Friday 27 May 2022

DIO BULDANA NEWS 27.5.2022,1

 पाणी टंचाई निवारणार्थ 25 विंधन विहीरी ; 58 कुपनलिकांना मंजूरात

  • 70 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये विंधन विहीर घेणे, खाजगी विहीर अधिग्रहण, तातपुरती नळ पाणी पुरवठा योजना, कूपनलिका व टँकर आदींचा समावेश आहे.  या उपाययोजनांमुळे उन्हाळ्यात बसणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा निश्चितच सौम्य होणार आहे.

   पाणी टंचाई निवारणार्थ शेगांव तालुक्यातील 6, नांदुरा तालुक्यामधील 6, जळगांव जामोद तालुक्यातील 6, संग्रामपूरधील 4 व चिखली तालुक्यातील एका गावासाठी एकूण 25 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच 58 कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण 70 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

    विंधन विहीरी शेगांव तालुक्यातील जानोरी, जलंब, जवळा बु, टाकळी धारव, तरोडा कसबा व टाकळी विरो, नांदुरा तालुक्यातील खंडाळा, महाळुंगी, वसाडी खु, वसाडी बु, पोटळी, वडाळी, जळगांव जामोद तालुक्यातील निमखेडी, चाळीस टपरी, गोमाळ, वडपाणी, खांडवी, राजुरा बु, संग्रामपूर तालुक्यातील चुनखडी,हडीयामाळ, शिवाजी नगर, चिचारी, चिखली तालुक्यातील मलगी  गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. तर शेगांव तालुक्यातील चिंचखेड, कुरखेड, भास्तन, कठोरा, पहुर पूर्णा, गोळगाव बु, भोनगांव, मनसगांव, माटरगांव बु, पाडसूळ, सगोडा, तरोडा तरोडी, खातखेड, पाळोदी, मानेगांव, झाडेगांव ,नांदुरा तालुक्यातील हिंगणा भोटा,  जळगांव जामोद तालुक्यातील हिंगणा दादगांव, सुनगाव, काजेगांव, गोरखनाथ, जामोद, सातळी, खेर्डा बु, रसुलपूर, ऐनगांव, वडशिंगी, संग्रामपूर तालुक्यातील भोन नवे, आलेवाडी, सायखेड, लाडणापूर, शिवणी, कवठळ, हिंगणा, कुंभारखेड, बावनबीर, एकलारा, कोलद, जस्तगांव, आवार, पळशी झांशी, करमोडा, वकाणा, वडगांव वाण, वानखेड, काटेल, रूधाना  या गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

                                                                        ***********

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांसोबत पंतप्रधान 31 मे रोजी साधणार संवाद

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी शिमला (हिमाचल प्रदेश) येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य व जिल्हा स्तरावर स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटूंबियांसह निवडक लाभार्थी यांचेशी संवाद साधार आहे.  त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध योजनेचे लाभार्थी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 31 मे रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 9.45 ते दुपारी 12.10 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.                                      *********

No comments:

Post a Comment