Posts

Showing posts from April, 2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

Image
                बुलढाणा, दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार व निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 000000

पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

Image
    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी शेत पाणंद रस्ते हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.   जिल्ह्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, यांच्यासह उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून ‘अलर्ट मोड’वर कार्य करावे. पाणंद रस्त्यांची कामे हाती घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. यासाठी नियमित बैठका घेऊन कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात. शेतकऱ्यांच्या दळणवळणाची सुविधा सुलभ...

पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री ना. मकरंद पाटील • 729 गावे टंचाईग्रस्त घोषित

Image
    •           18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तर 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित   बुलढाणा, दि.30 (जिमाका) : ‘अल नीनो’च्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जलस्रोतांचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.   नियोजन भवन येथे पाणी टंचाईचा आढावा बैठकीत पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री ना. पाटील यांनी पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये नागरिकांना नियमित व पुरेशा ...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 मे रोजी

    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी आणि प्रशासकीय अडचणींचे वेळेत निराकरण करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवार दि. 4 मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’ आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडण्यासाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   अर्जासाठी निकष : लोकशाही दिनात तक्रार सादर करताना नागरिकांनी विहित अर्ज केवळ शासनाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातच असावा, तक्रार किंवा निवेदन केवळ वैयक्तिक स्वरूपाचे असावे (सामूहिक स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत), अर्जाच्या दोन प्रती, संबंधित लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे.               तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हा स्तरावर, तर जिल्हा स्तरांनंतर २ महिन्यांनी विभागीय आणि त्यानंतर २ महिन्यांनी मंत्रालयीन स्तरावर अर्ज करता येईल. कोणत्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत. त...

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक - पालकमंत्री मकरंद जाधव पाटील • जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

Image
    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६' चा समारोप समारंभ संपन्न झाला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.   यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की, जलसाक्षरतेसाठी काढण्यात आलेली 'गोदावरी-नर्मदा जलदिंडी' ही केवळ एक यात्रा नसून, ते जलसंधारणाच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाचा जो वारसा दिला, तोच पुढ...

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक; खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

Image
    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक नियोजन, बियाणे व खताची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.   नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन 2026-27 चा आढावा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, आगामी काही दिवसांत मान्सून सक्रिय होणार असून खरीप हंगामाची कामे सुरू होतील. त्यामुळे जिल्ह्यात खते व बियाण्यांची मुबलक उपलब्धता ठेवून श...

महाराष्ट्र दिनाच्या सुटीमुळे मलकापूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

  बुलढाणा दि.29 (जिमाका): उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण तसेच कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणी बोर्ड आयोजित करण्यात येते. मात्र, दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय सुटी असल्याने या दिवशी आयोजित करण्यात आलेले दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. यामध्ये नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण आणि कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणीचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित दिव्यांग व्यक्तींनी दिनांक १ मे २०२६ रोजी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मलकापूर अथवा जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, सुटीच्या दिवशी तपासणी सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा झालेल्या गैरसोईस प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 00000

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य; 20 मेपर्यंत नोंदणीचे आवाहन

    बुलढाणा दि.29 (जिमाका): राज्यात दि. 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, दि. 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी दि. 20 मेपर्यंत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात एकूण 1.71 कोटी खातेदार असून त्यापैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावे. शेतकरी नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन अथवा स्वतः ॲग्रीस्टॅक पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे, खते, औषधे आदी कृषी निविष्ठा प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. फार्मर आयडी नोंदणीसंदर्भात काही अडचण आल्यास संबंधित विभागाच्या हेल्पडेस्कशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती विभागासाठी अजितकुमार गेजगे (9657109809), पुणे विभाग संगीता नना...

बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’म्हणून नामकरण; वैद्यकीय शिक्षण विभागाची मान्यता

  बुलढाणा दि.29 (जिमाका): बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा ’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने 28 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णय निर्गमित करून या नामकरणाला मान्यता दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे असून, त्यांचे जीवन राष्ट्रप्रेम, त्याग आणि लोककल्याणाच्या उच्च आदर्शांनी परिपूर्ण होते. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा गौरव म्हणून या महाविद्यालयाचे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम नेतृत्वाने स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली, त्यामुळे त्यांच्या नावाने ही संस्था...

लोकसेवा हक्क दिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

Image
    बुलढाणा,दि.28 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 28 एप्रिल हा दिवस ‘लोकसेवा हक्क दिन ’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने नागरिकांना विविध शासकीय सेवा विहित मुदतीत आणि मुदतीपूर्वी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.   नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, शेतकरी दाखला, भूमी अभिलेखविषयक दाखले, तसेच इतर अधिसूचित सेवा वेळेत उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी व उकृष्ट सेवा देणारे पदनिर्देशित अधिकारी उपविभागीय कार्यालय बुलढाणा, खामगाव व सिंदखेड राजा, तसेच चिखली, नांदुरा, मलकापुर, संग्रामपुर तहसील मधील अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व विद्युत निरीक्षक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.   यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, राजेंद...

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर विदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

    बुलढाणा दि.28 (जिमाका): विदर्भात सध्या उष्णतेची लाट जाणवू लागली असून बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोमवारी जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद ४३.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून, सरासरीच्या तुलनेत तापमानात ४ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.   भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याचे किमान तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता सायंकाळच्या सुमारास २१ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा प्रभाव अधिक जाणवत आहे.   संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. सोमवारी विदर्भातील विविध शहरांमधील तापमानाची स्थिती खालीलप्रमाणे राहिली: विदर्भातील अमरावती (४६.६ C) आणि वर्धा (४६.५ ° C) ही शहरे सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. त्यानंतर अकोला येथे ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ४५.० अंश, चंद्रपूरमध्ये ४५.२ अंश आणि यवतमाळमध्ये ४५.२ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. गोंदिया (४१.० ° C) आणि भं...

सुधारित : पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

                बुलढाणा,दि.28 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 29 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणार असून विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.               त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता मुबई येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. गुरुवार दि. 30 रोजी 11 वाजता अभ्यागतांसाठी राखीव, दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम-2026 आढावा, टंचाई, पांदण रस्ते आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता पेनटाकळी प्रकल्पाअंतर्गत मौजे देवदरी ता. चिखली या गावाचे पुनर्वसनाबाबत बैठक. दुपारी 3 वाजता खडकपुर्णा प्रकल्पाअंतर्गत विविध विषयांबाबत बैठक व दुपारी 4 वाजता जिगाव प्रकल्पाबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या तरतुदीनुसार शास...

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई,हनवतखेड व गिरडा गावासाठी टँकर मंजूर

              बुलढाणा दि.28 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, हनवतखेड व गिरडा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.   पिंपळगाव सराई येथे 592 पशुधन व 5 हजार 592 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 1 लाख 29 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. हनवतखेड येथे 179 पशुधन व 438 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 14 हजार 420 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. गिरडा येथे 330 पशुधन व 1 हजार 16 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 24 हजार 920 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अ...

महाडीबीटीद्वारे बियाणे व पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

    बुलढाणा दि.28 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भर अभियान तसेच राष्ट्रीय खाद्य तेल (गळीतधान्य) अभियान सन 2026-27 अंतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण हे घटक राबविण्यात येणार आहेत.   या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून, त्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन संबंधित घटकासाठी अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. 00000