Posts

अमृत भारत स्टेशन योजनेतून नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या पुनर्विकासानंतर लवकरच राष्ट्राला समर्पित

Image
  बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह सर्वांगीण पुनर्विकास करण्यात आला असून, हे स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. हावडा–नागपूर–मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे प्रवेशद्वार असून, दररोज सुमारे ४,५४५ प्रवासी आणि ३६ गाड्यांची ये-जा या स्थानकावरून होते. प्रवासी वाहतुकीबरोबरच कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही हे स्थानक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकाचे आधुनिक स्थानक इमारत, प्रशस्त आरक्षण कार्यालय, चार आरक्षण कक्ष, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष, पुरुष, महिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, नवीन प्रवेशद्वार, वाहनतळ, संरक्षक भिंत, आधुनिक प्रकाशयोजना, व्हिट्रिफाइड फरशी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टिकाऊ फर्निचर तसेच दृष्टीहीनांसाठी मार्गदर्शक पट्टे अशा विविध सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. याशिवाय फलाट क्रमांक १ वर १६० मीटर आणि फलाट क...
Image
 

PMFME व AIF योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा; समन्वयातून अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यावर भर

Image
  बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. 9) जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत योजनांच्या अंमलबजावणीतील विविध पैलूंवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यशाळेला कृषी विभाग, आत्मा, स्मार्ट प्रकल्प, महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (SRLM), अग्रणी बँक तसेच PMFME योजनेशी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, डीआरपी आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अंबादास खडसान (एचआरडी, पोकरा/आत्मा कार्याल...

मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती; २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने मातंग समाज व तत्सम बारा पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना गुणक्रमांक व उपलब्ध निधीनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत आदी आवश्यक कागदपत्रांसह दि. २७ जुलै २०२६ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ....

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आठवडाभरात १०० हून अधिक क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण

Image
  बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केलेल्या आवाहनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या आठवडाभरात १०० पेक्षा अधिक क्षयरुग्णांना 'निक्षय मित्र' उपक्रमातून पोषण आहार (फूड बास्केट) किटचे वितरण करण्यात आले आहे. समाजातील विविध संस्था, स्वयंसेवी संघटना, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती आणि नागरिकांनी पुढाकार घेत क्षयरुग्णांना दत्तक घेण्यास सुरुवात केली आहे. भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने 'प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत क्षयरुग्णांना नियमित औषधोपचारासोबतच सकस व पोषक आहार मिळणे आवश्यक असल्याने 'निक्षय मित्र' संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये इच्छुक व्यक्ती, संस्था किंवा उद्योगसमूह क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना दरमहा पोषण आहार उपलब्ध करून देतात. जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "क्षयरोग हा केवळ वैद्यकीय विषय नसून सामाजिक समस्याही आहे....
Image
 

जागतिक कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

Image
  बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : जागतिक कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताह उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथे जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.   रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व, सुरक्षित रक्तसाठ्याची गरज आणि समाजाप्रती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याविषयी जनजागृती करण्यात आली. रक्तदान शिबिरात कार्यालयातील सुमारे १५ ते २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या माता तसेच थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नि...