Posts

पत्रकार परिषद; केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची उपस्थिती

Image
    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज बुलढाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेनंतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.   यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीतील विविध निर्णय आणि योजनांचा आढावा घेण्यात आला. देशाची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल व्यवहार व्यवस्था आणि जनकल्याणकारी योजनांमध्ये झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एअर स्ट्राइक यांसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित निर्णयांचा उल्लेख करण्यात आला.   डिजिटल व्यवहार क्षेत्रात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीने देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ दिल्याचे स...

संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Image
    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : श्री संत मुक्ताबाई यांच्या पावन पालखी सोहळ्याचे सुरक्षित, सुकर आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी व नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, संत मुक्ताबाई पालखी सोहळा हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा आणि भावनेशी निगडित असल्याने संपूर्ण पालखी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. विशेषतः महिला वारकऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आवश्यक मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.   पालखी मार्गावरील तसेच मुक्कामाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड न करता पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे,...

मान्सून काळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा; दामिनी ॲपचा वापर करा: जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    बुलढाणा,दि.12 (जिमाका) :  मान्सून कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिक, शेतकरी व शेतमजुरांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असून या काळात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.   आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी नागरिकांना ‘दामिनी अॅप’चा वापर करण्याचे आवाहन केले असून या अॅपद्वारे संभाव्य वीज पडण्याबाबत अद्ययावत सूचना मिळू शकतात. तसेच पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांनी विकसित केलेल्या मेघदूत (MEGHDOOT), सचेत (SACHET) आणि भूकंप (BHUKAMP) या मोबाईल अॅप्सचा वापर करून विविध आपत्तींसंदर्भातील माहिती व सतर्कता संदेश मिळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.             प्रशासनाने ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना गावपातळीवर जनजागृती करण्याच...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण 30 जूनपासून; बुलढाण्यात २०.९४ लाख मतदारांची घरपोच पडताळणी

  बुलढाणा,दि.12 (जिमाका) : मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ ’ राबविण्यात येत असून, या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान बीएलओ मतदारांना अंशतः भरलेले गणना पत्र (Enumeration Form) प्रत्येकी दोन प्रतींमध्ये वितरीत करतील. पात्र मतदारांनी या गणना पत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित बीएलओकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २   हजार २८८ बीएलओ नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून सुमारे २०.९४ लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच राजकीय पक्षांचे सहकार्यही महत्त्वाचे मानले जात आहे. मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नव्याने पात्र ठरलेल्या मतद...

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना; २५ जूनपर्यंत अर्ज मागविले * ९० टक्के शासकीय अनुदान

    बुलढाणा,दि.12 (जिमाका) :   अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर तसेच ट्रेलर खरेदीसाठी ९० टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. योजनेनुसार मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांची कमाल किंमत ३.५० लाख रुपये निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान तर उर्वरित ३५ हजार रुपये लाभार्थी बचत गटाचा स्वहिस्सा राहणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेचा अथवा अधिक किंमतीचा ट्रॅक्टर खरेदी केल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित बचत गटाला स्वतः भरावी लागणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे. तसेच अध्यक्ष व सचिव हेही अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावेत. सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे...

स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृह अर्ज करणे बंधनकारक; 10 जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

  बुलढाणा,दि.12 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापुढे स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे. शैक्षणिक सत्र 2026-27 साठी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया दिनांक 10 जून 2026 पासून सुरू झाली आहे. गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच स्वाधार योजनेअंतर्गत लाभासाठी पात्रता मिळणार आहे. मात्र, वसतिगृहासाठी अर्ज न करणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच स्वाधार योजना या दोन्ही सुविधांपासून वंचित राहू शकतात. मागील शैक्षणिक परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र राहती...
    बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या बुधवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत “ प्रवासी राजा दिन ” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “ कामगार पालक दिन ” आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाच्या कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे. परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तत्काळ निराकरण करतील. बुलढाणा विभागातील चिखली आगार येथे दि. 17 जु...