Posts

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील भूमिहीनांना मोफत शेतजमीन

  अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील भूमिहीनांना मोफत शेतजमीन   कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ; प्रस्ताव ५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन   बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात दि. ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.   या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये जिरायती जमीन कमाल ४ एकरपर्यंत असून जमिनीची किंमत कमाल ५ लाख रुपये प्रति एकर इतकी मर्यादित आहे. तसेच बागायती जमीन कमाल २ एकरपर्यंत असून तिची किंमत कमाल ८ लाख रुपये प्रति एकर इतकी निश्चित करण्यात आली आहे.   लाभार्थी निव...

मुलींनी एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा : गुलाबराव खरात

  मुलींनी एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा : गुलाबराव खरात   गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन   बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) : महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण अत्यंत उपयुक्त आहे. बुलढाणा जिल्ह्यात मार्च २०२६ पासून एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत १४ ते १५ वर्षे वयोगटातील पात्र मुलींना एचपीव्ही लस देण्यात येत आहे. पालकांनी आपल्या मुलींना या लसीकरणाचा लाभ देऊन त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले.   गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एचपीव्ही संसर्गामुळे होऊ शकतो. या आजारापासून प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत असून, शाळा, अंगणवाडी केंद्रे तसेच शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे.   पात्र मुलींना लस मिळावी यासा...

धामणगाव बढे येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

  धामणगाव बढे येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न   ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ संकल्पनेतून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यावर भर   बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव बढे, ता. मोताळा येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.   दि. २० व २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या कार्यशाळेत ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक, सुलभ आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसेच ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.   राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे....

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन;अफवांवर विश्वास ठेवू नये

  शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन;अफवांवर विश्वास ठेवू नये     *प्रशासकीय नियंत्रण, मालकी व व्यवस्थापन शासनाकडेच; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थेसोबत सामंजस्य करार   बुलढाणा, दि. ३१ (जिमाका) : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात आल्याच्या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसून, ही माहिती गैरसमजातून प्रसारित झालेली असल्याचे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे. वसतिगृहांची मालकी, नियंत्रण आणि संपूर्ण प्रशासकीय कारभार शासनाकडेच असून, कोणत्याही खासगी संस्थेला वसतिगृहांच्या इमारती, मालमत्ता अथवा प्रशासकीय व्यवस्थापनाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत.   राज्यात आदिवासी विकास विभागाची ४९० शासकीय वसतिगृहे असून, त्यांची विद्यार्थी क्षमता ६५ हजार ८४ इतकी आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने नागपूर येथील कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा कालावधी १५ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२८ असा तीन वर्षांचा आहे. ...

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २ सप्टेंबरला सोडत

  शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २ सप्टेंबरला सोडत   बुलढाणा, दि. ३१(जिमाका) : राज्य शासनाच्या ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र शेतकऱ्यांना युरोप व चीन या देशांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त पात्र अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.   या अभ्यास दौऱ्याचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यातीच्या संधी तसेच कृषी बाजार व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. परदेशातील प्रगत कृषी पद्धतींचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.   या योजनेसाठी प्राप्त झालेल्या पात्र अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, घाट...

नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन* *आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे निर्देश* *बुलढाणा, दि. 27 (जिमाका) :* नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत विशेष माहिती नोंदणी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कोणतेही नागरिक अथवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले असतील किंवा त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण अथवा हॉटेल, प्रवासाच...

सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

  सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन   बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडॉप्टेरा लिटुरा), उंट अळी, घाटे अळी आणि केसाळ अळी यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने केले आहे.   पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील कोष नष्ट करावेत. मुख्य पिकाभोवती एरंडी किंवा सूर्यफुलाची एक ओळ सापळा पीक म्हणून लावावी. पिकाची नियमित पाहणी करून अंड्यांचे पुंजके तसेच समूहाने आढळणाऱ्या लहान अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेत तणमुक्त ठेवून संतुलित खत व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे.   पतंगांच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध (फेरोमोन) सापळे लावून त्यामध्ये स्पोडोल्युअर किंवा हेलील्युअर प्रलोभकाचा वापर करावा. भक्षक पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रति एकर ८ ते १० पक्षीथांबे उभारावेत...