*अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाकडून ५३ कोटी ७३ लाखांचा निधी वितरित**बुलढाणा जिल्ह्यासाठी ३७ कोटी १५ लाखांचा भरीव निधी मंजूर**मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती*
*अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाकडून ५३ कोटी ७३ लाखांचा निधी वितरित* *बुलढाणा जिल्ह्यासाठी ३७ कोटी १५ लाखांचा भरीव निधी मंजूर* *मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती* *बुलढाणा, दि.१८ (जिमाका):* राज्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आता ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३७ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. शासन निर्णयानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नोव्हेंबर २०२५ चे नुकसानीसाठी ३७ हजार १४० बाधित शेतकऱ्यांसाठी ३०२०.२६ लक्ष रुपये तर जानेवारी २०२६ चे नुकसानीसाठी ७ हजार ३५७ बाधित शेतकऱ्यांसाठी ६९४.७९ लक्ष रुपये अशाप्रकारे जिल्ह्यासा...