Posts

Showing posts from May, 2018

केंद्रीय पथकाने घेतला बोंडअळी नुकसानीचा आढावा

शेतकऱ्यांशी चर्चा करुन घेतली माहिती बुलडाणा, दि 17:-  मागील खरीप हंगामात    बोंडअळीमुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एन डी आर एफ कडून सुध्दा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार आज   17 मे 2018  रोजी  केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतक-यांशी चर्चा करून बोंडअळीचा आढावा घेतला. पथकाने सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगांव माळ व दे. राजा तालुक्यातील भिवगांव येथे भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ शशिकांत खेडेकर उपस्थित होते.    बोंडअळीग्रस्त    शेतक-यांना    शासनाने नुकतीच जिल्ह्यासाठी पहील्या टप्प्यात 35 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एन डी आर एफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले आहे. पथक तेथील शेतक-यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेत...

खेलो इंडीया अंतर्गत आयोजीत होणाऱ्या मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

बुलडाणा, दि. 16 :  भारत सरकार यांचे युवक सेवा व क्रीडा मंत्रालयातंर्गत पुनरुज्जीवीत खेलो इंडीया राष्ट्रीय खेल विकास कार्यक्रमानुसार क्रीडा व सामुहिक सहभागामध्ये उत्कृष्टतेचे नवे राष्ट्रीय उध्दीष्ट साध्य करण्याकरीता शासनाने ही योजना सुरु केली आहे.   पुनरुज्जीवीत खेलो इंडीया या योजने अंतर्गत देशात खेळाचा वाढ व विकास करणे त्यामध्ये सामुदायिक प्रशिक्षणाचा विकास या मुदयाचा समावेश आहे. समाजातील प्रशिक्षणाचा विकास ज्याद्वारे शारिरीक शिक्षण, शिक्षक/स्वयंसेवक यांना विकसीत करणे जेणेकरुन त्यांचेद्वारे प्रशिक्षणार्थींचा स्वत:च्या स्थानिक विभागातील किंवा राज्यातील लोकप्रिय क्रीडा प्रकाराद्वारे खेळाचा विकास होण्यास मदत होणार आहे.   त्या अनुषंगाने खेलो इंडीयाद्वारे सदर योजने अंतर्गत 2 एप्रिल 2018 ते 28 जानेवारी 2019 या दरम्यान मास्टर्स ट्रेनर्स करीता एकुण 15 प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे, सदर शिबीरासाठी ग्वाल्हेर व गुवाहाटी या ठिकाणी एकुण 100 प्रशिक्षकांची एक बॅच या प्रमाणे एकुण 15 प्रशिक्षण शिबीरे आयोजीत करण्यात आलेली आहेत. प्रत्येक प्रशिक्षण शिबीराचा कालावधी 15...

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा - विभागीय आयुक्त

Image
घरकूल, धडक विहीर, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे विषयांचा आढावा जलयुक्तमधील अपूर्ण कामे मे अखेर पूर्ण करावी जिओ टॅगिंग पूर्ण करावे, कार्यारंभ आदेशानंतर त्वरित काम सुरु करावे बुलडाणा, दि‍ . 11  -     राज्य व केंद्र शासन विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाचा पूर्ण विकास होवून तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे. शासनाचे हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी  शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही केली पाहिजे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज दिल्या.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध शासकीय उपक्रमांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र. जिल्हाधिकारी षण्मुखराजन,उपायुक्त शहाजी पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल साकोरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमो...

आहे उन्हाळा.. तब्येत सांभाळा

·          उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे नागरीकांना आवाहन बुलडाणा, दि.9 :  राज्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटेपासून  व  उष्माघातापासून बचाव करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे. हवामान विभागाने यावर्षी उष्णतेच्या लाटेची सुरूवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच 2018 मध्ये उष्णतेची लाट दिर्घकाळापर्यंत असण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.    सर्वसाधारपणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मध्य, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रभाव जाणवत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची संभावना असते. मात्र जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आताच जाणवू लागला आहे.  उष्माघाताचा परिणाम होऊ नये,यासाठी सर्व जनतेनी आतापासूनच जागृत राहीले पाहीजे, रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे. उष्माघात    होण्याची सर्वसाधारण कारणे : ...

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर

·         मृग बहारातील संत्रा , मोसंबी , डाळींब , पेरू व चिकू फळपिकांचा समावेश ·         शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन ·         पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहभाग बंधनकारक       बुलडाणा , दि.3 : प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2018-19 करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू व चिकु या पाच फळ पिकांसाठी मिळणार आहे. योजनेद्वारे कमी/जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.   फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.   अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे ( कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह ) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे...

जिल्ह्यात 11 ठिकाणी अवैध सावकारीविरोधात झडती पथकाची कारवाई

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अन्वये कारवाई झडती पथकामध्ये 79 अधिकारी/कर्मचारी नियुक्ती    बुलडाणा ,  दि. 3 :  जिल्ह्यात कथीत अवैध सावकारी व्यवसायाबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयास 6 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीकरीता महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये संबधीत गैरअर्जदारांच्या ठिकाणांवर सहकार विभागाच्या झडती पथकाने आज धाडी टाकीत कारवाई केली. यामध्ये खामगांव तालुक्यात 3, चिखली 3, नांदुरा 3, जळगाव जामोद 1 व शेगांव तालुक्यातील एका करवाईचा समावेश आहे.  या सदर कारवाईसाठी सहकार विभागाच्या प्रशासन  व लेखा परीक्षण शाखेतील जिल्ह्यामधील 70 अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे 9 कर्मचारी आहेत. अशाप्रकारे एकूण 79 अधिकारी/कर्मचारी या पथकामध्ये होते.    सदर पथकांसोबत शासकीय पंच म्हणून स्थानिक तहसिल कार्यालयातील कर्मचारी होते. तर संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी यांचा समावेशही पथकामध्ये होता. खामगांव येथे तीन पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित गैरअर्जदार ...

राज्याचा 58 वा स्थापना दिवस थाटात

Image
जिल्ह्याच्या समृद्धीसाठी विकास प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा - पालकमंत्री जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2 हजार 461 कामे पूर्ण पाणी टंचाई निवारणार्थ 939 गावांमध्ये 1472 उपाययोजना उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी मोहिम आजपासून डिजीटल स्वाक्षरी 7/12 चे वितरण 3 हजार 748 शेततळी पूर्ण , रस्त्यांचा विकास गतीने सुरू बुलडाणा, दि‍ .1 - राज्य शासन विविध विभाग व अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेचे कल्याण साधण्याचे काम करीत असते. यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत घटकांचादेखील सहभाग असतो. शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी सर्वां चा   विक्रास प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.     महाराष्ट्र राज्याचा 58 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा   पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रस...