Posts

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

    बुलढाणा, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासनाने बीजभांडवल योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.   योजनेअंतर्गत भाजी स्टॉल, चहा-स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स-लॅमिनेशन सेंटर, फ्रुट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मालवाहतूक टेम्पो, आईसक्रिम फॅक्टरी, वडा-पाव व ज्युस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन-मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे तसेच लाँड्री व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना प्लंबर, फ्रिज दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, टीव्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, स्मार्ट खेळणी तयार करणे, ए.सी. दुरुस्ती, गॅस शेगडी दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, वॉटर हिटर, गिझर व वॉटर फिल्टर दुर...

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी १०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता

  बुलढाणा, दि. 18 (जिमाका): जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता सन २०२५-२६ या वर्षासाठी पाणीटंचाई निवारणार्थ स्त्रोत बळकटीकरण अंतर्गत रिचार्ज शाफ्ट उपाययोजनांना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील २० गावांमध्ये एकूण १२७ रिचार्ज शाफ्ट कामांसाठी १ कोटी ५ लाख ३१ हजार १६८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, बुलढाणा यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार संबंधित तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच सहाय्यक व कनिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या शिफारशींनंतर या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर गावांमध्ये चिखली तालुक्यातील धोडप, लोणार तालुक्यातील सुलतानपूर, सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड, खामगाव तालुक्यातील हिवरा बु. व अटाळी, शेगाव तालुक्यातील गायगाव खुर्द, जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर व चालठाणा, संग्रामपूर तालुक्यातील सावळा, मलकापूर तालुक्यातील शिराढोण, वजीराबाद, वाघोड, मोरखेड, दसरखेड, भाडगणी, कुंड खुर्द, खडकी, धरणगाव, जांभूळ धाबा तसेच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड या गावांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी देताना विविध अटी व...

जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १४२ विंधण विहिरी व २७ कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी

    बुलढाणा, दि. 18 (जिमाका ): जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सन २०२५-२६ साठी ११७ गावांमध्ये १४२ विंधण विहिरी तसेच १९ गावांमध्ये २७ कुपनलिका मंजूर केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णय दि. ३ फेब्रुवारी १९९९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून या उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.   मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सादर केलेल्या प्रस्तावांना संबंधित तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच सहाय्यक भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन शिफारस केली होती. त्यानुसार चिखली, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा, बुलढाणा, जळगाव जामोद, मेहकर आणि नांदुरा तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.   संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक कुपनलिका मंजूर करण्यात आल्या असून दयालनगर, शिवनी, लोहगाव बु., करमोडा, मारोड यांसारख्या गावांमध्ये एकापेक्षा अधिक कुपनलिका मंजूर झाल्या आहेत. बुलढाणा तालुक्यात सागवण येथे ५ विंधण विहिरी, रायपूर व घाड येथे प्रत्येकी २ विंधण विहिरी मंजूर करण्यात आल्या ...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन

    बुलढाणा, दि. 18 (जिमाका): सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी “ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ” राबविण्यात येत आहे.             शासन निर्णय क्रमांक जमीन-२०१५/प्र.क्र.६४/अजाक, दिनांक १४ ऑगस्ट २०१८ अन्वये ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन कमाल प्रतिएकर ५ लाख रुपये किंमतीपर्यंत किंवा २ एकर ओलीताखालील (बागायती) जमीन कमाल प्रतिएकर ८ लाख रुपये किंमतीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक असून तो दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन असावा. लाभार्थ्यांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ६० वर्षे असावे. लाभार्थी निवडीत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परित्यक्ता महिला, विधवा महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्तांना प्राधान्य देण्यात य...

जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न; नियोजित उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

Image
    बुलढाणा, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यात आगामी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून *मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक* पार पडली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्व यंत्रणांच्या सज्जतेचा सविस्तर आढावा घेऊन, आराखड्यातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मान्सून काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि विविध विभागांचे जिल्हा प्रमुख दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देताना जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगित...

मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

    बुलढाणा, दि. 15 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.   बीएलओच्या प्रत्यक्ष घरांना भेटी : महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (BLO)नियुक्त करण्यात   येणार आहे.   हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले 'बूथ लेव्हल एजंट्स' (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.   जनगणनेच्या कामाशी सांगड : सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू ...

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर

    बुलढाणा, दि. 15 (जिमाका): पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विविध विभागांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.   राज्य शासनाच्या प्रस्तावित उपाययोजनांमध्ये परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापर वाढविणे, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, तसेच डिजिटल माध्यमातून बैठका घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.   शासकीय अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते रद्द करण्यात येणार असून, नव्या दौऱ्यांचे नियोजन टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाहनांच्या वापरात कपात करून कारपूलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचेही सुचविण्यात आले आहे.   मंत्रालय स्तरावरील, विभागीय स्तरावरील व जिल्हा स्तरावरील ...