावा. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहीत मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २० डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    *****
मनरेगातंर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदासाठी अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि.१० :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत  मजुर, योजनेचे लाभार्थी व सामान्य नागरिक यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व योजनेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायीत्व व सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 कलम 27 (1) अंतर्गत जिल्हास्तरावर तक्रार निवारण अधिका-याची (ombudsman) नियुक्ती करण्यासाठी  ईच्छुक व्यक्तीकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.
      या पदासाठी अर्ज करणा-या व्यक्तीस लोकप्रशासनाचा, कायद्याचा , सामाजिक कार्य, शैक्षणिक किंवा व्यवस्थान क्षेत्रातला किमान 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदव्युत्तर Post Graduate), संगणकीय ज्ञान असणारा (किमान एमएससीआयटी असावा, त्याव्यक्तीचा राजकीय पक्षाशी कोणत्याच प्रकारचा संबध नसावा, सदर व्यक्ती शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व सक्षम असावी, अतिदूर भागात दौरे , निरीक्षणे करण्यास सक्षम असावी, निवड होणा-या तक्रार निवारण अधिका-याची (ombudsman) चा कालावधी 2 वर्षाचा राहणार असून या अधिका-याचे मुख्यालय जिल्हयाचे ठिकाणी राहिल व त्यास मासिक बैठक भत्ता 1 हजार रूपये प्रति बैठक या दराने (मात्र दरमहा कमाल 20 हजार रूपये एवढया मर्यादेत), तांत्रिक व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. उमेदवारांस शासन निर्देशीत करील अशा ठिकाणी स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाणी हजर रहावे लागेल.

      इच्छूकांनी सदर अर्ज ए-4 पेपरसाईज चे कागदावर, एका बाजुनेच (one side) संगणकीय टंकलीखीत केलेला असावा. सदर अर्जात अर्जकर्त्याचे पूर्ण नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक(landline), भ्रमणध्वनी (Mobile No.), ईमेल आयडी, शैक्षणीक पात्रता, सेवापुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स, अनुभवाचे सविस्तर वर्णन (शेवटी कार्यरत कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी आदींसह), कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधीत नसल्याचे व कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र, फिटनेस (Fitness)बाबत वैद्यकीय दाखला,पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रांसह अर्ज दि.30 डिसेंबर 2019 पुर्वी कार्यालयीन दिवशी दु 1 वाजता पावेतो जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा), बुलडाणा येथे समक्ष सादर करावा. सोबत शैक्षणीक पात्रतेच्या, अनुभवा संबधीत सर्व कागदपत्र, सेवापुस्तक पहिल्या पानाची झेरॉक्स स्वसाक्षांकीत करुन जोडावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****
वैश्विक आरोग्य संरक्षण दिनानिमित्त 12 डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर
·        शेगांव, लव्हाळा ता. मेहकर, सावळा ता. बुलडाणा व दाताळा ता. मलकापूर येथे आयोजन
बुलडाणा, दि.१० :  जिल्ह्यामध्ये वैश्विक आरोग्य संरक्षण दिनाचे औचित्य साधून गुरूवार, १२ डिसेंबर २०१९ रोजी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर अंगीकृत रूग्णालयांमार्फत सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रूग्णालय शेगांव, लव्हाळा ता. मेहकर, दाताळा ता. मलकापूर, सावळा ता. बुलडाणा येथे आरोग्य शिबिरे होणार आहेत.
   शेगांव येथे सामान्य रूग्णालय खामगांव, जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालय शेगांव, माऊली डायलीसीस सेंटर शेगांव आणि सिल्वरसिटी हॉस्पीटल खामगांव हे अंगीकृत रूग्णालये आरोग्य शिबरात सहभाग घेणार आहेत. तसेच ग्रामपंचायत लव्हाळा ता. मेहकर येथे होणाऱ्या शिबिरात तुळजाई हॉस्पीटल चिखली व मेहकर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर सहभागी होणार आहेत. ग्रामपंचायत दाताळा ता. मलकापूर येथे शिबिरात चोपडे हॉस्पीटल मलकापूर व सिटी हॉस्पीटल बुलडाणा सहभागी होवून रूग्णसेवा देणार आहेत. ग्रामपंचायत सावळा ता. बुलडाणा येथील शिबिरात अमृत हृदयालय आणि सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल बुलडाणा व मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा सहभागी असणार आहेत.
    आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या मदतीने संबंधित केंद्रांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व गावांमधील आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांचे कार्ड तयार करून घेण्यात यावे. जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे शक्य होणार आहे.  तरी लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
                                                आयुष अभियानातंर्गतही १६ डिसेंबर रोजी शिबिराचे आयेाजन
आयुष अभियान अंतर्गत सर्व जनतेसाठी मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन १६ डिसेंबर २०१९ रोजी आयुष कक्ष, जिल्हा रूग्णालय बुलडाणा येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिरात आयुर्वेदीक, युनानी होमीओपॅथी, योग व निसर्गोपचार पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे.   गरजु रूग्णांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                        *****

दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन मेळावा उत्साहात
बुलडाणा, दि. 10 : स्थानिक गर्दे वाचनालय सभागृहात 9 डिसेंबर 2019 रोजी दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन मेळावा व नोंदणी अभियानाचे आयोजन नगर परिषद बुलडाणा, दिव्यांग कल्याण केंद्र,  संत गाडगेबाबा अपंग कल्याण व पुर्नवसन संस्था यांच्या सहभागाने करण्यात आले.  हा मेळावा उत्साहात पार पडला.  या मेळाव्यामध्ये दिव्यांगांना एस.टी.पास,  रेल्वे पास, असमर्थ दाखला आदींचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान दिव्यांग कल्याण केंद्र बुलडाणा यांच्या वतीने दिव्यांग वधु-वर नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राअंतर्गत अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर दिव्यांगांची नोंदणी करुन लग्न जुळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. या कार्यक्रमात उपक्रमाची घोषणा केल्यानंतर एका दिव्यांग जोडप्याचे मान्यवरांच्या शुभआशिर्वादाने लग्नही  लावण्यात आले.  नगर परिषदेच्यावतीने या जोडप्याला शुभेच्छा म्हणुन नगर परिषदेचे उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी 11 हजार रूपये नगर पालिकेच्या फंडातुन आर्थिक सहाय्य देण्याचे घोषित केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले. ते म्हणाले, दिव्यांग कल्याण केंद्र नगर परिषद च्या माध्यमातुन शहरातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी करुन शासनाच्या विविध योजना एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी दिव्यांग कल्याण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.पा उपाध्यक्ष विजय जायभाये होते.  उद्घाटक म्हणून  जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित उपस्थित होते.  एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री. रायवलकर, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन,  कुणाल गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी दिव्यांगांना शासकिय योजनांविषयी मार्गदर्शन केले.  बुलडाणा नगर परिषदेचे नगर सेवक उमेश कापुरे, मंदार बाहेकर आणि विविध अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते.
    दिव्यांग लाभार्थ्यांना नगर परिषद बलडाणा च्या माध्यमातुन विविध प्रकारची मदत दरवर्षी करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी नगर परिषद नेहमीच आपल्यासोबत राहील असे आवाहन विजय जायभाये यांनी केले.  संचालन रमेश आराख यांनी तर,आभार प्रदर्शन कर निरीक्षक स्वाती तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  न.प. व्यवस्थापक महेंद्र सौभागे यांनी प्रयत्न केले, असे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        *******

--

Monday 9 December 2019

DIO BULDANA NEWS 9.12.2019

संत जगनाडे महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि.९ – जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्ताने ८ डिसेंबर २०१९ रोजी अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  तसेच उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे, नायब तहसिलदार श्री. अहीरे आदी उपस्थित होते.
                                                                        *****
  शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू व  तांदूळ धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणादि‍ 9 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जानेवारी 2020 चे नियतनातील एपीएल केशरी शिधा पत्रीकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना गहू व तांदूळाची  भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण गहू 2 रूपये प्रति किलो प्रति लाभार्थी 4 किलो,  तांदूळ 3  रूपये प्रतिकिलो प्रति लाभार्थी  1 किलो आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 1474 व तांदूळ  368  क्विंटल, बुलडाणा : गहू 975 व  तांदूळ 244,  दे.राजा गोदामाकरीता गहू 932 व तांदूळ 233, अमडापूर : गहू 320 व तांदूळ 80,   मोताळासाठी गहू 776 व तांदूळ 194, नांदुरासाठी गहू 1256 व तांदूळ 314, खामगांव गोदामकरीता गहू 1177 व तांदूळ 293, शेगांवकरीता गहू 1088 व तांदूळ 272, जळगांव जामोदकरीता गहू 1051 व तांदूळ 263, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 784 व तांदूळ 196, मेहकरसाठी गहू 1202 व तांदूळ 301, लोणारकरीता गहू 1215 व तांदूळ 304 क्विंटल, सिंदखेड राजाकरीता गहू 1108 व तांदूळ 277 क्विंटल, मलकापूर : गहू 935 व तांदूळ 234, साखरखेर्डा : गहू 493 व तांदूळ 123 आणि डोणगांवकरीता गहू 494 व तांदूळ 124 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 15280 व तांदूळ 3 हजार 820 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
****
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणादि‍ 9 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना  जानेवारी 2020 चे नियतनातील गहू व तांदूळाची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 डिसेंबर  2019 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण हे तांदूळ 3 किलो प्रति लाभार्थी असून वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो आहेत. तसेच तांदुळासाठी 3 रूपये प्रतिकिलो दर व परिमाण 2 किलो प्रति लाभार्थी आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 4268  क्विंटल व तांदूळ  2846, बुलडाणा : गहू 5026 क्विंटल व तांदूळ 3351,  दे.राजा गोदामाकरीता गहू 2087 क्विंटल व तांदूळ 1392, अमडापूर : गहू 1387 व तांदूळ 925, मोताळासाठी गहू 2959 व तांदूळ 1973, नांदुरासाठी गहू 2997 व तांदूळ 1998, खामगांव गोदामा करीता गहू 5464 व तांदूळ 3643,  शेगांवकरीता गहू 2631 व तांदूळ 1754जळगांव जामोदकरीता गहू 2747 व तांदूळ 1832, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2556 व तांदूळ 1702, मेहकरसाठी गहू 3721 व तांदूळ 2481, लोणारकरीता गहू 2471 व तांदूळ 1648, सिंदखेड राजाकरीता गहू 1667 व तांदूळ 1112, मलकापूर : गहू 3017 व तांदूळ 2011, साखरखेर्डा : गहू 1265 व तांदूळ 844 आणि डोणगांवकरीता गहू 1317 व तांदूळ 878 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 45580 तांदूळ 30390 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ********
 अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि‍ 9 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जानेवारी 2020 चे नियतनातील अंत्योदय योजने करीता गहू व तांदूळाची  भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 डिसेंबर 2019 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो व  तांदूळ 3  रूपये प्रतिकिलो आहे. तर परिमाण प्रति कार्ड 15 किलो गहू व तांदुळ 20 किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 514 क्विंटल व तांदूळ 685, बुलडाणा : गहू 1050  क्विंटल व तांदूळ  1399,  दे.राजा गोदामाकरीता गहू 427 क्विंटल व तांदूळ 569, अमडापूर : गहू 175  क्विंटल व तांदूळ 233,  मोताळासाठी गहू 882  क्विंटल व तांदूळ  1174, नांदुरासाठी गहू 912 क्विंटल व तांदूळ  1215, खामगांव गोदामकरीता गहू 755 क्विंटल व तांदूळ 1007, शेगांवकरीता गहू 456 क्विंटल व तांदूळ  608जळगांव जामोदकरीता गहू 757 क्विंटल व तांदूळ 1008, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 913 क्विंटल व तांदूळ 1217, मेहकरसाठी गहू 635  क्विंटल व तांदूळ  846, लोणारकरीता गहू 975 क्विंटल व तांदूळ 1299, सिंदखेड राजाकरीता गहू 418 क्विंटल व तांदूळ 558, मलकापूर : गहू 680 क्विंटल व तांदूळ 907,  साखरखेर्डा गहू 232 क्विंटल व तांदूळ  309 आणि डोणगांव करीता गहू 199  क्विंटल व तांदूळ 266  क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 9980 व तांदूळ 13 हजार 300 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ********
फिट इंडिया मुव्हमेंट क्रीडा सप्ताहाचे आयोजन
·        12 ते 18 डिसेंबर दरम्यान चालणार सप्ताह
बुलडाणा,दि‍ 9 - महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, या दृष्टीने शासन निर्णयान्वये दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत प्रतिवर्षी क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येतो. तसेच
समाजातील प्रत्येक नागरीकांच्या शारीरिक स्वास्थ्याकरीता व्यायाम करावा, अथवा खेळामध्ये भाग घ्यावा व प्रकृती स्वास्थ्य राखावे, याकरीता केंद्र शासनामार्फत फिट इंडीया मुव्हमेंट कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
   फिट इंडीया मुव्हमेंट अधिक प्रभावी राबविण्यासाठी क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने शाळांमध्ये विविध खेळांचे आयोजन दि. 12 ते 18 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रभावीपणे राबविण्याकरीता  5 डिसेंबर रोजी  जिल्हा क्रीडा संकुल, बुलडाणा येथे सभेचे आयोजनही करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा क्रीडा अधिकारी  शेखर पाटील,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एस.टी.वराडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, तालुका संयोजक निलेश इंगळे, सुधीर मानकर, आत्माराम चांदोरे, शैलेंद्रसिंह राजपूत, प्रभाकर जाधव, पुंजाजी कोल्हे, अनिल मुलांडे, सुनील चव्हाण, राजेश सपाटे होते. तसेच प्रमोद येऊल, अनिल इंगळे, घनश्याम वरारकर, रविंद्र धारपवार आदी उपस्थित होते.
     फिट इंडीया चळवळीचा प्रारंभ यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनाला करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडीया
चळवळीद्वारे भारत आणि भारतीयांना 2022 पर्यंत तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यानुसार प्रत्येक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. फिट इंडीया चळवळीचा मुख्य उद्देश हा तंदुरुस्तीचे महत्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे हा आहे. तंदुरुस्ती हा संस्कृती व परंपरेचा भाग असुन ते पुढे नेण्यासाठी विविध मार्गाने सर्वत्र अभ्यासता येईल. संस्कृती, रितीरिवाज, सण, नृत्य, सामाजिक मेळावे, आहार पध्दती या मार्गाने तंदुरुस्तीचे विविध घटक आपण कालानुरुप सरावाने आत्मसात करु शकतो. पुरातन काळापासुन तंदुरुस्तीला पारंपारिक खेळाचे माध्यमातून शारीरिक सुदृढतेसाठी महत्व दिलेले आहे. परंतु तंत्रज्ञानातील प्रगती व आधुनिक जीवनशैली दिनक्रमामुळे आरोग्यावर
प्रतिकुल परिणाम होत आहेत.
  फिट इंडिया मोहिमेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या शाळांसाठी मानांकन तयार करण्यात आलेले आहे. मोहिमेत फ्री हँण्ड्स एक्झरसाईज, विविध मैदानी क्रीडा स्पर्धा, मनोरंजनात्मक व पारंपारिक खेळ, नृत्य, सामुहिक कवायती, प्रश्नमंजुषा, चित्रकला, खेलो इंडिया अंतर्गत शालेय स्तरावर शारीरिक क्षमता मुल्यमापन चाचण्या, आहारविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी शाळांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी,  असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****