पत्रकार परिषद; केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची उपस्थिती
बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज बुलढाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेनंतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीतील विविध निर्णय आणि योजनांचा आढावा घेण्यात आला. देशाची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल व्यवहार व्यवस्था आणि जनकल्याणकारी योजनांमध्ये झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एअर स्ट्राइक यांसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित निर्णयांचा उल्लेख करण्यात आला. डिजिटल व्यवहार क्षेत्रात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीने देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ दिल्याचे स...