Posts

Showing posts from 2026

नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन* *आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे निर्देश* *बुलढाणा, दि. 27 (जिमाका) :* नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत विशेष माहिती नोंदणी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कोणतेही नागरिक अथवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले असतील किंवा त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण अथवा हॉटेल, प्रवासाच...

सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

  सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन   बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडॉप्टेरा लिटुरा), उंट अळी, घाटे अळी आणि केसाळ अळी यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने केले आहे.   पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील कोष नष्ट करावेत. मुख्य पिकाभोवती एरंडी किंवा सूर्यफुलाची एक ओळ सापळा पीक म्हणून लावावी. पिकाची नियमित पाहणी करून अंड्यांचे पुंजके तसेच समूहाने आढळणाऱ्या लहान अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेत तणमुक्त ठेवून संतुलित खत व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे.   पतंगांच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध (फेरोमोन) सापळे लावून त्यामध्ये स्पोडोल्युअर किंवा हेलील्युअर प्रलोभकाचा वापर करावा. भक्षक पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रति एकर ८ ते १० पक्षीथांबे उभारावेत...

सेसफंड योजनेअंतर्गत कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदान; शेतकऱ्यांनी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा

  सेसफंड योजनेअंतर्गत कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदान; शेतकऱ्यांनी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा   बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : जिल्हा परिषद बुलढाणा कृषी विभागाच्या सेस फंड योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेतून ५ एच.पी. मोटारपंप संच, ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, बी.बी.एफ. प्लांटर, पेरणी यंत्र आदी साहित्य पुरविण्याचे प्रस्तावित आहे.   या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमधील कृषी विभागातील कृषी अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा.   योजनेअंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे दि. २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद बुलडाण्याचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत अर्ज सा...

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी समन्वयाने काम करा : उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांचे आरोग्य विभागाला निर्देश

Image
  गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी समन्वयाने काम करा : उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांचे आरोग्य विभागाला निर्देश   बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग, अकोला मंडळाचे उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांनी दिले.   समुदाय आरोग्य अधिकारी व्यक्तिमत्व तथा कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.   आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव ’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून गावपातळीवरील आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजाचाही आढावा घेतला.   राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानां...

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार खेळाडूंनी 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करण्याचे आवाहन

  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार खेळाडूंनी 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करण्याचे आवाहन   बुलढाणा, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना तसेच जनतेमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.   राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यात दि. २८ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, त्यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, मान्यवरांचे ख...

पिंपळगाव देवी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा

Image
  पिंपळगाव देवी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा ‘कस काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन   बुलढाणा, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळगाव देवी, ता. मोताळा येथे दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनीता जंवजाळ आणि सुलोचना पऱ्हाड यांनी सर्वसमावेशक प्राथमिक आ...

महाडिबीटी 2.0 वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू

  महाडिबीटी 2.0 वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना ऑनलाइन अर्जासाठी सहकार्य करण्याचे आवाहन   बुलढाणा, दि. २४ (जिमाका) : राज्यातील विजाभज, इतर मागासवर्ग व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडिबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.   शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. नवीन (Fresh) तसेच नूतनीकरण (Renewal) अर्जासाठी विद्यार्थ्यांनी नवीन महाडिबीटी आयडी/आधार लॉगिन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. आवश्यक कागदपत्रे जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, वैध प्रमाणपत्रे आदींच्या स्पष्ट पीडीएफ प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.   महाडिबीटी...

सोयाबीनवरील किडींच्या एकात्मिक नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी

  सोयाबीनवरील किडींच्या एकात्मिक नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी;   बुलढाणा, दि. २४ (जिमाका) : सोयाबीन पिकावरील प्रमुख किडींचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे शेताचे निरीक्षण करावे, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. सोयाबीन पिकाच्या सद्यःस्थितीत ४० ते ५० दिवसांच्या कालावधीत खोडमाशी, चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या आदी किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे किडींची लक्षणे ओळखून आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव झाल्यास योग्य नियंत्रण उपाययोजना कराव्यात.   सोयाबीनवरील प्रमुख किडींमध्ये खोडमाशी व चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या, केसाळ अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) यांचा समावेश आहे. खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाची पाने वाळतात, खोड आतून पोखरले जाते आणि फांद्यांवर चक्री आकाराचे कपारे पडतात. पाने खाणाऱ्या अळ्या पानांना जाळीदार छिद्रे पाडून नुकसान करतात.   चक्री भुंगा फांदीवर दोन चक्री काप मारून त्यात अंडी घालतो. त्यामुळे कापाच्या वरचा भाग वाळून खाली गळून पडतो. केसाळ अळी पानांच्या मागच्या बाजूल...

राखी पाठविण्यासाठी रविवारीही प्रमुख पोस्ट ऑफिस राहणार खुले

  राखी पाठविण्यासाठी रविवारीही प्रमुख पोस्ट ऑफिस राहणार खुले बुलडाणा जिल्ह्यातील नऊ डाकघरांत २३ ऑगस्टला राखी बुकिंगची सुविधा; स्पीड पोस्टवर १० टक्के सवलत बुलढाणा, दि. 21(जिमाका) : रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने भावाला वेळेत राखी पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन बुलडाणा डाक विभागाने विशेष व्यवस्था केली असून, रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिस राखी बुकिंगसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.   बुलडाणा प्रधान डाकघर, खामगाव प्रधान डाकघर, चिखली उप डाकघर, शेगाव उप डाकघर, मलकापूर उप डाकघर, नांदुरा उप डाकघर, देऊळगाव राजा उप डाकघर, मेहकर उप डाकघर आणि जळगाव उप डाकघर येथे रविवारी राखी बुकिंगची सुविधा उपलब्ध राहणार आहे.   स्पीड पोस्टवर १० टक्के सवलत : राखी जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी डाक विभागाने स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट दरावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. परदेशातही पाठविता येणार राखी : परदेशात र...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

  मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार              बुलढाणा, दि. 20(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने वेळापत्रकात ही सुधारणा करण्यात आली आहे.               सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६...

पाणी अडवा, पाणी जिरवा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक - आमदार संजय गायकवाड

Image
  पाणी अडवा, पाणी जिरवा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक            -          आमदार संजय गायकवाड ·          ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटरला ’ उत्स्फूर्त प्रतिसाद ·          मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी   बुलढाणा, दि. २१ (जिमाका) : पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे, पाणी वाहून जाऊ न देता त्याचे योग्य नियोजन करणे आणि जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. पाणी, निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहील, असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.   जिजामाता प्रेक्षागार क्रीडा संकूल येथे जलसंधारण दिनानिमित्त आयोजित   ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ रॅलीला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अजिंक्य घोडके, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता अ...

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड

Image
  जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध , दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री , मृद व जलसंधारण , महाराष्ट्र शासन   पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे , ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन , शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.   महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून , त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून , त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना र...