Posts

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद   ·           सहा विभागांना याच महिन्यात भेटी ·           विद्यार्थी ,   उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद   बुलढाणा, दि.8 (जिमाका) :   राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित ,   पारदर्शक ,   विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.               या भेटीदरम्यान विद्यार्थी ,   स्पर्धा परीक्षा उमेदवार ,   पालक ,   शिक्षक ,   शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना ,   अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. ...

वानखेड(संग्रामपूर) येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

  वानखेड(संग्रामपूर) येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न   बुलढाणा, दि.7 (जिमाका) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ‘कसं काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वानखेड(संग्रामपूर) येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा १ व २ सप्टेंबर तसेच ३ व ४ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आली.   ग्रामीण नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील तसेच...

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन पदांसाठी अर्ज मागविले

  मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन पदांसाठी अर्ज मागविले   बुलढाणा, दि. ७ (जिमाका): सेवागिरी बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा, जि. बुलढाणा येथे तासिका तत्त्वावर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक विषय शिकविण्यासाठी शिल्प निदेशकांची दोन पदे भरण्यात येणार आहेत. पात्र शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.   संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या पदाचे एक आणि तारतंत्री (वायरमन) या पदाचे एक पद रिक्त आहे.   COPA पदासाठी संगणकशास्त्र/आयटीमधील बी.व्होक. किंवा पदवी, संगणकशास्त्र/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/आयटीमधील पदव्युत्तर पदवी, बी.व्होक./पदवीसोबत पीजीडीसीए, मान्यताप्राप्त संस्थेचा संगणकशास्त्र/आयटीमधील तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा DGTचा संबंधित अॅडव्हान्स्ड डिप्लोमा, तसेच NTC/NAC + CITS in COPA यापैकी पात्रता आवश्यक आहे.   तारतंत्री (वायरमन) पदासाठी विद्युत/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीतील बी.व्होक./पदवी, AICTE मान्यताप्राप्त संस्थेचा तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा D...

जिल्हाधिकारी कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक   यांना अभिवादन   बुलडाणा, दि. 7 (जिमाका) :   आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यां ना   जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात   अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सुरेश थोरात, समाधान गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 000000

इंडिया स्किल्स स्पर्धेमध्ये कौशल्य दाखविण्याची युवकांना संधी

  इंडिया स्किल्स स्पर्धे मध्ये कौशल्य दाखविण्याची युवकांना संधी ६३ कौशल्य प्रकारांचा समावेश; जिल्ह्यातील युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन   बुलडाणा, दि. 7 (जिमाका) : विविध क्षेत्रांतील कौशल्य असलेल्या युवकांना आपले कौशल्य राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळणार असून, इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ (India Skills Competition) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील कौशल्यवान युवकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.   या स्पर्धेत रंगकाम, मातीकाम, सुतारकाम, शेती, दागिने बनविणे, राजमिस्त्री काम, फॅशन टेक्नॉलॉजी, छायाचित्रण, चित्रकला, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डिंग, बेकरी, सौंदर्यशास्त्र, आरोग्य व सामाजिक कार्य, हॉटेल व्यवसाय, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, माहिती तंत्रज्ञान, दंत चिकित्सा आदी एकूण ६३ कौशल्य प्रकारांचा समावेश आहे.   शिक्षणापेक्...

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी

 बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन बुलढाणा, दि. ६ : बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पावसाने दडी मारलेल्या भागांमध्ये अनुकूल हवामान परिस्थिती असल्यास कृत्रिम पर्जन्य (Cloud Seeding) प्रयोग तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ५ सप्टेंबर रोजी ई-मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन पाठविले. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्याच्या कालावधीतील पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास पिकांसोबतच जलसाठे आणि भूजल पुनर्भरणावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर पाऊस न झाल्यास हातातोंडाशी आलेला पिकांचा घास शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे, असे निवेदनात...

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’; कामगिरीवर ठरणार अधिकाऱ्यांची पुढची जबाबदारी!

 आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’; कामगिरीवर ठरणार अधिकाऱ्यांची पुढची जबाबदारी!  > जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन; उत्कृष्ट काम करणाऱ्यांना संधी, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य. बुलढाणा दि.6 : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीच्या आधारे अधिकाऱ्यांना संधी देण्याची नवी कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच पुढील तीन वर्षात काय करणार याचे नियोजन याचा भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळीही केला जाणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात केवळ सेवाज्येष्ठतेला नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला महत्त्व मिळणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिक...