अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
-
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : राज्यात गत काही
दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे तातडीने
पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
श्री. जाधव-पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी
पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेतीच्या
नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी व विभागाने
पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री श्री. जाधव
पाटील यांनी दिल्या आहेत.
अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक
आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत
आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी सन २०२३-
२०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे
तेहसतीस कोटी) रूपये तर २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६
हजार ९८९ कोटी (सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या
कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयेची मदत देण्यात आली असल्याचे मदत
व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.
०००००
Comments
Post a Comment