Posts

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर

       बुलढाणा दि.22 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेड राजा तालुक्यातील नागझरी गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली. नागझरी येथे 250 पशुधन व 1050 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 16 हजार 360 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना; शाश्वत उत्पादनासाठी योग्य नियोजन, बीजप्रक्रिया व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 22 (जिमाका): यंदाच्या खरीप हंगामात अल निनो (El Nino) चा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पिकांचे नुकसान टाळणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत उत्पन्न सुनिश्चित करणे हा या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचा सल्ला दिला असून पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी (Germination Test) करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जमिनीत किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पेरणीदरम्यान ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएसबी, अॅझोटोबॅक्टर किंवा लिक्विड कन्सॉर्शिया यांसारख्या जैविक घटकांद्वारे बीजप्रक्रिया करावी. यामुळे रासायनिक खतांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.   सोयाबीन क्षेत्र अधिक असल्याने बीबीएफ (Broad Bed Furrow) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीने किंवा बेडवर टोकन पद्धतीने पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पद्धतीमुळे कमी किंवा जास्त ...

आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज ​* २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम * ​कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ग्रामपातळीवर नियोजन

  ​ बुलढाणा, दि. २२ (जिमाका): आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड आणि वय वंदना कार्ड ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व पंचायत विभागाची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ​ या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करत मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील कोणताही पात्र लाभार्थी या सुविधेपासून वंचित राहणार नाही, याची सक्त काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ​ ही मोहीम अधिक सुटसुटीत आणि प्रभावी व्हावी यासाठी त्याची विभागणी दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. ​ पहिला टप्पा   २५ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (PHC) येणाऱ्या ५० टक्के ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिरे होतील. यासोबतच सर्व ५० प्राथ...

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन

Image
    बुलढाणा, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन तुटवड्याच्या अफवामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गर्दी होत असून अनावश्यक इंधन साठा जमा करताना दिसून येत आहे.   जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.   जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप धारकांच्या सतत संपर्कात आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचे वाटप सुरळीत व्हावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.       ...

मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी

  बुलढाणा, (जिमाका) दि. 21 : सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प जातीच्या अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा पावसाळी प्रजनन हंगाम जूलै 2026 पासून सुरु होत आहे.   मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर जि. बुलढाणा येथे 15 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मत्स्यकास्तकार, शेतकरी व सहकारी संस्थांनी मत्स्यबीजाची मागणी लेखीस्वरुपात नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे. जिल्ह्यातील भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक तसेच पाटबंधारे विभागाचे तलाव, जलाशय आणि जिल्हा परिषदेकडील सिंचन व पाझर तलाव मासेमारी ठेक्याने घेतलेल्या संस्थांनी शासनाच्या धोरणानुसार अपेक्षित प्रमाणात मत्स्यबोटूकली संचयन करणे बंधनकारक असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. विभागामार्फत प्रमुख कार्प, रोहू, कटला, सायप्रिनस, पंगेशियस तसेच गिफ्ट तिलापिया या प्रजातींचे मत्स्यजिरे, मत्स्यबीज, बोटूकली आणि प्रगत बोटूकली विविध दराने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्व मच्छि...

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान; ‘कसं काय?’ मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  बुलढाणा, दि. 21 (जिमाका): राज्य शासनाच्या “ माझं गाव, आरोग्य संपन्न गाव ” अभियानांतर्गत जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या “ कसं काय ” मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. यावेळी “ कसं काय? ” या जनजागृतीपर गीताचे तसेच विशेष पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, प्रधान सचिव निपुण विनायक तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे करण्यात येत असून गावागावांत आता “ कसं काय? ” हा प्रश्न आरोग्य जनजागृतीचा संदेश देत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढाकारातून माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या माध्यमातून स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तसेच आरोग्य सक्षमीकरण याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “ कसं काय ” या विशेष गीताच...

जागतिक मधमाशी दिनानिमित्त बुलढाण्याच्या राजेंद्रदास बैरागी यांना राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार

  बुलढाणा, दि. 21 (जिमाका): जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2026 चा राज्यस्तरीय “ मधुमीत्र ” पुरस्कार धाड (ता. जि. बुलढाणा) येथील मध उत्पादक व मधुपालक राजेंद्रदास प्रकाश बैरागी यांना प्रदान करण्यात आला. मध उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, दीर्घ अनुभव, मध उत्पादन, मधमाशांच्या वसाहतींचे संवर्धन, प्रशिक्षण तसेच संशोधनात्मक योगदान या निकषांच्या आधारे निवड समितीमार्फत त्यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार 20 मे 2026 रोजी संत एकनाथ रंगमंदिर, क्रांती चौक, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बैरागी यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य सभापती (राज्यमंत्री दर्जा) रविंद्रजी साठे, लक्ष्मण अधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजकुमार डांगर, उप मुख्य अधिकारी (उद्योग) नित्यानंद पाटील, मध संचालक महा...