Posts

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर विदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

    बुलढाणा दि.28 (जिमाका): विदर्भात सध्या उष्णतेची लाट जाणवू लागली असून बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोमवारी जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद ४३.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून, सरासरीच्या तुलनेत तापमानात ४ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.   भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याचे किमान तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता सायंकाळच्या सुमारास २१ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा प्रभाव अधिक जाणवत आहे.   संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. सोमवारी विदर्भातील विविध शहरांमधील तापमानाची स्थिती खालीलप्रमाणे राहिली: विदर्भातील अमरावती (४६.६ C) आणि वर्धा (४६.५ ° C) ही शहरे सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. त्यानंतर अकोला येथे ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ४५.० अंश, चंद्रपूरमध्ये ४५.२ अंश आणि यवतमाळमध्ये ४५.२ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. गोंदिया (४१.० ° C) आणि भं...

सुधारित : पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

                बुलढाणा,दि.28 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 29 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणार असून विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.               त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता मुबई येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. गुरुवार दि. 30 रोजी 11 वाजता अभ्यागतांसाठी राखीव, दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम-2026 आढावा, टंचाई, पांदण रस्ते आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता पेनटाकळी प्रकल्पाअंतर्गत मौजे देवदरी ता. चिखली या गावाचे पुनर्वसनाबाबत बैठक. दुपारी 3 वाजता खडकपुर्णा प्रकल्पाअंतर्गत विविध विषयांबाबत बैठक व दुपारी 4 वाजता जिगाव प्रकल्पाबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या तरतुदीनुसार शास...

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई,हनवतखेड व गिरडा गावासाठी टँकर मंजूर

              बुलढाणा दि.28 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, हनवतखेड व गिरडा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.   पिंपळगाव सराई येथे 592 पशुधन व 5 हजार 592 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 1 लाख 29 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. हनवतखेड येथे 179 पशुधन व 438 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 14 हजार 420 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. गिरडा येथे 330 पशुधन व 1 हजार 16 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 24 हजार 920 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अ...

महाडीबीटीद्वारे बियाणे व पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

    बुलढाणा दि.28 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भर अभियान तसेच राष्ट्रीय खाद्य तेल (गळीतधान्य) अभियान सन 2026-27 अंतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण हे घटक राबविण्यात येणार आहेत.   या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून, त्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन संबंधित घटकासाठी अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. 00000

पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा; महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाला उपस्थिती

            बुलढाणा,दि.27 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 29 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणार असून विविध विभागांचा आढावा घेणारआहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.                 त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता मुबई येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. गुरुवार दि. 30 रोजी 11 वाजता अभ्यागतांसाठी राखीव, दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम-2026 आढावा, टंचाई आढावा, पांदण रस्ते आढावा बैठक. दुपारी 3 वाजता खडकपुर्णा प्रकल्पाअंतर्गत विविध विषयांबाबत बैठक व दुपारी 4 वाजता जिगाव प्रकल्पाबाबत आढावा बैठक स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा. सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पदाधिकारी यांची बैठक.           ...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

  बुलढाणा दि.27 (जिमाका): मातंग समाज तसेच तत्सम बारा पोटजातीतील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय बुलढाणा (मर्या) यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार दि. 5 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात येणार आहे.                 सदर कार्यशाळेचा मुख्य उद्देश मातंग समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणे, त्यांचा लाभ मिळवून देणे तसेच समाजाचे जीवनमान उंचावणे हा आहे. या कार्यशाळेत विविध योजनांबाबत मार्गदर्शन, शंका निरसन आणि लाभार्थ्यांसाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत माहिती दिली जाणार आहे. मातंग व मांग समाजातील नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दि. शं. पाखमोडे यांनी केले आहे. 0000

उष्णतेच्या लाटेत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीचे निर्देश; नियोक्त्यांना उपाययोजना राबविण्याचे आवाहन

  बुलढाणा दि.27 (जिमाका): राज्यासह देशभरात वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कामगार व मजूर वर्गाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विशेषतः बांधकाम, औद्योगिक, खाण व इतर क्षेत्रांतील कामगार उष्णतेच्या जोखमीला सामोरे जात असल्याने त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग, बांधकाम कंपन्या व संबंधित आस्थापनांना कामगारांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कामाच्या वेळांमध्ये आवश्यक ते बदल करून उष्णतेच्या तीव्र काळात काम टाळण्याचे, तसेच कामगारांना स्वच्छ पिण्याचे पाणी, सावली व विश्रांतीची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्राथमिक उपचार साहित्य, आईस पॅक व उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक साधने उपलब्ध ठेवण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करण्यावरही भर देण्यात ...