Posts

Showing posts from 2026
Image
 

जागतिक कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

Image
  बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : जागतिक कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताह उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथे जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.   रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व, सुरक्षित रक्तसाठ्याची गरज आणि समाजाप्रती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याविषयी जनजागृती करण्यात आली. रक्तदान शिबिरात कार्यालयातील सुमारे १५ ते २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या माता तसेच थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नि...

एसटी स्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर प्रशासनाचा मोठा दणका * २०० मीटर परिसरात नियमभंग करणाऱ्या वाहनांची थेट जप्ती, * १० दिवसांत २७० वाहनांवर कारवाई

  बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : एसटी बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने व्यापक धडक मोहीम सुरू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनीरे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त पथकांकडून जिल्हाभरात विशेष कारवाई केली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी उचलणे- सोडणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाईसह थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स, वडाप, काळी-पिवळी टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ५ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्य...

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा: कृषि विभागाचे आवाहन

  बुलढाणा दि.13 (जिमाका): खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्य शासनाच्या ३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात ही योजना Cup & Cap Model (80:110) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत असून, खरीप २०२६ व रब्बी २०२६-२७ हंगामासाठी विमा कंपनीची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, संकटाच्या काळात आर्थिक स्थैर्य कायम ठेवणे तसेच कृषी क्षेत्रातील पतपुरवठा व अन्नसुरक्षा मजबूत करणे हा आहे. खरीप हंगाम २०२६ साठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांची विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, कंपनीचा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक १४४४७ आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी Agristack Farmer ID असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हे (...

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ

* कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण बुलढाणा दि. 12 : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रण, अमली पदार्थांविरोधातील कारवाई, पोलीस आधुनिकीकरण, जलसंपदा, कृषी आणि विविध विकासकामांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्र...
 

‘माय भारत' पोर्टलवर युवकांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम; मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचे आवाहन

Image
  बुलढाणा दि. 9 (जिमाका):   जिल्ह्यातील १५ हून अधिक वयोगटातील जास्तीत जास्त युवकांना 'माय भारत' पोर्टलशी जोडण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत माय भारत तीव्र नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवून काम करावे आणि नोंदणी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे माय भारत तीव्र नोंदणी मोहीमेची प्रभावी नियोजन व अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा अधिकारी दिक्षा पोमण, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, अग्रीम बँकेचे एलडीएम कौशलेन्द्र कुमार सिंह, शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकाळ, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी गजानन लोहटे आदी उपस्थित होते. या मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील युवकांपर्यंत पोहोचून त्यांना या डिजिटल पोर्टलवर नोंदणीकृत करणे हा आहे. यासाठी जिल्ह्...

विशेष वृत्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी

  बुलढाणा दि. 9 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कृषी कर्जाशी संबंधित सर्व माहिती अचूक व अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. कर्ज खाते, आधार क्रमांक, बँकेतील तपशील आणि इतर आवश्यक माहितीमध्ये विसंगती असल्यास लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. जनेत निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार पात्र कृषी कर्जदारांचा समावेश करण्यात येणार असून, माहितीची विविध स्तरांवर पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी संबंधित बँक किंवा संस्थेकडे आवश्यक माहिती योग्य प्रकारे उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि अचूक पद्धतीने करण्यासाठी डिजिटल पडताळणीसह विविध प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. बँका आणि संबंधित संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पात्रतेची खातरजमा केली जाईल. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याशी संबंधित नोंदी वेळोवेळी तपासाव्यात. आवश्यक असल्यास संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करून घ्यावी. योग्य माहिती आणि वेळेत आवश्य...
 

पुरस्कार अर्जासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ; इच्छुक व्यक्ती व संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. ८ (जिमाका) :   इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणाऱ्या चार राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्यास १५ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक दिपाली पाडवी यांनी केले आहे. या पुरस्कारांमध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार यांचा समावेश आहे. समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी कलात्मक समाजप्रबोधन, साहित्य, समाजसेवा तसेच जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधनकार, समाजसेवक आणि सामाजिक संस्थांचा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार आहे. विशेषतः विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटक, आध्यात्मिक प्रबोधनकार, साहित्य...

बुलढाण्याची निर्यातीत ऐतिहासिक भरारी; १,०५१ कोटींचा विक्रम • अमरावती विभागात सलग अव्वल • पाच वर्षांत १४६ टक्क्यांची झेप

  बुलढाणा दि.8 (जिमाका): बुलढाणा जिल्ह्याने आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत निर्यातीत प्रथमच १,०५१ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील या विक्रमी कामगिरीमुळे बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील उदयोन्मुख निर्यात केंद्र म्हणून अधिक ठळकपणे पुढे आला आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४७.४ टक्के वाटा एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा असून, विभागात जिल्ह्याने सलग अव्वल स्थान कायम राखले आहे. पाच वर्षांत १४६ टक्क्यांची विक्रमी वाढ जिल्ह्याच्या निर्यातीत गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४२८ कोटी रुपये असलेली निर्यात २०२५-२६ मध्ये १,०५१ कोटी रुपयांवर पोहोचली असून, या कालावधीत १४६ टक्क्यांची एकत्रित वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षातील ८७४ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा २०.३ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढल्याचे हे महत्त्वपूर्ण द्योतक मानले जात आहे. विभागाच्या निर्यातीत बुलढाण्याचे वर्चस्व अमरावती विभागातील एकूण २,२१८ कोटी रुपयांच्या निर्य...

अमडापूर येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण; ‘कसं काय?’ मोहिमेअंतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर

Image
  बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : राज्य शासनाच्या 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'कसं काय?' मोहिमेच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चिखली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत आरोग्य विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्थेचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य व कल्याण केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविणे तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. निलेश जाधव व वैद्यक...

विशेष लेख : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र शेतकऱ्यांसाठी नवी संधी

Image
  शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देतानाच त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली आहे. या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना थकीत कृषी कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध होणार असून, भविष्यात नियमित कर्जव्यवहारासाठीही पोषक वातावरण निर्माण होणार आहे. शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्यामुळे अनेकदा अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभावातील चढ-उतार किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे शेतकऱ्यांना कर्जाची वेळेवर परतफेड करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत थकीत कर्जाचा भार वाढत जातो. या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ही योजना अमलात आणली आहे. या योजनेत निश्चित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या कृषी कर्जदारांचा समावेश करण्यात येणार आहे. अल्पमुदतीच्या पीक कर्जांसह योजनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुनर्गठित कृषी कर्जांचाही विचार करण्यात आला आहे. मात्र लाभासाठी शासनाने निश्चित केलेल्या अटी व निकषांची पूर्तता आवश्यक राहणार आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण...

महासारथी पोर्टलवर नोंदणी करून महाआयडी तयार करण्याचे आवाहन

Image
    बुलढाणा, दि. 7 (जिमाका): महाराष्ट्र शासनाने नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ अधिक सुलभ, जलद आणि एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महासारथी हे एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आधार प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र महाआयडी (MahaID) क्रमांक प्रदान करण्यात येणार आहे.   भविष्यात राज्य शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी हा एकच महाआयडी क्रमांक वापरता येणार असून, नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व सेवांची माहितीही या पोर्टलवर एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. महाआयडी तयार करण्यासाठी नागरिकांनी महासारथी पोर्टलला भेट देऊन आधार प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक वैयक्तिक माहिती भरून महाआयडी क्रमांक तयार करावा. लॉगिन करून माहितीची पडताळणी तसेच आवश्यक असल्यास अद्ययावत करावी. त्यानंतर पात्रतेनुसार उपलब्ध शासकीय योजना व सेवांची माहिती पोर्टलवरून मिळू शकते.   महासारथी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी https://mahasarathi.maharashtra.gov.in/ho...

अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनावर ९० टक्के अनुदान; जुलैअखेरपर्यंत विशेष मोहीम

  बुलढाणा दि.7 (जिमाका): प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यात १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे पात्र शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करून घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५ टक्के, तर इतर पात्र शेतकऱ्यांना ३० टक्के पुरक अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित १० किंवा १५ टक्के अनुदान अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून उपलब्ध होणार असून, एकूण ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. योजनेविषयी अधिक माहिती तसेच अर्ज प्रक्रिय...

महाडीबीटी २.० वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी करावी

  बुलढाणा दि.7 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी २.० प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती व शिक्षण सहाय्य योजनांच्या अर्ज नोंदणीस ६ जुलै २०२६ पासून सुरुवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावेत, तसेच महाविद्यालयांनीही प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे. या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील व वसतिगृहाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी निर्वाहभत्ता या योजनांसाठी नवीन (Fresh) तसेच नूतनीकरण (Renewal) अर्ज स्वीकारले जात आहेत. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० प्रणालीवर नवीन महाआयडी तयार करणे बंधनकारक असून, स्वतःच्या आधार क्रमांकाचा वापर करूनच नोंदणी करावी लागणार आहे. तसेच आधार पोर्टलवरील पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि बँक खात्याची माहिती ...

डी.एल.एड. प्रवेशासाठी विशेष फेरी जाहीर; १२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले

  बुलढाणा दि.7 (जिमाका): राज्यातील अध्यापक विद्यालयांमधील रिक्त जागा भरण्यासाठी डी.एल.एड. प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी जाहीर करण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. १२ जुलै २०२६ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. संबंधित जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, या फेरीतील प्रवेश 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर दिले जाणार आहेत. विशेष फेरीत यंदा इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेले व नव्याने डी.एल.एड. प्रवेशासाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी, नियमित प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज पूर्ण न भरलेले किंवा अर्जात आवश्यक दुरुस्ती न केलेले विद्यार्थी तसेच यापूर्वी कोणत्याही प्रवेश फेरीत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. नियमित प्रवेश प्रक्रियेत अध्यापक विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध रिक्त जागांनुसार आपल्या पसंतीक्रमात बदल करून संबंधित अध्यापक विद्यालयांचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी डी.एल.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन शुल्क भरले असले, मा...

जिल्ह्यात सरासरीच्या २१.३४ टक्के पावसाची नोंद; मेहकर तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान

  बुलढाणा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात मान्सूनने समाधानकारक हजेरी लावली असून ७ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण १६२.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद जिल्ह्याच्या सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या २१.३४ टक्के इतकी आहे. मागील वर्षी याच कालावधीत १७९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तालुकानिहाय पाहता मेहकर तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २४२.१ मि.मी. पाऊस पडला असून तो तालुक्याच्या सरासरीच्या २८.८७ टक्के आहे. त्याखालोखाल शेगाव येथे १६९.० मि.मी. (२४.७६ टक्के), मोताळा येथे १७६.२ मि.मी. (२४.७३ टक्के), देऊळगाव राजा येथे १७१.७ मि.मी. (२४.३७ टक्के) आणि बुलढाणा तालुक्यात २०९.८ मि.मी. (२४.३८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये चिखली येथे १६७.४ मि.मी., सिंदखेड राजा येथे १७१.० मि.मी., लोणार येथे १७१.६ मि.मी., नांदुरा येथे १५०.६ मि.मी., जळगाव जामोद येथे १५२.७ मि.मी., संग्रामपूर येथे १२८.४ मि.मी., खामगाव येथे १०५.८ मि.मी. आणि मलकापूर येथे ९७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. महसूल विभागाच्या पर्जन्यमान विश्लेषणानुसार १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५३.४ मि.मी. पा...

बुलढाण्यासह विदर्भात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी

  बुलढाणा दि.7 (जिमाका): भारत मौसम विज्ञान विभाग, प्रादेशिक मौसम केंद्र, नागपूर यांनी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. ७ व ८ जुलै रोजी सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दि. ९ जुलै रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून त्यानंतर दि. १० ते १३ जुलैदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचीही शक्यता असल्याचे अंदाजात नमूद करण्यात आले आहे. संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे. मेघगर्जना व वीजांचा कडकडाट होत असताना उघड्...

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

  बुलढाणा/मुंबई, दि 7 जुलै: जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग. 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. ⁠ राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 0000

'श्री संत गुलाबबाबा महाराज' जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
             बुलढाणा दि.7 (जिमाका):   भारतीय संस्कृतीचे अभ्यासक श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, नायब तहसीलदार हिवाळे,   रविकांत बंगाळ,   प्रेम यादव यांनीही श्री. संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 000

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला वेग जिल्हाभर बीएलओंकडून घरोघरी पडताळणी; नागरिकांनी अचूक माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन

Image
    बुलढाणा दि.6 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जिल्हाभर घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करत आहेत. गणना प्रपत्र भरून घेण्यासह पात्र मतदारांची माहिती अचूकपणे नोंदविण्यावर भर दिला जात आहे.   जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि बीएलओ यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी विविध भागांना भेटी देऊन मोहिमेचा आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना देत आहेत.   मोहिमेदरम्यान बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत अचूक माहिती द्यावी तसेच प्रपत्रातील माहितीची खातरजमा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   "मतदार यादी जितकी अचूक आणि अद्ययावत, तितकी लोकशाही अधिक सक्षम होते. त्यामुळे विशेष सखोल ...

विशेष वृत्त : अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी, सहकार विभाग आणि बँकांचा समन्वय महत्त्वाचा

  बुलढाणा दि.6 (जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभाग, सहकार विभाग आणि बँकिंग यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा, हा या समन्वित प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे. योजनेबाबत मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी कृषी विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. विविध स्तरांवर जनजागृती करून शेतकऱ्यांना योजनेची अचूक माहिती उपलब्ध करून दिली जाते. सहकार विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध सहकारी संस्था आणि संबंधित यंत्रणांमध्ये आवश्यक समन्वय साधला जातो. योजनेच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय प्रक्रिया सुरळीत आणि परिणामकारक होण्यासाठी हा विभाग महत्त्वाचा दुवा ठरतो. बँकांकडून कर्ज खात्यांची पडताळणी, कर्जाशी संबंधित नोंदींची शहानिशा तसेच आवश्यक आर्थिक माहितीची पूर्तता केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते कार्यरत ठेवणे, केवायसी पूर्ण करणे, आधार क्रमांक संलग्न करणे आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवणे आ...