अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा; राज्य शासनाकडून १४ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर; बुलढाणा जिल्ह्यासाठी २ कोटी २७ लाखांचा भरीव निधी मंजूर
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा; राज्य शासनाकडून १४ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर; बुलढाणा जिल्ह्यासाठी २ कोटी २७ लाखांचा भरीव निधी मंजूर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती बुलढाणा,दि.12 (जिमाका) : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे एप्रिल २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, एकूण १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने होणार असून, मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. नुकताच निर्गमित झालेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे २ हजार २२० बाधित शेतकऱ्यांना (१,३३५ हेक्टर) २ कोटी २७ लाख ३२ हजार रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. ...