Posts

जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती- पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील • पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण

Image
    •           पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन   बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.   पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ ना...

“माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हाभर एनसीडी तपासणी शिबिरांचे यशस्वी आयोजन

    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : “ माझे गाव, आरोग्य संपन्न गाव ” या अभियानांतर्गत जिल्हाभर असंसर्गजन्य रोग (NCD) तपासणी शिबिरांचे व्यापक व यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. शिबिरांमध्ये नागरिकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, अॅनिमिया, ईसीजी, कर्करोग तसेच सिकल सेल तपासणी करण्यात आली. गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.   किशोरवयीन मुलींमध्ये HPV लसीकरणाबाबत जनजागृती व समुपदेशन करण्यात आले असून लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघात (Heat Stroke) प्रतिबंधासाठी आवश्यक सूचना देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.   विविध तालुक्यांत शिबिरांचे आयोजन   चिखली तालुका : प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री खेडेकर, एकालारा तसेच उपकेंद्र मंगरूळ नवघरे आणि धोत्रा नाईक येथे शिबिरे आयोजित करण...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

Image
                बुलढाणा, दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार व निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 000000

पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

Image
    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी शेत पाणंद रस्ते हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.   जिल्ह्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, यांच्यासह उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून ‘अलर्ट मोड’वर कार्य करावे. पाणंद रस्त्यांची कामे हाती घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. यासाठी नियमित बैठका घेऊन कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात. शेतकऱ्यांच्या दळणवळणाची सुविधा सुलभ...

पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री ना. मकरंद पाटील • 729 गावे टंचाईग्रस्त घोषित

Image
    •           18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तर 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित   बुलढाणा, दि.30 (जिमाका) : ‘अल नीनो’च्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जलस्रोतांचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.   नियोजन भवन येथे पाणी टंचाईचा आढावा बैठकीत पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री ना. पाटील यांनी पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये नागरिकांना नियमित व पुरेशा ...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 मे रोजी

    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी आणि प्रशासकीय अडचणींचे वेळेत निराकरण करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवार दि. 4 मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’ आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडण्यासाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   अर्जासाठी निकष : लोकशाही दिनात तक्रार सादर करताना नागरिकांनी विहित अर्ज केवळ शासनाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातच असावा, तक्रार किंवा निवेदन केवळ वैयक्तिक स्वरूपाचे असावे (सामूहिक स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत), अर्जाच्या दोन प्रती, संबंधित लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे.               तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हा स्तरावर, तर जिल्हा स्तरांनंतर २ महिन्यांनी विभागीय आणि त्यानंतर २ महिन्यांनी मंत्रालयीन स्तरावर अर्ज करता येईल. कोणत्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत. त...

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक - पालकमंत्री मकरंद जाधव पाटील • जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

Image
    बुलढाणा, दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६' चा समारोप समारंभ संपन्न झाला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.   यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पालकमंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की, जलसाक्षरतेसाठी काढण्यात आलेली 'गोदावरी-नर्मदा जलदिंडी' ही केवळ एक यात्रा नसून, ते जलसंधारणाच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाचा जो वारसा दिला, तोच पुढ...