Posts

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड

Image
  जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध , दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री , मृद व जलसंधारण , महाराष्ट्र शासन   पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे , ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन , शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.   महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून , त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून , त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना र...

'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon) मध्ये सहभागी होण्याचे आमदार श्वेता महाले यांचे आवाहन

  जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या 'मृद व जलसंधारण विभागा'तर्फे आयोजित केलेल्या भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon) मध्ये सहभागी होण्याचे आमदार श्वेता महाले यांचे आवाहन #बुलढाणा #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026

भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon) मध्ये सहभागी होण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे आवाहन !

  जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या 'मृद व जलसंधारण विभागा'तर्फे आयोजित केलेल्या भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon) मध्ये सहभागी होण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे आवाहन ! #बुलढाणा #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ साजरा

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ साजरा     बुलढाणा,दि.20 (जिमाका):    जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंतीनिमीत्त देशभर सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना सद्भावना दिवसाची शपथ दिली.   यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, अजिक्य घोडके, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. ००००

पिंप्री गवळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा;

  पिंप्री गवळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा; ‘ माझे गाव, आरोग्य संपन्न गाव ’ अभियानांतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन   बुलढाणा दि.20(जिमाका) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव ’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंप्री गवळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर १७ व १८ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.   गावातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक, सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे, आजारांचे प्रतिबंध व लवकर निदान करणे तसेच आरोग्य व्यवस्थापनात समुदायाचा सक्रिय सहभाग वाढविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तसेच सहाय्यक जिल्हा आरोग्...

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार

  मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर;   अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार              बुलढाणा, दि. 20(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने वेळापत्रकात ही सुधारणा करण्यात आली आहे.               सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टो...

जलसंधारण दिन विशेष लेख - वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

  जलसंधारण दिन विशेष लेख                                              वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प   विदर्भ म्हणजे दुष्काळी प्रदेश , विदर्भ म्हणजे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा प्रदेश असे सारे नकारात्मक बोलले जात असताना आता हाच विदर्भ येत्या काळात सुजलाम- सुफलाम असा संपन्न प्रदेश होणार आहे. या प्रदेशावरील नकारात्मकतेचा हा डाग पुसून काढण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि जिद्दीने वैनगंगा - नळगंगा प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने त्यांनी पावले उचलली. प्रामुख्याने कोरडवाहू शेती असलेल्या विदर्भात पावसाच्या अनियमिततेमुळे निसर्गावर अवलंबून असलेली शेती तोट्यात येते आणि बळीराजा संकटात  सापडतो. गेले कित्येक वर्षे हे असेच सुरू आहे. त्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते. दोन टोकांवरील दोन नद्या जोडणे हा त्यावर उपाय होता मात्र हे आव्हान सोपे नव्हते.   मुख्यमंत...