Posts

डाक सेवेतील तक्रारींच्या निवारणासाठी 8 जून रोजी डाक अदालत

  बुलढाणा दि.25 (जिमाका): पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 8 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.   देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठवि...

नवीन कामगार संहितांवरील मसुद्याबाबत हरकती व सूचना मागविल्या

  बुलढाणा दि.25 (जिमाका): भारत सरकारने दिनांक २१ डिसेंबर २०२५ पासून नवीन चार कामगार संहिता (Labour Codes) अंमलात आणल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनाने औद्योगिक संबंध संहिता-२०२०, वेतन संहिता-२०१९, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता-२०२० तसेच सामाजिक सुरक्षा संहिता-२०२० या संहितांचे मसुदे अधिसूचनेद्वारे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केले आहेत. या मसुद्यांबाबत औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दुकाने व आस्थापना, मालक संघटना तसेच संबंधित घटकांनी आपल्या हरकती अथवा सूचना सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. हरकती अथवा सूचना मा. कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच mh.labourcodes@gmail.com या ई-मेल आयडीवरही सूचना पाठविता येणार आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत म्हणजेच दि. १२ जून २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी हरकती/सूचना सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

आयुष्यमान व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिम प्रभावीपणे राबवा; सर्व विभागाने समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन * २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम

Image
          बुलढाणा, दि. 25 (जिमाका): आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी युद्धस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत आयुष्यमान कार्डचा लाभ पोहोचावा यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग व पंचायत विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले तसेच ऑनलाईनव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरावर जनजागृती, विशेष शिबिरे आणि विभागीय समन्वय वाढविण्याच्या सूचना देण्यात आल...

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण अभियान सुरू; ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार; राज्यातील ९.८६ कोटी मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी

  बुलढाणा दि.25 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला असून राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. राज्यात मागील दोन दशकांपासून केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण होत होते. विशेष सखोल पुनरिक्षण मात्र २००२-०४ नंतर झालेले नव्हते. दरम्यानच्या काळात शहरीकरण, स्थलांतर आणि नव्या नोंदणीमुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा त्रुटी निर्माण झाल्याची शक्यता लक्षात घेऊन ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. संविधानाच्या कलम ३२६ नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानुसार मतदारांच्या नागरिकत्वाची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगावर आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० म...

जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; 18 लाख 83 हजार लिटर इंधन दाखल अफवांवर विश्वास ठेवू नका, अतिरिक्त खरेदी टाळा : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Image
  बुलढाणा, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दि. 25 मे 2026 रोजी विविध ऑईल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण 18 लाख 83 हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवू नये आणि गरजेपुरतेच पेट्रोल-डिझेल खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.   प्राप्त माहितीनुसार, भारत पेट्रोलियम (BPCL) कडून 1 लाख 10 हजार लिटर पेट्रोल व 3 लाख 50 हजार लिटर डिझेल, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) कडून 1 लाख 40 हजार लिटर पेट्रोल व 4 लाख 3 हजार   लिटर डिझेल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) कडून 4 लाख 50 हजार लिटर पेट्रोल व 4 लाख 30 हजार लिटर डिझेल प्राप्त झाले आहे, असे एकूण जिल्ह्याला पेट्रोल 7 लाख तर डिझेल 11 लाख 83 हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. पुढील काळातही दररोज इंधन साठा जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याचे प्रशासना...

जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर अचानक भेट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन • थेट पंपांवर जाऊन केली इंधन साठ्याची प्रत्यक्ष तपासणी • साठेबाजी करणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा

Image
  बुलढाणा, दि. २३ (जिमाका): जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा असल्याच्या चर्चा आणि नागरिकांमधील संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी आज स्वतः ‘ॲक्शन मोड’मध्ये येत जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना अचानक भेटी दिल्या. या आकस्मिक तपासणीदरम्यान त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्ध साठ्याची तसेच पुरवठा साखळीची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. नागरिकांना इंधन खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. गेल्या काही दिवसांत इंधन पुरवठ्याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या विविध अफवांमुळे जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय शहरातील आणि मुख्य महामार्गावरील प्रमुख पेट्रोल पंपांना भेटी दिल्या. त्यांनी थेट पंपावरील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि ‘स्टॉक रजिस्टर’ची सखोल तपासणी केली. तसेच, प्रत्यक्ष भूगर्भातील टाक्यांमध्ये (Underground Tanks) किती इंधन शिल्लक आहे, याची मोजणी करून घेण्याचे न...

शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन देण्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे निर्देश जिल्ह्यात इंधनाचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट फौजदारी कारवाई > * ​पेट्रोल पंपांवर 'संयुक्त नियंत्रण पथके' तैनात > * ​सोशल मीडियावरील अफवांवर प्रशासनाची कडक नजर

Image
  ​बुलढाणा, दि.23 (जिमाका): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढे इंधन प्राध्यान्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले आहे. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी इंधनाचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक आदेश जारी केले आहेत. "सध्याच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ट्रॅक्टर, पाण्याचे पंप इत्यादींसाठी डिझेल व पेट्रोलची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ते इंधन प्राधान्याने व सुलभतेने मिळेल याची खात्री करावी, यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन (Micro Planning) करावे", असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत.  जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर इंधनाचा (पेट्रोल/डिझेल) तुटवडा निर्माण होणार असल्याबाबतच्या अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊन पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परिणामी, जिल्ह्यात इंध...