मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम
बुलढाणा,दि.3 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून देशभरातील मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision - SIR) करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला असून राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची सखोल पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि 2002-04 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमा राबवल्या होत्या. गेल्या 20 वर्षांत केवळ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण झाले असून, मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, दुबार नावे आणि मतदार यादीतील बदल लक्षात घेता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार म्हणून नोंदणीसाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मतदार यादीतील नोंदींची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील एकूण 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशीलाची खातरजमा करण्यासाठी 1 ल...