Posts

जागतिक कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

Image
  बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : जागतिक कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताह उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथे जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.   रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व, सुरक्षित रक्तसाठ्याची गरज आणि समाजाप्रती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याविषयी जनजागृती करण्यात आली. रक्तदान शिबिरात कार्यालयातील सुमारे १५ ते २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या माता तसेच थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नि...

एसटी स्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर प्रशासनाचा मोठा दणका * २०० मीटर परिसरात नियमभंग करणाऱ्या वाहनांची थेट जप्ती, * १० दिवसांत २७० वाहनांवर कारवाई

  बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : एसटी बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने व्यापक धडक मोहीम सुरू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनीरे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त पथकांकडून जिल्हाभरात विशेष कारवाई केली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी उचलणे- सोडणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाईसह थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स, वडाप, काळी-पिवळी टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ५ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्य...

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा: कृषि विभागाचे आवाहन

  बुलढाणा दि.13 (जिमाका): खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्य शासनाच्या ३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात ही योजना Cup & Cap Model (80:110) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत असून, खरीप २०२६ व रब्बी २०२६-२७ हंगामासाठी विमा कंपनीची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, संकटाच्या काळात आर्थिक स्थैर्य कायम ठेवणे तसेच कृषी क्षेत्रातील पतपुरवठा व अन्नसुरक्षा मजबूत करणे हा आहे. खरीप हंगाम २०२६ साठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांची विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, कंपनीचा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक १४४४७ आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी Agristack Farmer ID असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हे (...

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ

* कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण बुलढाणा दि. 12 : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रण, अमली पदार्थांविरोधातील कारवाई, पोलीस आधुनिकीकरण, जलसंपदा, कृषी आणि विविध विकासकामांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्र...
 

‘माय भारत' पोर्टलवर युवकांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम; मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचे आवाहन

Image
  बुलढाणा दि. 9 (जिमाका):   जिल्ह्यातील १५ हून अधिक वयोगटातील जास्तीत जास्त युवकांना 'माय भारत' पोर्टलशी जोडण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत माय भारत तीव्र नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवून काम करावे आणि नोंदणी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे माय भारत तीव्र नोंदणी मोहीमेची प्रभावी नियोजन व अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा अधिकारी दिक्षा पोमण, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, अग्रीम बँकेचे एलडीएम कौशलेन्द्र कुमार सिंह, शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकाळ, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी गजानन लोहटे आदी उपस्थित होते. या मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील युवकांपर्यंत पोहोचून त्यांना या डिजिटल पोर्टलवर नोंदणीकृत करणे हा आहे. यासाठी जिल्ह्...