Posts

जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह'; विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन

Image
            बुलढाणा (जिमाका), दि. 8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.                या सप्ताहाची सुरुवात आज करण्यात आली असून सामाजिक न्याय विभागाच्या योजनाची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. 9 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या विचारांवर जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व वसतिगृहामध्ये निबंध, वक्तृत्व आणि लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. 10 एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर करून सामाजिक न्याय विभागाच्या 'मार्जिन मनी' योजनेसह इतर मह...

एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन

  बुलढाणा,दि.8 (जिमाका) : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणारा गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा गंभीर आणि चिंताजनक आजार ठरत असून, त्यापासून बचावासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी स्पष्ट केले आहे. लसीबाबत समाजात पसरत असलेल्या अफवा व गैरसमजांना बळी न पडता नागरिकांनी जागरूकता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा मुख्य कारणीभूत घटक आहे. या विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी एचपीव्ही लस प्रभावी उपाय ठरते. विशेषतः 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही लस अधिक उपयुक्त असून, योग्य वयात घेतल्यास भविष्यात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. सध्या सोशल मीडियावर लसीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. काही ठिकाणी लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होतात, अशी भीती निर्माण केली जात आहे; मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. एचपीव्ही लस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून अनेक देशांमध्ये ती सुरक्षितपणे वापरली जात आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते सांगितले...

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन

  बुलढाणा,दि.8 (जिमाका) : जिल्हा रुग्णालय व परिचारिका प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा घोषवाक्य “ एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी ” यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राचार्य उज्वला खेडेकर, मेट्रन आरती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत आरोग्य विषयक विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. मार्गदर्शनपर भाषणात जोशी सर यांनी निरोगी समाज निर्मितीसाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सेवा अधिक प्रभावी करता येतात, तसेच स्वच्छता, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित ...

बुलढाण्यात ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’ महोत्सव; उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

  बुलढाणा,दि.8 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’ हा लघुउद्योग, व्यवसाय व उद्योजकता महोत्सव 11 ते 13 दरम्यान बुलढाणा येथे आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक लघुउद्योजक, महिला बचतगट, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना थेट बाजारपेठ, प्रशिक्षण व मार्गदर्शनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील उद्योजकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा असून, उत्पादनांची थेट विक्री, ग्राहकांशी संवाद आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच, उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण आणि नेटवर्किंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘अमृतपेठ’ हे केवळ प्रदर्शन नसून, तरुणांना स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. या माध्यमातून अनेक युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत असून, स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे.   दोन दिवसीय या महोत्सवात हस्तकला, घरगुती उ...

*प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 • सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी • 9 हजार रुपये विद्यावेतनासह नामांकित कंपन्यांत कामाची संधी

  बुलढाणा,दि.8 (जिमाका) :   केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६' (PMIS) च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कॉर्पोरेट जगात कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आता 12 एप्रिल 2026   पासून नवीन नियम व अधिक सवलती लागू होणार आहेत. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि बदल:   निवड झालेल्या उमेदवारांना आता दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. यातील काही हिस्सा कंपन्यांमार्फत, तर उर्वरित रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) उमेदवाराच्या खात्यात जमा होईल. वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली असून, आता 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवक या योजनेसाठी पात्र आहेत. 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधरांसह आता पदव्युत्तर (Post Graduate) आणि MBA झालेले विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. इंटर्नशिपचा कालावधी 6 ते 9 महिने इतका असेल. तसेच, रुजू झाल्यानंतर आकस्मिक खर्चासाठी उमेदवाराला ६,००० रुपये एकरकमी सानुग्रह अनुदान दिले जाईल....

उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; 24 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 8 एप्रिल 2026 : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रकल्पांतर्गत उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतः अॅन्ड्रॉईड मोबाईलद्वारे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेची अंतिम मुदत 24 मे 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 उताऱ्यावर पीक पेरा नोंदविण्यासाठी ‘ई-पीक पाहणी व्हर्जन 4.0.5’ या मोबाईल अॅपचा वापर करणे आवश्यक आहे. हे अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून शेतात जाऊन पिकांची माहिती नोंदवून अपलोड करावी लागणार आहे. अॅप सुरळीत चालण्यासाठी गुगल क्रोम अपडेट असणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध नाही किंवा अॅप वापरणे शक्य नाही, त्यांनी संबंधित गावाचे तलाठी, कोतवाल किंवा नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फतही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत 100 टक्के ई-पीक पाहणी ...

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

  बुलढाणा, दि. 8 एप्रिल 2026 : छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाह स्मृतींना यंदा तब्बल 370 वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथे बुधवार, 15 एप्रिल 2026 रोजी ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि करवंड महोत्सव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महोत्सवाची सुरुवात सकाळी 8 वाजता भव्य ऐतिहासिक शोभायात्रेने होणार असून, यात शिवराय आणि गुणवंताबाईंच्या वेशभूषेत कलाकार, लेझिम पथके, बँड, अश्वदल आणि पालखी यांचा आकर्षक सहभाग असणार आहे. यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार असून, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. दुपारी 1 ते 2 या वेळेत पोवाडा व विविध लोककला सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध शाहिर रामानंद उगले यांच्या शौर्यगाथांवर आधारित विशेष कार्यक्रम होईल. दु...