Posts

विशेष वृत्त अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवा; लाभ मिळविण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Image
  बुलढाणा, दि. ४ (जिमाका) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी शासनाने निश्चित कार्यपद्धती आखली आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबरोबरच बँकेतील कर्ज खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. योजनेबाबत शासन वेळोवेळी आवश्यक सूचना प्रसिद्ध करीत असून, लाभासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक आहे किंवा नाही, याबाबतचे निर्देशही स्वतंत्रपणे दिले जात आहेत. मात्र, लाभ वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित बँकेकडे असलेली शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कर्ज खात्याचा तपशील संबंधित बँकेत तपासून घ्यावा. कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच इतर आवश्यक माहिती बँकेच्या नोंदीत अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक पासबुक अथवा कर्ज खात्याचा तपशील, पीक क...

विशेष लेख : ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्याचा काय उपयोग होणार ?

  राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, अचूक आणि जलद करण्यासाठी ॲग्रीस्टॅक (AgriStack) या आधुनिक डिजिटल व्यवस्थेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात " ॲग्रीस्टॅक म्हणजे नेमके काय?" आणि "कर्जमुक्ती योजनेत त्याचा काय उपयोग होणार?" असे प्रश्न निर्माण झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख आणि शेतीशी संबंधित माहितीची एकत्रित संगणकीय नोंद. या प्रणालीमध्ये शेतकऱ्याची जमीन, पीक, आधार क्रमांक, बँक खाते, पीक कर्ज आणि इतर आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध राहते. त्यामुळे शासनाला योग्य शेतकरी ओळखणे आणि योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अधिक सोपे होते. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ॲग्रीस्टॅकची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने या योजनेसाठी पात्रता निश्चित करताना शेतकऱ्यांची माहिती पडताळण्यासाठी ॲग्रीस्टॅकचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभ मिळवू इच्छिणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी कर...

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी टँकर मंजूर

    बुलढाणा दि.3 (जिमाका ): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली. अंढेरा येथे 3932   पशुधन व 8870 लोकसंख्येसाठी तीन टॅंकरद्वारे 2 लाख 45 हजार 635 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित; सूचना व हरकती मागविल्या

    बुलढाणा दि.3 (जिमाका ): जिल्ह्यातील प्रशासकीय सेवा अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने साखरखेर्डा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असून, या कार्यालयाच्या निर्मिती तसेच कार्यक्षेत्र निश्चितीबाबत नागरिकांकडून सूचना, हरकती व आक्षेप दि. 8 जुलैपर्यंत मागविण्यात आले आहेत. नागरिकांनी निर्धारित मुदतीत सूचना व हरकती सादर करून प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.   महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून २०२६ रोजीच्या निर्देशानुसार नवीन कार्यालयांची मुख्यालये व कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित करण्यात आले असून, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शेंदुर्जन व साखरखेर्डा या दोन महसूल मंडळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.   या प्रस्तावानंतर सिंदखेडराजा तहसीलअंतर्गत कार्यरत असलेल्या मूळ तहसीलदार कार्यालयाकडे सिंदखेडराजा, सोनोषी, किनगाव राजा, ...

संत मुक्ताई पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग सज्ज; • उपचार केंद्रे, रुग्णवाहिका व फिरती वैद्यकीय पथके तैनात

Image
    • अंढेरा फाटा ते देऊळगाव माहीदरम्यान व्यापक आरोग्य सुविधा; आपत्कालीन सेवांसह रोगप्रतिबंधक उपाययोजनांवर भर बुलढाणा दि.3 (जिमाका ): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अखंड, तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. अंढेरा फाटा ते देऊळगाव माही या पालखी मार्गावर आरोग्य उपचार केंद्रे, रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके, आरोग्यदूत, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या नियोजनानुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सदानंद बन्सोड यांच्या सूचनेनुसार संपूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गावरील आरोग्य पथकांकडून वारकऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच उ...

कट प्रॅक्टिस खपवून घेतली जाणार नाही; शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Image
  बुलढाणा दि.3 (जिमाका ): राज्यातील शासकीय आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस, निष्काळजीपणा आणि रुग्णांना जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे वळविण्याचे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी, ईएमएस समन्वयक व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आरोग्य यंत्रणेला कठोर निर्देश दिले. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार महेंद्रशेठ दळवी, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक राजेंद्र भालेराव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की, १०८ आणि १०२ रुग्णवाहिका सेवांचा उद्देश गरजू रुग्णांना तातडीने शासकीय रुग्णालयात किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त रुग्ण...

‍विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) जनजागृतीबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन