- Get link
- X
- Other Apps
Posts
‘माय भारत' पोर्टलवर युवकांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम; मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
बुलढाणा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यातील १५ हून अधिक वयोगटातील जास्तीत जास्त युवकांना 'माय भारत' पोर्टलशी जोडण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत माय भारत तीव्र नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवून काम करावे आणि नोंदणी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे माय भारत तीव्र नोंदणी मोहीमेची प्रभावी नियोजन व अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा अधिकारी दिक्षा पोमण, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, अग्रीम बँकेचे एलडीएम कौशलेन्द्र कुमार सिंह, शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकाळ, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी गजानन लोहटे आदी उपस्थित होते. या मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील युवकांपर्यंत पोहोचून त्यांना या डिजिटल पोर्टलवर नोंदणीकृत करणे हा आहे. यासाठी जिल्ह्...
विशेष वृत्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी
- Get link
- X
- Other Apps
बुलढाणा दि. 9 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कृषी कर्जाशी संबंधित सर्व माहिती अचूक व अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. कर्ज खाते, आधार क्रमांक, बँकेतील तपशील आणि इतर आवश्यक माहितीमध्ये विसंगती असल्यास लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. जनेत निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार पात्र कृषी कर्जदारांचा समावेश करण्यात येणार असून, माहितीची विविध स्तरांवर पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी संबंधित बँक किंवा संस्थेकडे आवश्यक माहिती योग्य प्रकारे उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि अचूक पद्धतीने करण्यासाठी डिजिटल पडताळणीसह विविध प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. बँका आणि संबंधित संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पात्रतेची खातरजमा केली जाईल. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याशी संबंधित नोंदी वेळोवेळी तपासाव्यात. आवश्यक असल्यास संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करून घ्यावी. योग्य माहिती आणि वेळेत आवश्य...
पुरस्कार अर्जासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ; इच्छुक व्यक्ती व संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणाऱ्या चार राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्यास १५ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक दिपाली पाडवी यांनी केले आहे. या पुरस्कारांमध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार यांचा समावेश आहे. समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी कलात्मक समाजप्रबोधन, साहित्य, समाजसेवा तसेच जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधनकार, समाजसेवक आणि सामाजिक संस्थांचा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार आहे. विशेषतः विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटक, आध्यात्मिक प्रबोधनकार, साहित्य...
बुलढाण्याची निर्यातीत ऐतिहासिक भरारी; १,०५१ कोटींचा विक्रम • अमरावती विभागात सलग अव्वल • पाच वर्षांत १४६ टक्क्यांची झेप
- Get link
- X
- Other Apps
बुलढाणा दि.8 (जिमाका): बुलढाणा जिल्ह्याने आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत निर्यातीत प्रथमच १,०५१ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील या विक्रमी कामगिरीमुळे बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील उदयोन्मुख निर्यात केंद्र म्हणून अधिक ठळकपणे पुढे आला आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४७.४ टक्के वाटा एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा असून, विभागात जिल्ह्याने सलग अव्वल स्थान कायम राखले आहे. पाच वर्षांत १४६ टक्क्यांची विक्रमी वाढ जिल्ह्याच्या निर्यातीत गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४२८ कोटी रुपये असलेली निर्यात २०२५-२६ मध्ये १,०५१ कोटी रुपयांवर पोहोचली असून, या कालावधीत १४६ टक्क्यांची एकत्रित वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षातील ८७४ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा २०.३ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढल्याचे हे महत्त्वपूर्ण द्योतक मानले जात आहे. विभागाच्या निर्यातीत बुलढाण्याचे वर्चस्व अमरावती विभागातील एकूण २,२१८ कोटी रुपयांच्या निर्य...
अमडापूर येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण; ‘कसं काय?’ मोहिमेअंतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर
- Get link
- X
- Other Apps
बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : राज्य शासनाच्या 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'कसं काय?' मोहिमेच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चिखली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत आरोग्य विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्थेचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य व कल्याण केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविणे तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. निलेश जाधव व वैद्यक...