Posts

विशेष लेख: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

    भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्यांना उपजीविका देण्याचे काम हा महत्वपूर्ण घटक करतो. म्हणूनच शेती हा घटक अन्न सुरक्षा,रोजगार आणि ग्रामीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतो.   मात्र गेल्या काही वर्षांपासून सतत होणारे हवामान बदल, जमीन आणि पाण्याची टंचाई, बियाणे आणि खतांवरील वाढता खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते जसे की, शेतीचे उत्पादन वाढविणे, हवामान बदलास अनुकूल आणि शाश्वत शेतीला चालना देणे, सिंचन व्यवस्था आणि जलसंधारणात सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. याशिवाय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे, शेतकरी गटांना बळकट करणे आणि बाजारपेठ उपलब्धतेत सुधारणा आणणे यासारखेही प्रयत्न केले जात आहेत.   मात्र आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी गेली काही ...

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष त्रुटी पूर्तता शिबिर

  बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा यांच्या वतीने "राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व" निमित्त विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे विशेष शिबिर दि. २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा कार्यालयात आयोजित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंबंधी प्रलंबित प्रकरणांतील त्रुटी दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २०२६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च शिक्षण व विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत नव्याने प्रवेश घेणारे तसेच डिप्लोमा तृतीय वर्षात प्रवेशित झालेले आणि अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सा...

बुलडाण्यात शेळीपालन, कुक्कुटपालन व गाय-म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन

  बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच गाय-म्हैस पालन या विषयांवरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. २ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत बुलढाणा येथे होणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग उभारावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन आणि गाय-म्हैस पालनाचे आधुनिक तंत्रज्ञान, विविध जातींची माहिती, लसीकरण, रोग व त्यांची लक्षणे, पशुखाद्य निर्मिती, चाऱ्याचे प्रकार, उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, उद्योजकता विकास, उद्योग संधी, शासकीय योजनांची माहिती तसेच व्यवसायासाठी आवश्यक सहकार्य याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान ५ वी उत्तीर्ण आणि १८ वर्षे वयाचा असावा. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण ...

विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

  शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज श...

राज्यातील आयुष रुग्णालयांसह बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधील पदनिर्मितीस मान्यता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

    बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : राज्यातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष रुग्णालयांतील नियमित पदनिर्मितीसह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ट्रॉमा केअर सेंटर, चिखली उपजिल्हा रुग्णालय, साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय तसेच मोताळा तालुक्यातील कोथळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदनिर्मितीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील २५९ आरोग्य संस्थांसाठी आवश्यक पदांच्या आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे. तसेच पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ३० ख...

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १३.२७ कोटींची शासकीय मदत मंजूर बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक १०.९९ कोटींचा निधी

Image
  बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : राज्यात मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अकोला, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी एकूण १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २५ जून २०२६ रोजी निर्गमित केला आहे. नुकसानभरपाईची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. शासन निर्णयानुसार तिन्ही जिल्ह्यांतील १४ हजार ७१६ बाधित शेतकऱ्यांच्या ७ हजार ९३४.७२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत वितरित केली जाणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार ५२ बाधित शेतकऱ्यांच्या ६ हजार ६१०.६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी १० कोटी ९९ लाख ३९ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील १ हजार ४७६ शेतकऱ्यांच्या ९७५.३१ हेक्टर क्षेत्रा...

विशेष लेख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : शेतकऱ्यांना दिलासा देणारे महत्त्वाचे पाऊल

  शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावातील चढ-उतार आणि इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना नव्याने शेती व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करणे हा आहे. कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार असून शेतीमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यासाठीही प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण गावाच्या विकासावर होतो. त्यामुळे शासनाने शेतकरी हिताला प्राधान्य देत ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, कर्ज खात्यांची पडताळणी करणे आणि लाभ वितरणाची प्रक्रिया संबं...