Posts

बुलढाणा जिल्ह्याला १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१ उपकेंद्रांची भेट; आरोग्य यंत्रणेने सकारात्मक भावनेतून जनसेवा करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Image
    बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जिल्ह्यात लवकरच १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५१ नवीन उपकेंद्र सुरू करण्यात येतील. आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा असून ती पुण्याचं काम म्हणून सकारात्मक भावनेतून करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक डॉ. सुशिल वाकचौरे, सहसंचालक पीपीटी डॉ.प्रसाद भंडारी, सहसंचालक डॉ. बाळासाहेब सोणवने, सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत, सहसंचालक पुणे डॉ. राजरत्न वाघमारे, अति.संचालक मुंबई डॉ. किरणकुमार वाघमारे,उप...

पशुधनासाठी १९६२ हेल्पलाईन ठरतेय जीवनवाहिनी; वर्षभरात ६४ हजार जनावरांना मिळाले जीवदान

    बुलढाणा दि. 22 (जिमाका ): पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेली '१९६२' ही टोल फ्री हेल्पलाईन आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना त्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर' मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.     पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. विशेषतः दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून त्यांच्यासाठी ही सेवा खऱ्या अर्थाने 'लाईफलाईन' ठरली आहे. अपघात, विषबाधा किंवा कठीण प्रसूती अशा आपत्कालीन स्थितीत कॉल आल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथ...

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

      बुलढाणा दि.22 (जिमाका): भारतीय हवामान विभागाने २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीचे निर्देश दिले आहेत.   राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते आणि पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या दर्जेदार चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश 'महाबीज' अकोला यांना ५ मे २०२६ पूर्वी देऊन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.   मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील पशुधनाची संख्या विचारात घेऊन स्वतंत्र 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा...

उष्णलहरींच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन; १९६२ टोल फ्री क्रमांकावर मिळणार तातडीची सेवा

    बुलढाणा दि. 22 (जिमाका): राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता आणि 'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने पशुपालक व कुक्कुटपालकांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा स्तरावरील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   उष्णलहरींच्या काळात पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणे, जीवनसत्त्वे आणि संतुलित आहाराचा समावेश असावा. विशेषतः शेती किंवा ओझे वाहणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या तीव्र उन्हाच्या काळात पूर्ण विश्रांती द्यावी आणि त्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे. गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा त्यावर गवत टाकून पाणी मारावे. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करून जनावरांच्या अंगावर पाण्याचा फवारा करावा. पशुधनामध्ये उष्म...

यशोगाथा एक पाऊल स्वावलंबनाकडे : रमाई बचत गटाची यशस्वी वाटचाल

    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात महिलांच्या आर्थिक विकासासाठी 2003 साली महिला बचत गटांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचे लोकसंचालित साधन केंद्र मिळाले आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागला. ही त्या यशस्वी महिलांपैकी एका बचत गटाची यशोगाथा आहे.   जळगाव जामोद तालुक्यातील सुणगाव हे एक छोटे गाव आहे. येथे विविध समाजातील लोक राहतात, परंतु आर्थिकदृष्ट्या मागासलेपण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. विशेषतः महिलांची स्थिती अधिक कठीण होती. या पार्श्वभूमीवर महिलांना संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.   दि. 10 ऑक्टोबर 2003 रोजी 10 गरजू महिलांना एकत्र करून “ रमाई स्वयं-सहाय्य महिला बचत गट ” स्थापन करण्यात आला. सुरुवातीला महिलांना बचत, बँक व्यवहार, कर्ज प्रक्रिया याबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.   बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रथम 1 हजार रुपये कर्ज मिळाले. त्यानंतर बँक व पंचायत समितीच्या सहाय्याने 25 हजार रुपये कर्ज मिळाले. य...

विशेष लेख : प्रधानमंत्री मातृवंदना योजना देशाचे भविष्यः सुदृढ माता-सुदृढ बालक

    कुपोषणामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आपल्या देशात दर तीन स्त्रियांमध्ये एक स्त्री कुपोषित आहे, तर दोन स्त्रियांमध्ये एक स्त्री रक्तक्षयग्रस्त(ॲनिमीक)असते. अशा स्त्रियांची जन्मलेली बालके कमी वजनाची असण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात, जेव्हा कुपोषण मातेच्या गर्भाशयातच सुरु होते, तेव्हा या बाबीचा   बाळाच्या जीवन चक्रावर परिणाम होतो. यामुळे संभावणाऱ्या दूरगामी परिणामांमध्ये सुधारणा करता येणे नंतर शक्य होत नाही.   आर्थिक व सामाजीक ताण-तणावामुळे खूप स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत काम करीत असतात. तसेच बाळाच्या जन्मानंतरही त्या लवकरच कामास सुरुवात करतात.   गरोदरपण आणि बाळाच्या स्तनपानाच्या कालावधीत त्यांच्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांची शारिरीक क्षमता पूर्वपदावर येण्यास बाधा निर्माण होते. परिणामी बाळाच्या पहिल्या सहामाहीत निव्वळ स्तनपान करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. बाळाच्या आरोग्याची पायाभरणी करण्याचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे या काळात बाळा सोबतच मातेचे आरो...

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा; सहसंचालकांची कुष्ठ कार्यालयास भेट

  बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठ) बुलढाणा कार्यालयास आज आरोग्य सेवा(कुष्ठ व क्षय, पुणे) सहसंचालक राजरत्न वाघमारे तसेच आरोग्य सेवा (राष्ट्रीय आरोग्य अभियान) मुंबई सहसंचालक डॉ. बी. एस. सोनावणे यांनी भेट दिली. भेटीदरम्यान कुष्ठरोग कार्यालयाकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्री. वाघमारे यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. कार्यालयातील दैनंदिन कामकाज, नव्या कुष्ठरुग्णांची नोंदणी, रुग्णांना MDT औषधोपचार पुरवठा तसेच DPMR नोंदींची पडताळणी करण्यात आली. तसेच, शासनातर्फे राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहिम (LCDC), कुसुम व स्पर्श अभियानांतील कामाचा आढावा घेण्यात आला. या मोहिमांदरम्यान कार्यालयाकडून वर्तमानपत्रे व सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. सहसंचालकांनी नव्या रुग्णांच्या शोधाबरोबरच रुग्णांच्या सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार (PEP) देण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजादरम्यान येणाऱ्या अ...