DIO BULDANA NEWS 18.05.2024
नागरीकांनी उष्माघातापासून बचाव करावा
*आपत्ती व्यवस्थापनचे आवाहन
बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव कराव, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विविध उपायांमध्ये शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे. तहान लागली नसली तरीही पाणी प्यावे. तहान हे निर्जलीकरणाचे चांगले सूचक नाही. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) चा उपयोग आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेये प्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर, तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. डोके झाकून ठेवावे. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावीत. रेडिओ, टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्यावे आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत. तसेच भारतीय हवामान खात्याची वेबसाइट mausam.imd.gov.in वर हवामानाविषयी अद्ययावत माहिती घ्यावी.
हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवावे. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखाव्यात. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे, विशेषतः घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला, थंड हवा घेण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात. घराबाहेर जात असल्यास घराबाहेरील कामे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेपर्यंत मर्यादित करावीत. दिवसाच्या थंड वेळेमध्ये बाहेरील कामाचे नियोजन करावेत.
संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्यांनी कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, काहींना इतरांपेक्षा जास्त धोका असतो त्यांनी त्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे. या घटकात लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, मानसिक आजारपण असलेल्या व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेताना एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवावी. त्यांचे दररोज आरोग्य निरीक्षण करावे. तसेच घर थंड ठेवावे व पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा. शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावेत. पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.
नागरीकांनी उष्ण उन्हात बाहेर पडणे टाळावे, विशेषतः दुपारी १२ ते दुपारी ३ यावेळेत बाहेर असताना कठोर परिश्रम टाळावे. अनवाणी बाहेर जाऊ नये. अति उष्ण वेळेत स्वयंपाक करणे टाळावे. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. अल्कोहोल, चहा, कॉफी, आणि कार्बोनेटे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळावे. यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळावे. तसेच शिळे अन्न खाऊ नये. उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नये. त्यांना वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.
0000000
येळगाव धरणातून गाळ काढण्यास सुरुवात
बुलडाणा, दि. 18 : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती योजनेला येळगाव धरण परिसरात शुक्रवार, दि. 17 मे 2024 रोजी सकाळी 11.00 सुरूवात झाली.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी प्रणित श्री सुमेरू रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड बंगलोर, कर्नाटक आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रविंद्र लहाने, येळगावचे सरपंच श्री. तवकर, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलतारा प्रकल्प मेंटर सुनील भोजवानी, भगवान सावळे, चंदू पैठने, जलयुक्त शिवारचे जिल्हा समन्वयक गोपाल वेरूळकर, भुषण मोरे, मयूर स्वामी, नितीन देशमुख, सुदर्शन खरात उपस्थित होते.
सुरवातीला गुरुपूजेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित ट्रॅक्टर आणि जेसीबी चालक-मालक यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. भविष्यामध्ये परिसरातील शेती सुपीक करण्यासाठी आणि येळगाव धरण गाळमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी शासन आणि श्री सुमेरू रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, बंगलोर यांच्या वतीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले.
000000
Comments
Post a Comment