Posts

बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

  बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन   बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :   कृषी यांत्रिकीकरण (राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण, यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण) योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.   अल-निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांच्या पेरणीत सुलभता आणणे, बियाण्याची बचत करणे तसेच उत्पादन वाढविणे या उद्देशाने बी.बी.एफ. पेरणी यंत्राचा कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत समावेश करण्यात आला आहे.   या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी गट अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. ट्रॅक्टर ३५ बीएचपी व त्यावरील क्षमतेसाठी बी.बी.एफ. पेरणी यंत्र खरेदीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रति यंत्र ५५ हजार रुपये किंवा यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे. तर...

बुलढाण्यात 'थॅलेसेमिया संकल्प सप्ताहा'निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न ​

Image
  बुलढाण्यात 'थॅलेसेमिया संकल्प सप्ताहा'निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न ​        बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :   जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 'थॅलेसेमिया संकल्प सप्ताहा'निमित्त भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. थॅलेसेमिया आणि हिमोग्लोबिनोपॅथी यांसारख्या अनुवांशिक रक्तविकारांबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ​ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने या रॅलीचे नियोजन करण्यात आले. रॅलीमध्ये विविध घोषणांच्या माध्यमातून नागरिकांना आजाराचे स्वरूप, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. विशेषतः विवाहपूर्व आणि गर्भधारणापूर्व तपासणी करणे थॅलेसेमिया रोखण्यासाठी किती आवश्यक आहे, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ​ ​ या संकल्पनेंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थ...

जिल्ह्यातील नागरिकांनी 'स्व-गणना' करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

Image
  जिल्ह्यातील नागरिकांनी 'स्व-गणना' करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन        बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :   जिल्ह्यामध्ये 1 मेपासून स्व-जनगणनेच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमाद्वारे होणार असून, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची म्हणजेच 'स्व-गणना' करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.       यावेळच्या जनगणनेमध्ये 15 मेपर्यंत नागरिक स्वतःची नोंदणी करू शकतील. नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. यात साधारणपणे 30 प्रश्न विचारले जातील, ज्यांची उत्तरे देऊन नागरिक स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. ही माहिती भरल्यानंतर एक 'SE-ID' (Self-Enumeration ID) जनरेट होईल, जो नागरिकांना जपून ठेवावा लागेल. हा आयडी प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी आलेल्या प्रगणकाला द्या...

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

Image
  ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात   बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :   भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे, या दृष्टीने केंद्र शासनाने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे.   या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम्   या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.   केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्त...

चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण

Image
  चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण   बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :   चिखली तालुक्यातील नागरी क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महसूल विभाग चिखली व नगर परिषद चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने संत सावता माळी भवन, चिखली येथे हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.   या शिबिरात ग्रामस्थ व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख हे होते, तर उद्घाटक म्हणून अंकुशराव पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर, तहसीलदार विजय सवडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, भूमी अभिलेख विभागाचे श्री. रेड्डी, मंडळ अधिकारी भगवान पवार तसेच नगर परिषद चिखलीचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.   कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प...

विशेष लेख : उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

Image
  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या काळात जनावरांमध्ये उष्माघात, पाण्याची कमतरता, पचनाचे विकार यांसह विषबाधेच्या घटनाही वाढताना दिसतात. विषबाधा ही गंभीर समस्या असून वेळेवर उपचार न झाल्यास जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी या विषयाबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. विषबाधा होण्याची प्रमुख कारणे : उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे जनावरे अनेकदा उपलब्ध असलेली कोणतीही वनस्पती खातात. यामध्ये धोतरा, आकोडा, करट, रानमेथी यांसारख्या विषारी वनस्पतींचा समावेश असू शकतो. अशा वनस्पतींचे सेवन केल्यास जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता वाढते. याशिवाय शेतात फवारणी केलेल्या चाऱ्यावर राहिलेले कीटकनाशकांचे अंश, रासायनिक खते किंवा औद्योगिक रसायनांचा संपर्क हे देखील विषबाधेचे महत्त्वाचे कारण आहे. काही वेळा कुजलेला किंवा बुरशी लागलेला चारा जनावरांना दिला जातो. अशा चाऱ्यातून तयार होणारे विषारी घटक जनावरांच्या शरीरात जाऊन गंभीर परिणाम करतात. प्लास्टिक, कचरा, तेलकट पद...

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन ; पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

  बुलढाणा दि.8 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अन्नधान्य पिके तसेच वाणिज्य पिके (कापूस) सन २०२६-२७ या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिके आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच वाटप (मिनीकीट वितरण) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिके गटांचे अर्ज, प्रमाणित बियाणे वितरण तसेच बियाणे संच वाटप (मिनीकीट वितरण) या घटकांसाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन “ बियाणे ” या घटकांतर्गत ऑनलाईन अर्ज करावेत. “ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्त्वावर अर्जांची निवड करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बुलढाणा श्री. संतोष डाबरे यांनी केले आहे. 00000