Posts

राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी बुलढाणा पॅटर्न ठरणार आदर्श; तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा राज्यस्तरावर गौरव

  बुलढाणा दि.24 (जिमाका): महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राबविलेल्या 'सहज प्रणाली' या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचा मुंबई येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात गौरव सोहळा : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या वतीने २८ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात 'द्वितीय सेवा हक्क दिन' राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव यांच्या शुभहस्ते डॉ. किरण पाटील यांना सन्मानित केले जाईल. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 'सहज प्रणाली' ठरली दिशादर्शक: डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना सामान्य नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात, यासाठी 'सहज प्रणाली' हा नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत ...

शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित ​चिखली तहसीलदार विजय सवडे यांचे पात्र नागरिकांना आवाहन; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्जाची मुदत

    बुलढाणा दि. 24 (जिमाका): राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केले आहे. यानुसार, शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी झालेली निवासी अतिक्रमणे विशिष्ट अटींच्या अधीन राहून नियमित करण्यात येणार आहेत. चिखली तालुकयातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे. ​ या योजनेअंतर्गत केवळ राहण्याच्या उद्देशाने (निवासी) केलेली अतिक्रमणेच विचारात घेतली जातील. व्यावसायिक स्वरूपाची अतिक्रमणे यातून वगळण्यात आली आहेत. ​ क्षेत्रफळ व शुल्क आकारणी: ​ ५०० चौ. फुटांपर्यंत अतिक्रमण पूर्णपणे मोफत नियमित केले जाईल, ​ ५०० ते १५०० चौ. फुटांवरील अतिरिक्त क्षेत्रासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या १० टक्के शुल्क आकारले जाईल, ​ १५०० चौ. फुटांपेक्षा जास्त असलेले अतिक्रमण नियमित केले जाणार नाही, ते निष्कासित केले जाईल. ​ मालकी हक्कनियमित केलेली जमीन 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून प्रदान केली जाईल. अशी जमीन पुढील ५ वर्षांपर्यंत विक्री किंवा हस्तांतरित करता येणार नाही. संपूर्ण महारा...

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

  बुलढाणा दि. 24 (जिमाका): केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि निर्देशांकाच्या आधारावर राज्यस्तरावरुन राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे मुल्यांकन करण्यात आले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरी बर आधारित करुन या मुल्यांकनामध्ये बुलडाणा जिल्हयाने राज्यस्तरावर पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी मा. डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गुलाबराव खरात जिल्हा परिषद, डॉ. सुशिल बाकचीरे उपसंचालक, आरोग्य सेवा, अमोला मंडळ, अकोला डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दत्तात्रय विराजवार, जिल्हा शल्यचिकित्सक, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा गु‌ट्टे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. दिनांक २२/०४/२०२६ रोजी मा. केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. प्रतावराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा सभेमध्य...

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या बुधवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत ‘प्रवासी राजा दिन’ व दुपारी 3 ते 5 या वेळेत ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाच्या कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे. परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तत्काळ निराकरण करतील.   बुलढाणा विभागातील चिखली आगार येथे दि. 29 एप्रिल, खाम...

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान

  बुलढाणा दि. 23 (जिमाका): महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्या वतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यात मतदान प्रक्रिया रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महिला रुग्णालय, टी.बी. हॉस्पिटल परिसर, धाड रोड, बुलढाणा येथे मतदान होणार आहे. सदर निवडणूक प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी तसेच नोंदणीकृत डॉक्टर हे मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकूण २ हजार ६३५ मतदार असून प्रत्येक मतदाराला एकूण ९ मते देण्याचा अधिकार आहे. मतदारांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून एकूण ४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व केंद्रे लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स परिसरातच उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया ही गुप्त पद्धतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम १९६७ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (पहिली सुधारणा) नियम २००२ मधील तरतुदीनुसार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदान प्रक्र...

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

Image
  बुलढाणा दि. 23 (जिमाका): केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार व निर्देशांकांच्या आधारे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या मुल्यांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरीवर आधारित होते. या यशामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक (आरोग्य सेवा) अकोला मंडळ डॉ. सुशिल वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी प्रभावी कामगिरी बजावली. दरम्यान, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्याच्या या यशामुळे क्षयरो...

विशेष लेख : उन्हाळ्यातील जनावरांचे चारा व पाणी व्यवस्थापन

Image
  उन्हाळ्यातील कडक उन्हाचा आणि वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. या काळात जनावरांना 'हीट स्ट्रेस' (उन्हाचा ताण) जाणवतो, ज्यामुळे दूध उत्पादनात घट आणि आजार वाढतात. यासाठी खालीलप्रमाणे चारा आणि पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन :   उन्हाळ्यात जनावरांच्या शरीरातील पाण्याची गरज ५०% पर्यंत वाढते. त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी चोवीस तास उपलब्ध असावे. जर चोवीस तास पाणी देणे शक्य नसेल, तर दिवसातून किमान ५ ते ६ वेळा पाणी पाजावे. विशेषतः पहाटे आणि रात्री उशिरा भरपूर पाणी द्यावे.   पिण्याच्या पाण्याची टाकी सावलीत असावी जेणेकरून पाणी गरम होणार नाही. गरम पाणी जनावरे कमी पितात. चारा व्यवस्थापन : भर दुपारी जनावरांना चारा देणे टाळावे. उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावते. त्यामुळे चारा देण्यासाठी पहाटे सकाळी ६ पूर्वी आणि रात्री ९ नंतर या वेळा निवडाव्यात. नुसता वाळलेला चारा देऊ नये, त्यामुळे जनावरांना बद्धकोष्टतेचा त्रास होऊ शकतो. हिरवा व वाळलेला चारा ३:१ या प्रमाणात कुट्टी करून द्यावा. हिरव्या चाऱ्याची टंचाई असल्यास...