Posts

शेगांव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

  बुलढाणा, दि. २ (जिमाका): माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या शेगांव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाच्या आदेश दि. १७ फेब्रुवारी २०२६ नुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग रचनामध्ये भास्तन, मच्छिद्रखेड, डोलारखेड, भोनगांव, पहूरपुर्णा, मनमगांव, गोळेगांव बु., पाडसुळ, आडसुळ, झाडेगांव, श्री क्षेत्र नागझरी, हिंगणा वेज, वरखेड बु., जवळा बु., जवळा पळ., गव्हाण, तित्रव, वरुड, तरोडा कसवा, शिरसगांव निळे, गायगांव बु., टाकळी विरो, चिंचोली का., अळसणा, सांगवा, जानोरी, तरोडा तरोडी, खेड, गोलखेड, पहूरजिरा, जलंब, मोरगांव दि., बेलूरा व माटरगांव बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार तहसिलदार यांनी गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीतून प्रभाग सीमा निश्चित करणे, तसेच तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे आदी टप्प्यांची कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रच...

२ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी, ३ हजार ८२७ जणांचे आधार सीडिंग प्रलंबित; प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांपैकी जिल्ह्यातील २ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी तर ३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित ई-केवायसी, आधार सीडिंग तसेच बँक खाते DBT Enable करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते DBT Enable नाही, त्यांनी India Post Payments Bank मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून DBT Enable करून घ्यावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून वार्षिक प्रत्येकी ६ हजार रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्य शासनाकडून वार्षिक प्रत्येकी ६,००० रुपये असे एकूण १२ हजार रुपये प्रतिवर्षी शेतकरी कुटुंबांना वितरित केले जात आहेत. या लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग करणे अत्यावश्यक असून, प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकरी लाभा...

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव;बुलडाण्यात विक्री प्रदर्शन, मिनी सरस ५ ते ९ मार्चदरम्यान

  PMFME योजनेंतर्गत खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विक्री प्रदर्शन, मिनी सरस व पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कृषी महोत्सव तसेच PMFME योजनेंतर्गत खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. ५ ते ९ मार्च २०२६ या कालावधीत जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे होणार आहे. अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व पौष्टिक तृणधान्यांचा प्रसार, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) आणि कृषी संलग्न विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत लाभार्थी व उत्पादक गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. कृषी महोत्सवात अन्नधान्य व पौष्टिक तृणधान्ये (नाचणी, ज्वारी, बाजरी आदी) यांचे प्रदर्शन व विक्री, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व स्वयं सहाय्यता गट (SHG) ...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविले

  बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार तसेच लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार यांचा समावेश आहे. सन 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी संबंधित पुरस्कारांकरिता शासनामार्फत दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पात्र व्यक्ती व संस्थांनी संबंधित पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत. अर्ज संबंधित कार्यालयाकडून प्राप्त चेकलिस्टनुसार प्रस्ताव तयार करून चार प्रतींमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा यांच्या कार्यालयात दि. 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत. सदर अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयात उपलब्ध असून महाराष्ट्र शा...

शेगाव तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ • एकाच छताखाली मिळणार १५ विभागांच्या सेवा

    • ५ मंडळांत शिबिर   • महसूल प्रशासनाचा लोकाभिमुख उपक्रम बुलढाणा (जिमाका), दि. ०२ : सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या शासकीय कामांमधील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत “ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ ” शेगाव तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी खामगाव उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तहसील कार्यालय, शेगाव येथे विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबवले जात आहे. शेगाव तालुक्यातील   जवळा बु. मंडळ येथे 7 मार्च रोजी, 14 मार्चला जलंब मंडळ, 10 एप्रिलला मनसगाव मंडळ, 8 मेला   शेगाव (शहर) मंडळ तर 15 मे रोजी माटरगाव मंडळ येथे शिबिर होणार आहे. या विशेष शिबिरात महसूल विभागासह महिला व बालविकास, आरोग्य विभाग, सहकार विभाग, निवडणूक विभाग, नगर पालिका, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, वन विभाग, महाराष्ट्र राज्य व...

प्रत्येकांनी आरोग्याबाबत सजग राहावे: आरोग्य हीच खरी संपत्ती आहे – केंद्रीय आयुष , आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Image
    बुलढाणा, दि. 27 (जिमाका) : लहानपणापासून नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि संतुलित आहाराचा अवलंब केल्यास व्यक्ती निरोगी राहू शकते. मुलांनी बाहेरील जंकफूड, पिझ्झा तसेच रासायनिक पेयांपासून दूर राहून आरोग्याबाबत सजग राहावे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.   शेगाव येथील विसावा मैदानावर चार दिवसीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन आयुष मंत्रालयाच्या वतीने करण्यात आल आहे आज 27 फेब्रुवारीला शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार व आरोग्य या विषयावर   आयुर्वेदिक बाल आरोग्य तज्ञ वैद्य मैत्रीय सौरभ लिमये यांनी मार्गदर्शन केले तर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते ते पुढे म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी असल्यास देशाच्या विकासाला गती मिळते. निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरुण वर्ग कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनियमित दिनचर्या, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे पुढ...

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानास मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा निर्धार

    बुलढाणा, दि. 27 (जिमाका): राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “ माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ” या महत्त्वाकांक्षी अभियानास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लोकसहभागावर आधारित ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहे.   गावपातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देणे, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सामाजिक प्रबोधन तसेच विविध विभागांच्या समन्वयातून “ आरोग्यदायी गाव ” घडविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.   या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणा, पोषण, स्वच...