एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन
बुलढाणा, दि. 19 (जिमाका): भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या खरीप हंगामात एल-निनो (El-Nino) च्या प्रभावामुळे सरासरी पावसाच्या तुलनेत ७ ते ८ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान अंदाजाचा विचार करता, शेतकऱ्यांनी मान्सूनच्या सुरुवातीच्या पहिल्या-दुसऱ्या पावसानंतर लगेचच पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत परिसरात किमान ७५ ते १०० मि.मी. इतका समाधानकारक पाऊस होत नाही आणि जमिनीत किमान ६ ते ७ इंच खोलपर्यंत पुरेशी ओल जात नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. कमी पावसावर केलेली पेरणी उगवण क्षमतेवर परिणाम करते आणि पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. कृषी विभागाने यंदाच्या हंगामात खालील गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे, ज्याचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने करावा. शेतकऱ्यांनी जमिनीच्या उताराला आडवी पेरणी करावी, ज्यामुळे मातीची धूप थांबेल आणि पाणी जमिनीत जिरेल तसेच शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राचा वापर करून पेरणी करावी. कमी पावसाच्या परिस्थितीत सऱ्यांमध्ये ओलावा टिकून राहत असल्यामुळे पाऊस लांबला तरी पिके सुकत नाहीत. जास्त पाऊस झाल्यास सऱ्यांमधून जास्तीचे पा...