Posts

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

Image
  बुलढाणा, दि. ३१ (जिमाका): प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला गती देत जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी कौतुकास्पद पुढाकार घेत एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले आहे. निक्षय मित्र म्हणून त्यांनी रुग्णाच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या 'निक्षय मित्र' (Ni-kshay Mitra) उपक्रमांतर्गत टीबी रुग्णांना औषधोपचारासोबत सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने श्री. खरात यांनी रुग्णाला पोषण आहाराचे किट सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शिवकर भारसाकळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा तसेच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेडकर उपस्थित होते. पोषण आहार किटमध्ये काय? : दत्तक कालावधीत दरमहा रुग्णाला देण्यात येणाऱ्या न्यूट्रिशन किटमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, डाळ, खाद्यतेल तसेच दूध किंवा दूध पावडर यांच...

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावाबुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा

Image
    •           जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा   •           तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना,   •           नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश बुलढाणा, दि. 31(जिमाका): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या...

जिल्ह्यात दमदार पाऊस; प्रशासन हायअलर्टवर, नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

Image
    बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. पावसामुळे बाधित झालेल्या सर्व नागरिकांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले आहे.   जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, अनेक भागांमध्ये अद्यापही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.   सततच्या पावसामुळे उभी पिके, घरे तसेच विविध पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू केले आहेत. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवून असून पूरपरिस्थितीचा सातत्याने आढावा ...

बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग' नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

Image
  बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) :   बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी रोखणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देणे आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात 'नो पार्किंग' नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर संयुक्त पथकाद्वारे कठोर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात बुलढाणा एसटी आगारात पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि खासगी प्रवासी वाहतूकदार यांची संयुक्त जनजागृती व समन्वय बैठक पार पडली. बैठकीत कायद्याचे पालन, वाहतूक शिस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला. बैठकीला शहर पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप भोस, उपपोलीस निरीक्षक भूषण पाटील, सहाय्यक वाहन निरीक्षक राधिका चव्हाण, एसटी महामंडळाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर तसेच आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग उपस्थित होते. बैठकीत बसस्थान...

चारचाकी वाहन मासिक भाडेतत्त्वावर देण्यासाठी सिलबंद निविदा मागविल्या; ५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  बुलढाणा दि.31 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाज व दौऱ्यांसाठी चालक व इंधनासह चारचाकी वाहन मासिक भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यासाठी इच्छुक सेवा पुरवठादारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. संबंधित निविदा ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन ज्ञापनानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास वाहन भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कार्यालयातील गठित समितीने दरमहा ३ हजार किलोमीटरपर्यंत वापरासाठी चारचाकी वाहन भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक सेवा पुरवठादारांनी विहित नमुन्यातील दरपत्रकासह PUC, पॅनकार्ड, वाहन चालकाचा परवाना, विमा, आरसी बुक, टुर्स अँड ट्रॅव्हल्स नोंदणी प्रमाणपत्र व जीएसटी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वाहन हे पहिल्या मालकीचे व पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीतील असावे. अलीकडे खरेदी केलेल्या...

पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

Image
    •           1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर •            49 हजार 047 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण बुलढाणा, दि. 31(जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात तसेच ऑनलाईनव्दारे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, सर्व उपविभागीय अध...

‘पराक्रम दिन’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व फिल्म स्पर्धांचे आयोजन; शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

  बुलढाणा दि.31 (जिमाका): महाराष्ट्र सैनिक, जुनी व माजी सैनिक प्रतिष्ठान (अमर) यांच्या वतीने भारतीय सैन्याच्या शौर्यगाथा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ‘पराक्रम दिन’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि लघुपट (फिल्म) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहेत. पराक्रम दिन साजरा करण्यामागील उद्देश राज्यातील वीर सैनिकांच्या कार्याचा गौरव करणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य, त्याग आणि कर्तव्यभावना रुजविणे हा आहे. या स्पर्धांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. निबंध स्पर्धेत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत जास्तीत जास्त १,००० शब्दांचा निबंध लिहून तो पीडीएफ स्वरूपात संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत पाच मिनिटांचे भाषण तयार करून त्याचा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. फिल्म स्पर्धेत मोबाईल किंवा कॅमेऱ्याद्वारे जास्तीत जास्त तीन मिनिटांचा लघुपट तयार करून तोही संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल. लघुपटासाठी क...