Posts

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासह पाणीपुरवठा योजनांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा; भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन योजनांना गती देण्याचे निर्देश

Image
  बुलढाणा, दि. १४ (जिमाका) : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांचा मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध आढावा बैठकीत आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. बुलढाणा व मोताळा तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, भविष्यातील पाण्याची गरज तसेच योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसे व नियमित पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. पाटील यांनी दिले. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून बुलढाणा मतदारसंघातील वंचित राह...

पिकविमा व अतिवृष्टीच्या नुकसानीचा पालकमंत्री मकरंद पाटील यांनी घेतला आढावा; नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

Image
  बुलढाणा दि. 14 (जिमाका): अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले. पालकमंत्री ना. पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे, सर्व उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत प्राप्त तक्रारी, शेतकऱ्यांनी सादर केलेले नुकसान कळविण्याचे अर्ज, पंचनाम्यांची सद्यस्थिती तसेच विमा नुकसानभरपाईबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी घेतली. पुण्यश्लोक ...

दुर्गम ग्रामपंचायतींसाठी 'सीईओ संग्राम अभियान' राज्यात दिशादर्शक : पालकमंत्री मकरंद पाटील मनरेगा आणि लोकसहभागातून गावांचा सर्वांगीण विकास साधावा: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

Image
             ११० उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सन्मान; झेडपी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी 'मिशन झेड' अंतर्गत मोफत नीट-जेईई वर्गांचे कौतुक बुलढाणा दि. 14 (जिमाका): जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासीबहुल आणि डोंगराळ भागातील ग्रामपंचायतींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेने राबविलेले 'सीईओ संग्राम अभियान (संवेदनशील ग्राम)' हे राज्यासाठी एक दिशादर्शक आणि अभिनव पाऊल आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी गर्दे वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात केले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११० ग्रामपंचायतींचा आज प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या 'मिशन झेड (ZEDD)' आणि मोफत स्पर्धा परीक्षा वर्गांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले. या विशेष गौरव सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, ॲड. नाझर काझी, जिल्हाधिकारी डॉ. ...

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन संवाद

  बुलढाणा/मुंबई, दि. १४ :- गावपातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद साधणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार असून, त्याचवेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे. निरोगी महाराष्ट्रासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भागीदारी अधिक मजबूत करणे’ या दिशेने होणारा हा जनसंवाद आरोग्य क्षेत्रातील लोकसहभागाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती (VHNSC), जन आरोग्य समिती (JAS), रुग्ण कल्याण समिती (RKS) आणि एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती या समित्या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. या समित्यांमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवक, स्वयंस...

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद ; उद्योगांसाठी पोषक वातावरण आणि भक्कम पायाभूत सुविधांची हमी - पालकमंत्री मकरंद पाटील कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणार - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

Image
  बुलढाणा दि. 14 (जिमाका): बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासह गुंतवणुकीसाठी अत्यंत पोषक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याबरोबरच १ ते सव्वा लाख कोटी रुपये खर्चाच्या 'वैनगंगा' (गोसीखुर्द) जलप्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील आठ जिल्ह्यांचा आणि पर्यायाने बुलढाण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल. जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे असून, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिली. उद्योग आयुक्तालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथील सभागृहात आयोजित 'बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६' मध्ये ते बोलत होते. या परिषदेस केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, ॲड...

‘हर घर तिरंगा २०२६’ अंतर्गत बुलढाण्यात भव्य तिरंगा रॅली; ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन

  बुलढाणा दि. 14 (जिमाका): भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला लोकसहभागाची व्यापक चळवळ म्हणून यश मिळाले असून, यावर्षी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘हर घर तिरंगा २०२६’ आणि ‘वंदे मातरम्’ या दोन्ही उपक्रमांचे एकत्रित आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध प्रत्यक्ष व डिजिटल उपक्रमांद्वारे राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि ‘वंदे मातरम्’चा जागर करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने खेळाडूंची भव्य तिरंगा रॅली आणि ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्हा प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करणारे सुमारे १५० ते २०० खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी हो...

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा दि. 14 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृह योजनेसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे. १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेशाकरिता ७ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जांची छाननी १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६ दरम्यान करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर २०२६ रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवडीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत २१ सप्टेंबर २०२६ असून, रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी दुसरी निवड यादी ७ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक देण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. बुलढाणा...