आला उन्हाळा.. तब्येत सांभाळा
आला उन्हाळा.. तब्येत सांभाळा • उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे नागरीकांना आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.31 : राज्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटेपासून व उष्माघातापासून बचाव करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे. भारतीय हवामान खाते, नागपूर अंदाजानुसार 2 एप्रिल 2022 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मध्य, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रभाव जाणवत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची संभावना असते. मात्र जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आताच जाणवू लागला आहे. उष्माघाताचा परिणाम होऊ नये,यासाठी सर्व जनतेनी आतापासूनच जागृत राहीले पाहीजे, रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे. उष्माघातापासून बचावासाठी काय करावे : पुरेसे पाणी पित रहावे, तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, केवळ हलक्या रंगाचे सुती कपड्यांचा वापर करावा, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वा...