घटनेने दिलेला न्याय तळागाळापर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य - न्यायमूर्ती अनिल किलोर
घटनेने दिलेला न्याय तळागाळापर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य - न्यायमूर्ती अनिल किलोर ▪️ अमडापूर येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद · 113 कोटी रुपयांचे लाभ वितरण बुलढाणा (जिमाका), दि. 8: भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक मूलभूत अधिकार दिले आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत हे अधिकार आणि विधी सेवा पोहोचत नाहीत. शासन आपल्या दारी प्रमाणेच न्याय आपल्या गावी पोहोचवणे हे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे आणि सजग नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले. चिखली तालुक्यातील अमडापूर येथील श्री क्षेत्र बल्लाळाई संस्थान परिसरात आयोजित ‘ विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्या’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी से...