Posts

यशकथा: तालसवाड्यातील महिला उद्योजिकेची भरारी: ‘माउली दुग्ध व्यवसाय’ ठरतोय यशाचा नवा मार्ग

    ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर तालुक्यातील तालसवाडा या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा साकार झाली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेला दुग्ध व्यवसाय आज “ माउली दुग्ध व्यवसाय ” या नावाने ओळखला जाऊ लागला असून स्थानिक महिलांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे. सुमारे १८०० लोकसंख्या असलेल्या तालसवाडा गावात सर्व धर्मीय एकत्र नांदतात. शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी गाय, म्हैस व बकरी पालन हा जोडधंदा म्हणून केला जातो. गावाची साक्षरता जवळपास ९९ टक्के असून सामाजिक एकोपा आणि सहकार्याची भावना येथे ठळकपणे दिसून येते. याच गावातील सौ. पुष्पा संतोष जंगले (वय ४५), प्रगती महिला बचत गटाच्या सदस्य, यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०१३-१४ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (माविम) अंतर्गत गावात महिला बचत गटांची स्थापना झाली. प्रगती महिला बचत गट हा त्यातील एक सक्रिय गट असून सध्या गावात एकूण १२ गट कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार ठप्प झाले असताना, पुष्पाताईंनी संधी ओळखत ...

जिल्ह्याची पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय झेप; ओडीपी प्लस कडे दमदार वाटचाल

  बुलढाणा, (जिमाका) दि. 20 :   जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत बुलढाणा जिल्ह्याने पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम मोहिमेत सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात ३ हजार ८७९ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ७५३ लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम पूर्ण केले असून एकूण प्रगती ९०.०२ टक्के इतकी झाली आहे. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित १२६ लाभार्थ्यांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्याला हागणदारीमुक्त अधिक(ODF Plus Model) बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १ हजार २५१ गावांपैकी १ हजार ३५ गावे ODF Plus दर्जा प्राप्त करण्यात यशस्वी झाली आहेत, तर उर्वरित २१६ गावांमध्ये कामे सुरू आहेत. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या बाबतीतही जिल्ह्याने भरीव कामगिरी केली आहे. एकूण गावांपैकी १ हजार १८२ गावांमध्ये घनकचर...

जनगणना 2027 : स्व-गणनेबाबत 15 दिवसांची विशेष जनजागृती मोहीम

  बुलढाणा, (जिमाका) दि. 20: जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रियेबाबत जनमानसामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रसिद्धी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. जनगणना कामकाजाचा एक भाग म्हणून नागरिकांना दि. 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना करणे अपेक्षित आहे. या प्रक्रियेबाबत अधिकाधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी प्रशासनाने व्यापक प्रसिद्धी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने दि. 20 एप्रिल 2026 पासून पुढील 15 दिवस स्व-गणनेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना स्व-गणना प्रक्रियेचे महत्त्व, पद्धत आणि आवश्यक सूचना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

    बुलढाणा, (जिमाका) दि. 20: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेस आता २५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या स्पर्धेसाठी “ डॉ. आंबेडकर यांचे महिलांविषयी कार्य व महिला सक्षमीकरणातील योगदान ” हा विषय निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या गटात शासकीय व खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी निबंधाची शब्दमर्यादा ५०० ते ८०० शब्दांची आहे. दुसरा खुला गट असून राज्यातील सर्व महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटांसाठी निबंध मराठी भाषेतच सादर करणे बंधनकारक आहे.   पूर्वी स्पर्धेचा कालावधी १४ एप्रिल ते २० ए...

बुलढाणा येथे शेळी, कुक्कुट व पशुपालन प्रशिक्षणाचे आयोजन; सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

    बुलढाणा, दि. 20(जिमाका): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) आणि जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत बुलढाणा येथे पार पडणार आहे.       प्रशिक्षणाचा उद्देश सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध ज्ञान मिळवून स्वतःचा उद्योग/व्यवसाय सुरू करावा हा आहे. प्रशिक्षणादरम्यान शेळीपालन, कुक्कुट व गाय/म्हैस पालनातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध जाती व त्यांची वैशिष्ट्ये, लसीकरण, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती, चाऱ्याचे प्रकार तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय उद्योजकता विकास, उद्योग संधी, शासकीय योजनांची माहिती आदी विषयांवर तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान 5 वी उत्तीर्ण, वय 18 वर्षे असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करण्...

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Image
   •          जनसंवाद कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त  •          महसूलमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद   बुलढाणा, दि. 20 (जिमाका): चिखली तहसील कार्यालय येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाने प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करुन सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत. कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिला.   जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त झाली. महसूलमंत्र्यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या. प्राप्त निवेदनांवर निर्णय घेण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयातच विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी आमदार स्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सद...

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

Image
    बुलढाणा, दि. 20 (जिमाका): केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त रूग्णाची आणि इतर   रुग्णालयातील रुग्णाना भेट घेवून रुग्णसेवेबद्दल विचारपूस केली.   देवदर्शनाला जात असतांना मोताळा तालुक्यातील भविकांच्या गाडीचा उत्तर प्रदेशातील गाजीपुर नंदगज येथे 9 एप्रील रोजी अपघात झाला होता. या अपघात दोन महीला ठार झाल्या. तर 38 प्रवासी जखमी झाले होते. गाजीपुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली, तर काहींनी   बुलढाणा येथे उपचार करीता आणण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज 20 एप्रील रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील उपचार घेत असलेल्या   गाजीपुर अपघातग्रस्त निर्मलाबाई पाखरे आणि भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधेबद्दल माहिती जाणून घेतली. सोबतच   वार्ड क्रमांक 2 मध्ये उपचार घेत असले...