प्रत्येकांनी आरोग्याबाबत सजग राहावे: आरोग्य हीच खरी संपत्ती आहे – केंद्रीय आयुष , आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव
बुलढाणा, दि. 27 (जिमाका) : लहानपणापासून नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि संतुलित आहाराचा अवलंब केल्यास व्यक्ती निरोगी राहू शकते. मुलांनी बाहेरील जंकफूड, पिझ्झा तसेच रासायनिक पेयांपासून दूर राहून आरोग्याबाबत सजग राहावे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. शेगाव येथील विसावा मैदानावर चार दिवसीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन आयुष मंत्रालयाच्या वतीने करण्यात आल आहे आज 27 फेब्रुवारीला शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार व आरोग्य या विषयावर आयुर्वेदिक बाल आरोग्य तज्ञ वैद्य मैत्रीय सौरभ लिमये यांनी मार्गदर्शन केले तर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते ते पुढे म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी असल्यास देशाच्या विकासाला गती मिळते. निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरुण वर्ग कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनियमित दिनचर्या, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे पुढ...