Posts

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या बुधवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत ‘प्रवासी राजा दिन’ व दुपारी 3 ते 5 या वेळेत ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाच्या कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे. परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तत्काळ निराकरण करतील.   बुलढाणा विभागातील चिखली आगार येथे दि. 29 एप्रिल, खाम...

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान

  बुलढाणा दि. 23 (जिमाका): महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्या वतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यात मतदान प्रक्रिया रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महिला रुग्णालय, टी.बी. हॉस्पिटल परिसर, धाड रोड, बुलढाणा येथे मतदान होणार आहे. सदर निवडणूक प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी तसेच नोंदणीकृत डॉक्टर हे मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकूण २ हजार ६३५ मतदार असून प्रत्येक मतदाराला एकूण ९ मते देण्याचा अधिकार आहे. मतदारांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून एकूण ४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व केंद्रे लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स परिसरातच उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया ही गुप्त पद्धतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम १९६७ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (पहिली सुधारणा) नियम २००२ मधील तरतुदीनुसार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदान प्रक्र...

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

Image
  बुलढाणा दि. 23 (जिमाका): केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार व निर्देशांकांच्या आधारे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या मुल्यांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरीवर आधारित होते. या यशामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक (आरोग्य सेवा) अकोला मंडळ डॉ. सुशिल वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी प्रभावी कामगिरी बजावली. दरम्यान, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्याच्या या यशामुळे क्षयरो...

विशेष लेख : उन्हाळ्यातील जनावरांचे चारा व पाणी व्यवस्थापन

Image
  उन्हाळ्यातील कडक उन्हाचा आणि वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. या काळात जनावरांना 'हीट स्ट्रेस' (उन्हाचा ताण) जाणवतो, ज्यामुळे दूध उत्पादनात घट आणि आजार वाढतात. यासाठी खालीलप्रमाणे चारा आणि पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन :   उन्हाळ्यात जनावरांच्या शरीरातील पाण्याची गरज ५०% पर्यंत वाढते. त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी चोवीस तास उपलब्ध असावे. जर चोवीस तास पाणी देणे शक्य नसेल, तर दिवसातून किमान ५ ते ६ वेळा पाणी पाजावे. विशेषतः पहाटे आणि रात्री उशिरा भरपूर पाणी द्यावे.   पिण्याच्या पाण्याची टाकी सावलीत असावी जेणेकरून पाणी गरम होणार नाही. गरम पाणी जनावरे कमी पितात. चारा व्यवस्थापन : भर दुपारी जनावरांना चारा देणे टाळावे. उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावते. त्यामुळे चारा देण्यासाठी पहाटे सकाळी ६ पूर्वी आणि रात्री ९ नंतर या वेळा निवडाव्यात. नुसता वाळलेला चारा देऊ नये, त्यामुळे जनावरांना बद्धकोष्टतेचा त्रास होऊ शकतो. हिरवा व वाळलेला चारा ३:१ या प्रमाणात कुट्टी करून द्यावा. हिरव्या चाऱ्याची टंचाई असल्यास...

बुलढाणा जिल्ह्याला १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१ उपकेंद्रांची भेट; आरोग्य यंत्रणेने सकारात्मक भावनेतून जनसेवा करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Image
    बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जिल्ह्यात लवकरच १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५१ नवीन उपकेंद्र सुरू करण्यात येतील. आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा असून ती पुण्याचं काम म्हणून सकारात्मक भावनेतून करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक डॉ. सुशिल वाकचौरे, सहसंचालक पीपीटी डॉ.प्रसाद भंडारी, सहसंचालक डॉ. बाळासाहेब सोणवने, सहसंचालक डॉ.सुनिता गोलाईत, सहसंचालक पुणे डॉ. राजरत्न वाघमारे, अति.संचालक मुंबई डॉ. किरणकुमार वाघमारे,उप...

पशुधनासाठी १९६२ हेल्पलाईन ठरतेय जीवनवाहिनी; वर्षभरात ६४ हजार जनावरांना मिळाले जीवदान

    बुलढाणा दि. 22 (जिमाका ): पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेली '१९६२' ही टोल फ्री हेल्पलाईन आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना त्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर' मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.     पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. विशेषतः दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून त्यांच्यासाठी ही सेवा खऱ्या अर्थाने 'लाईफलाईन' ठरली आहे. अपघात, विषबाधा किंवा कठीण प्रसूती अशा आपत्कालीन स्थितीत कॉल आल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथ...

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

      बुलढाणा दि.22 (जिमाका): भारतीय हवामान विभागाने २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीचे निर्देश दिले आहेत.   राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते आणि पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या दर्जेदार चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश 'महाबीज' अकोला यांना ५ मे २०२६ पूर्वी देऊन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.   मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील पशुधनाची संख्या विचारात घेऊन स्वतंत्र 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा...