Posts

पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा; महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाला उपस्थिती

            बुलढाणा,दि.27 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 29 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणार असून विविध विभागांचा आढावा घेणारआहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.                 त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता मुबई येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. गुरुवार दि. 30 रोजी 11 वाजता अभ्यागतांसाठी राखीव, दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम-2026 आढावा, टंचाई आढावा, पांदण रस्ते आढावा बैठक. दुपारी 3 वाजता खडकपुर्णा प्रकल्पाअंतर्गत विविध विषयांबाबत बैठक व दुपारी 4 वाजता जिगाव प्रकल्पाबाबत आढावा बैठक स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा. सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पदाधिकारी यांची बैठक.           ...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

  बुलढाणा दि.27 (जिमाका): मातंग समाज तसेच तत्सम बारा पोटजातीतील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय बुलढाणा (मर्या) यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार दि. 5 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात येणार आहे.                 सदर कार्यशाळेचा मुख्य उद्देश मातंग समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणे, त्यांचा लाभ मिळवून देणे तसेच समाजाचे जीवनमान उंचावणे हा आहे. या कार्यशाळेत विविध योजनांबाबत मार्गदर्शन, शंका निरसन आणि लाभार्थ्यांसाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत माहिती दिली जाणार आहे. मातंग व मांग समाजातील नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दि. शं. पाखमोडे यांनी केले आहे. 0000

उष्णतेच्या लाटेत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीचे निर्देश; नियोक्त्यांना उपाययोजना राबविण्याचे आवाहन

  बुलढाणा दि.27 (जिमाका): राज्यासह देशभरात वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कामगार व मजूर वर्गाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विशेषतः बांधकाम, औद्योगिक, खाण व इतर क्षेत्रांतील कामगार उष्णतेच्या जोखमीला सामोरे जात असल्याने त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग, बांधकाम कंपन्या व संबंधित आस्थापनांना कामगारांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कामाच्या वेळांमध्ये आवश्यक ते बदल करून उष्णतेच्या तीव्र काळात काम टाळण्याचे, तसेच कामगारांना स्वच्छ पिण्याचे पाणी, सावली व विश्रांतीची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्राथमिक उपचार साहित्य, आईस पॅक व उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक साधने उपलब्ध ठेवण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करण्यावरही भर देण्यात ...

स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 4 मेपर्यंत मुदत

  बुलढाणा दि.27 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ” अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 4 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आवश्यक रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शासनाने 26 डिसेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार योजनेचा विस्तार तालुकास्तरावरही केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर लॉगिन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज Send Back झाले आहेत त्यांनी आवश्यक त्रुटी दुरुस्त करून 4 म...

'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०' चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

Image
    बुलढाणा दि.27 (जिमाका): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने'च्या (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा आणि त्यांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.   योजनेची वैशिष्ट्ये आणि आर्थिक लाभ: या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप कालावधीत उमेदवाराला दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. कामावर रुजू होताना उमेदवाराला ६ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसाहाय्य मिळेल. ही इंटर्नशिप ६ ते ९ महिने कालावधीची असेल. विविध क्षेत्रे: सेमीकंडक्टर, आयटी (IT), रिन्यूएबल एनर्जी यांसारख्या २० पेक्षा अधिक आधुनिक क्षेत्रांमधील ३००+ आघाडीच्या कंपन्यांमध्ये कामाची संधी उपलब्ध. पात्रतेचे निकष: अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे.  १० वी, १२ वी उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयटीआय(ITI), डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी(Postgraduate) किंवा एमबीए (MBA) केलेले तरुण यासाठी पात्र आहेत. कुटुंबाचे...

राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी बुलढाणा पॅटर्न ठरणार आदर्श; तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा राज्यस्तरावर गौरव

  बुलढाणा दि.24 (जिमाका): महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राबविलेल्या 'सहज प्रणाली' या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचा मुंबई येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात गौरव सोहळा : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या वतीने २८ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात 'द्वितीय सेवा हक्क दिन' राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव यांच्या शुभहस्ते डॉ. किरण पाटील यांना सन्मानित केले जाईल. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 'सहज प्रणाली' ठरली दिशादर्शक: डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना सामान्य नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात, यासाठी 'सहज प्रणाली' हा नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत ...

शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित ​चिखली तहसीलदार विजय सवडे यांचे पात्र नागरिकांना आवाहन; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्जाची मुदत

    बुलढाणा दि. 24 (जिमाका): राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केले आहे. यानुसार, शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी झालेली निवासी अतिक्रमणे विशिष्ट अटींच्या अधीन राहून नियमित करण्यात येणार आहेत. चिखली तालुकयातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे. ​ या योजनेअंतर्गत केवळ राहण्याच्या उद्देशाने (निवासी) केलेली अतिक्रमणेच विचारात घेतली जातील. व्यावसायिक स्वरूपाची अतिक्रमणे यातून वगळण्यात आली आहेत. ​ क्षेत्रफळ व शुल्क आकारणी: ​ ५०० चौ. फुटांपर्यंत अतिक्रमण पूर्णपणे मोफत नियमित केले जाईल, ​ ५०० ते १५०० चौ. फुटांवरील अतिरिक्त क्षेत्रासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या १० टक्के शुल्क आकारले जाईल, ​ १५०० चौ. फुटांपेक्षा जास्त असलेले अतिक्रमण नियमित केले जाणार नाही, ते निष्कासित केले जाईल. ​ मालकी हक्कनियमित केलेली जमीन 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून प्रदान केली जाईल. अशी जमीन पुढील ५ वर्षांपर्यंत विक्री किंवा हस्तांतरित करता येणार नाही. संपूर्ण महारा...