Tuesday 20 February 2018

आजपासून इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरूवात..!

आजपासून इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरूवात..!
  • कॉपीसाठी मदत करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी
  • परीक्षा केंद्र परीसरात 144 कलम
  • संबधित विषयाच्या शिक्षकांनी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक
बुलडाणा,दि‍.20 : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच इयत्ता 12 वी ची परीक्षा उद्या 21 फेब्रुवारी 2018 पासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून परीक्षा 20 मार्च 2018 पर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी व विद्यार्थ्यांना पेपर लिहण्यासाठी भयमुक्त, शांत वातावरण राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.  
   ज्या विषयाचा पेपर असेल त्या विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राचे परीसरात उपस्थित राहणार नाही. संबधित विषय शिक्षकांनी आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पेपरचे अर्धा तास अगोदर ते पेपर संपल्यानंतर अर्धा तास पर्यंतच्या कालावधीमध्ये पुर्णवेळ उपस्थित रहावे लागणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करावयाची आहे. पेपर सुरू असलेल्या विषयाचा किंवा कोणताही विषय शिक्षक परीक्षा केंद्राचे आवारात आढळला, तसेच तोंडी उत्तरे सांगणे, सांकेतिक भाषेचा उपयोग करून परीक्षार्थींना मदत करणे असा प्रकार दिसून आला त्यांचेविरूद्ध विद्यापीठ व परीक्षा गैरप्रकार अधिनियम 1982 अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
   परीक्षा केंद्र  परीसरात सायक्लोस्टाईल, झेरॉक्स, उत्तरे असलेले कागद दिसून आल्यास संबधित केंद्र संचालकावर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे आदेशानुसार परीक्षा केंद्र परीसरात भादवि कलम 144 लागू करण्यात आली आहे.  त्यामुळे परीक्षा केंद्राजवळ पालकांनी व इतरांनी थांबू नये, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी कळविले आहे.
                                                                        *******         

जिल्हास्तर युवा पुस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. 20 :  राज्य  शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हाव, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रतीवर्षी  देण्यात येत असतो. हा पुरस्कार जिल्हयातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो. त्यानुषंगाने सदर पुरस्काराकरीता या कार्यालयाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
            सदर पुरस्काराकरीता अर्जदार युवक/युवतीचे वय 13 ते 35 वर्षापर्यंत असावे. अर्जदाराचे जिल्ह्यात सलग 5 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. व केलेल्या कार्याचे सबळ पुरावे जोडणे अनिवार्य राहील. तसेच संस्थांकरीता अर्जदार संस्था नोंदणीकृत असावी.  संस्थेचे कार्य स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. युवा व युवा विकासाचे कार्य  करणा-या संस्थांनी केलेले कार्य 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षातील ग्राह्य धरण्यात येईल.
तरी संबंधित युवा/संस्थांनी कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन घेवून विहीत नमुन्यातील आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज  28 फेब्रुवारी 2018 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावा. तसेच अधिक माहितीकरीता कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी  शेखर पाटील यांनी कळविले आहे. 
*******
     
  छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 20 :  छत्रपती शिवाजी महाराज यांना 19 फेब्रुवारी रोजी जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प वाहीले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. मारबाते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******
वृद्ध कलावंताकडून मानधनासाठी प्रस्ताव आमंत्रित
·        31 मार्च 2018 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 20 :  शासन परिपत्रकानुसार वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा वृद्ध कलावंतांना मानधनाचा लाभ देण्यात येतो. या योजनेनुसार सन 2017-18 या आर्थिक वर्षात लाभ घेवू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. याबाबत 7 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या मान्यवर वृद्ध कलावंतांनी मुळ आवश्यक कागदपत्रे संबंधित पंचायत समिती कार्यालयास दाखवून दोन छायांकित प्रतींमध्ये मानधनासाठीचे प्रस्ताव 31 मार्च 2018 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात दाखल करावे. या मुदतीनंतर आलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सर्व संबधित गट विकास अधिकारी यांनी निकषानुसार सदर अर्जाची मूळ कागदपत्रांची खात्री करून छाननीअंती पात्र प्रस्ताव 30 एप्रिल 2018 पर्यंत जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत, असे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी कळविले आहे.
                                                                                    *******
जिल्ह्यात दोन नवीन महसूल मंडळांची निर्मिती
  • जनुना व कल्याणाचा समावेश
बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यात दोन नवीन महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये खामगांव तालुक्यातील जनुना व मेहकर तालुक्यातील कल्याणा मंडळाचा समावेश आहे. जनुना महसूल मंडळातंर्गत जनुना, खामगांव ग्रामीण, जयपूर लांडे, जळका तेली व किन्ही महादेव गावांचा समावेश आहे. या मंडळाचे मुख्यालय जनुना आहे. तसेच कल्याणा महसूल मंडळातंर्गत कल्याणा, भालेगांव, नागझरी बु, सारंगपूर, चिंचोली बोरे या गावांचा समावेश असून मुख्यालय कल्याणा येथे आहे.
  महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 व शासन अधिसुचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी या महसूल मंडळांना मान्यता प्रदान केली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार उपविभागीय समितीने लोकसंख्या/खातेदार व क्षेत्रफळ यांचा विचार करून नवीन महसूल मंडळ व त्याअंतर्गत येणारे साझे सुचविले आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    ***********
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्यास मुदतवाढ
  •  28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारणार
  • विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 : राज्यात इयत्ता 10 वी नंतरच्या व इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थ्यांना  भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम योजनेनुसार वितरीत  करण्यात येते.
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2017-18 साठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यात मुदतवाढ व शासन निर्णयातील अटींमध्ये अंशत: बदल करण्यात येत आहे. सन 2017-18 विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत आहे. तसर्व स्तरावरील विद्यार्थ्यास किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. मनपा, नपा यांच्या हद्दीपासून 20 किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असणार आहे.  विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे, त्या जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांचेकडे अर्ज करू शकणार आहेत.
   या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना http://sjsa.maharashtra.gov.in व  http://www.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेला व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसह तो विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे. त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांचेकडे समक्ष अथवा टपालाद्वारे किंवा कार्यालयाच्या swadhar.swbuldhana@gmail.com इमेल आयडीवर अर्ज करू शकतात. तरी महाविद्यालयीन इयत्ता 10 वी नंतरच्या व इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अुन. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
असा आहे भोजन, निर्वाह व निवास भत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतंर्गत भोजन भत्ता, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येतो. तो पुढीलप्रमाणे : मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 32 हजार, निवास भत्ता 20000 व निर्वाह भत्ता 8000 असा एकूण 60 हजार रूपये देण्यात येतो. तसेच इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 28 हजार, निर्वाह 8 हजार व निवास भत्ता 15 हजार असा एकूण 51 हजार रूपये प्रदान करण्यात येतो. त्याचप्रमाणे उर्वरित ठिकाणांसाठी भोजन 25 हजार, निवास 12 हजार व निर्वाह भत्ता 6 हजार असा एकूण 43 हजार रूपये देण्यात येतो. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रूपये 5 हजार रूपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 2 हजार रूपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी रोख स्वरूपात देण्यात येणार आहे.
                                                                        ********
 पाणी टंचाई निवारणार्थ नळ योजनांची विशेष दुरूस्ती
* मोताळा तालुक्यातील तीन गावांचा समावेश
बुलडाणा दि‍. 20 - पाणीटंचाई निवारणार्थ मोताळा तालुक्यातील सावरगांव जहाँगीर, शेलगांव बाजार व चिंचखेड खु या गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या  कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
   या गावांमधील संबधित ग्रामपंचायतीने वीज देयक न भरल्यामुळे नळ योजना बंद असेल, तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम संबंधिताकडे भरून नळ योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करावा. कामे सुरू होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांनी करावा.  सदर मंजूर कामे इतर निधीतून झालेले नाही अथवा प्रस्तावित नाही, याची खात्री केल्यानंतरच मंजूर कामास सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                        *******
         चिखली तालुक्यातील चंदनपूर गावासाठी टँकर मंजूर

बुलडाणा,दि‍.20 : चिखली तालुक्यातील चंदनपूर येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. चंदनपूर गावाची लोकसंख्या 1720 असून या लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. 

Saturday 3 February 2018

news 3.2.2018 dio buldana

अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ई विकास प्रणालीवर सादर करावे
·        https://etribal.maharashtra.gov.in संकेतस्थळ विकसित
बुलडाणा, दि.3 – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय,  अनुदानित, कायम विनाअनुदानित, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ई विकास प्रणालीवर अर्ज सादर करावे. शासनाने यापूर्वी महाडीबीटी पोर्टल विकसित केले होते. मात्र या पोर्टलवर काही विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंद करण्यास व महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज  प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.  
    सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचे अर्ज यापूर्वीच कार्यरत असलेल्या ई विकास प्रणाली अर्थातच https://etribal.mharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहे. तरी प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे. महाविद्यालयांनी  विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, अकोला या कार्यालयाकडे सादर करण्यास विलंब झाल्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.
                                                                                    ***
  ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया
बुलडाणा, दि.3 – राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. पारंपारिक पद्धतीऐवजी संगणकीकृत पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्रे भरण्यापासून उमेदवार निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही पार पडेपर्यंतचे सर्व टप्पे आयोगाच्या आज्ञावलीनुसार संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील तीन सार्वत्रिक व 102 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूकीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याची नोंद सदर निवडणूकांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात  आले आहे.
                                                            ******
जिल्हाधिकारी कार्यालयात
 5 फेब्रुवारी  रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा सदर लोकशाही दिन सोमवार 5 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात,  प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        ******
महिला उद्योजकांना पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
  • 5 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावे
  बुलडाणा, दि.2 : महिला उद्योजकांसाठी असलेल्या महिला धोरण – 2017 अंतर्गत सन 2017-18 करीता महिला उद्योजकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानुसार उद्योग व्यवसायातील सर्वोत्तमतेसाठी महिला उद्योजकांना वेगळ्या संवर्गामध्ये सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिला उद्योजकांनी स्थापन केलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी केलेल्या प्रशंसनीय कामासाठी व सुप्त महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात येईल. त्याअनुषंगाने विहीत पात्रता व निकष पुर्ण करणाऱ्या महिला उद्योजकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.  तरी महिला उद्योजकांनी विहीत नमुन्यातील सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव विभागीय उद्योग सहसंचालक कार्यालय, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे कार्यालयांकडे 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत सादर करावे.                 
        त्यासाठी उद्योग घटक हा गेली तीन वर्ष सतत उत्पादन देणारा असावा, यापूर्वी उद्योग विभागामार्फत कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा, एकल मालकी घटक असल्यास महिला उद्योजकाचे 100 टक्के भाग भांडवल असावे, भागीदारी असेल तर भागीदारी घटकामध्ये 100 टक्के भाग भांडवल असावे, सहकारी क्षेत्रामध्ये सहकार कायद्यातंर्गत सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्योजकांचा समावेश असावा, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादीत घटकात महिला उद्योजकांचे किमान 100 टक्के भाग भांडवल असलेली कंपनी असावी, स्वयं सहायता बचत गटामध्ये नोंदणीकृत गट असावा, आदी निकष पूर्ण करणाऱ्या महिला उद्योजकांनी प्रस्ताव सादर करावा. सन 2017-18 करीता फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई येथे आयोजित मॅग्नेटीक कर्न्व्हजन्स 2018 कार्यक्रमात पुरस्कार देण्यात येणार आहे, असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी कळविले आहे.
                                                            *****
शेगांव तालुक्यातील चिंचोली गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा दि3 – शेगांव तालुक्यातील चिंचोली येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. चिंचोली गावाची लोकसंख्या 2900 असून एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
    अप्पर जिल्हाधिकारी यांना कुठलाही घेराव नाही
बुलडाणा दि 3 – अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये 2 फेब्रुवारी 2018 रोजी काही शेतकरी खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरीता अधिग्रहीत जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही, या दृष्टीकोनातून निवेदन सादर करण्यासाठी आले होते. या शेतकऱ्यांनी केवळ निवेदन सादर केले. कुठल्याही प्रकारचा घेराव घातला नाही. त्यामुळे घेराव घातला असल्याचे वृत्त वास्तविक परिस्थितीशी निगडीत नाही. केवळ निवेदन देण्यात आले, असा खुलासा अप्पर जिल्हाधिकारी श्री. दुबे यांनी केला आहे.
*****



गहू, तांदूळ व साखरेचे मासिक परिमाण व दर जाहीर
  • तूर डाळ प्रति कार्ड 1 किलो 55 रूपये किलो दराने मिळणार
बुलडाणा दि 3 – शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्याकरीता माहे फेब्रुवारी 2018 करीता गहू, तांदूळ व साखरेचे मासिक नियतन प्राप्त झाले आहे. शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात  येणाऱ्या अन्नधान्याचे व साखरेचे मासिक परिमाण व दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने माहे फेब्रुवारी 2018 करीता गहू, तांदूळ व साखरेचे तीन योजनांचे दर व परिमाण खालीलप्रमाणे देण्यात येत आहे:
   राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत समाविष्ट न होणारे एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी : गहू 4 किलो प्रतिव्यक्ती दोन रूपये किलो, तांदूळ 1 किलो प्रतिव्यक्ती 3 रूपये किलो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थी : दे.राजा, मेहकर, लोणार व सिंदखेड राजा करीता गहू 4 किलो प्रतिव्यक्ती रूपये दोन किलो,  तसेच मलकापूर, नांदुरा, खामगांव, जळगांव जामोद, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा, चिखली, मोताळा करीता मका 1 किलो प्रतिव्यक्ती 1 रूपये दराने, तर गहू प्रतिव्यकती 3 किलो 2 रूपये किलो दराने देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत अंत्योदय योजनेतील लाभार्थी : दे.राजा, मेहकर, लोणार व सिं.राजा करीता प्रतिकार्ड गहू 30 किलो दोन रूपये दराने, तसेच मलकापूर, नांदुरा, खामगांव, जळगांव जामोद, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा, चिखली, मोताळा करीता मका 12 किलो प्रतिकार्ड 1 रूपये दराने, तर गहू प्रतिकार्ड 18 किलो 2 रूपये किलो दराने देण्यात येणार आहे. तांदुळ 5 किलो प्रतिकार्ड 3 रूपये दराने आणि साखर प्रतिकार्ड 1 किलो 20 रूपये दराने मिळणार आहे. सर्व योजनांमधील लाभार्थ्यांसाठी तूर डाळ प्रति कार्ड 1 किलो 55 रूपये दराने देण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                    ****