Posts

Showing posts from April, 2018

जिल्ह्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविणार..

·         30 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये माहिती देण्याचे आवाहन ·         लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलनासाठी मोहिम   बुलडाणा,दि.27 : जिल्ह ्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविण्यात येणार आहे.   सदर अभियान यशस्वी करण्यासाठी व लाभार्थ्यांपर्यंत परिणामकारक रितीने पोहोचविणेकरीता योजनेच्या तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक रितीने राबविणेकरीता प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे. त्याची पहिली पायरी म्हणून सध्या सुरू असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान 30 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा केल्या जाणार आहे. या दिवशी आयोजित ग्रामसभांमधून लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. याकरीता 21 मे 2018 पर्यंत जिल्ह्यात मोहिमच राबविण्यात येणार आहे.    या मोहिमेत योजनेचा लाभाबद्दल माहिती देणे, विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण करणे व जेथे ग्रामसेवक, एएनएम व आशा आहेत तेथे त्यांच्या माध्...

जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका जाहीर

·          नामनिर्देशन पत्र 7 ते 12 मे दरम्यान दाखल करता येणार ·          27 मे 2018 रोजी मतदान ·          72 जागांसाठी होणार मतदान, आदर्श आचारसंहीतेचे काटेकोर पालन करावे बुलडाणा,  दि. 24 :  राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील माहे  जुन  ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 39 ग्रामपंचायतींच्या 72 रिक्त पदांकरीता पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या ग्रामपंचायतींमध्ये 23 एप्रिल 2018 च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.   आयोगाच्या आदर्श आचार संहीता त्या-त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहीता कालावधीत कुठेही करता येणार नाही.   निवडणूकीची अधिसूचना 27 एप्...

सिंचनाची मिळतील गोड फळे.. शेतात घ्यावे शेततळे..!

Image
·          भोसा ता. मेहकर येथील प्रभाकर खुरद यांची शेततळ्यावर फळबाग लागवड ·          शेततळ्याच्या पाण्यावर संरक्षित सिंचन ,  सेंद्रीय कलिंगडाचेही उत्पादन    बुलडाणा, दि. 21 :    सिंचनाची मिळतील गोड फळे.. शेतात घ्यावे शेततळे.. या उक्तीचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात भोसा येथे येत आहे. या उक्तीनुसार भोसा येथील शेतकरी प्रभाकर खुरद यांनी शेततळ्याच्या पाण्यावर तब्बल 30 एकरावर फळबाग लागवड केली आहे. राष्ट्रीय फळबाग मिशन अंतर्गत 45 बाय 45 आकाराचे शेततळ्याचे निर्माण त्यांनी केले आणि कायापालट झाला.  सन 2016-17 या आर्थिक वर्षात शेततळ्याची निर्मिती झाली व त्यांचे जीवनमान समृद्धीच्या मार्गावर वेगाने धावू लागले.    राष्ट्रीय फळबाग मिशनच्या शेततळ्यावर आज 30 एकर शेतावर डाळींब, संत्र्याची फळबाग ते घेत आहेत. त्याचप्रमाणे सेंद्रीय पद्धतीने कलिंगडाची लावगड करून लाखो रूपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. शेततळ्यापूर्वी केवळ 1200 संत्रा झाडे असणाऱ्...

प्रशासकीय सेवेत सामान्यांची सेवा करण्याची संधी - प्रमोदसिंह दुबे

Image
प्रशासकीय सेवेत सामान्यांची सेवा करण्याची संधी -           प्रमोदसिंह दुबे ·          नागरी सेवा दिन साजरा बुलडाणा ,  दि . 21   :  प्रशासनात कार्य करणारा प्रत्येक जण अधिकारी व कर्मचारी यांच्या रूपामध्ये लोकसेवक आहेत. लोकसेवकाचे काम अन्यायग्रस्त व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत विकास पोहोचवि‍णे आहे. राज्यसरकार विविध योजनांच्या माध्यमातुन जनकल्याणाचे कार्य करते. हया योजना यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असते. या योजनांच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची संधी प्रशासनातील सेवेमुळे मिळते, असे प्रतिपादन  अप्पर  जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज 21 एप्रिल 2018 रोजी नागरी सेवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर निवासी उपजिल्हाधिकारी  ललीत वराडे. , जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. चव्हाण, प्र. उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, जिल्हा पुनर्वसन अधिक...

चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील भिक्षेकरी मुलांचे केले पुनर्वसन

Image
महिला व बाल संरक्षण विभागाच्यावतीने भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन ·         रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम ·         चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील भिक्षेकरी मुलांचे केले पुनर्वसन   बुलडाणा, दि. 20 : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत भिक्षेकरी मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम सुरू केली आहे. रस्त्यावरील भिक मागणाऱ्या मुलांना पकडून त्यांच्या पुढील उज्जवल भविष्यासाठी प्रथमत: त्यांच्या कुंटूबात, कुटूंब नसल्यास बाल गृह व निरीक्षण गृहात पुनर्वसन केल्या जाते. चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील कुटूंबात वय वर्ष 3-6 वयोगटातील मुले सिल्वासा (दादर नगर हवेली ) सिल्वासा येथे   एससीपीएस, आयसीपीएस व डिसीपीयु अंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी यांना भिक मागताना आढळले.   त्यानंतर त्यांनी या मुलांना बुलडाणा येथे आणून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा य...

कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जासाठी 1 मेपर्यंत मुदतवाढ

कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जासाठी 1 मेपर्यंत मुदतवाढ अर्ज सादर न करू शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी एकरकमी कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 30 जूनपर्यंत मुदत    बुलडाणा,दि. 16 :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – 2017 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली असून अर्ज सादर करण्यास 1 मे 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.    तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेत अर्ज सादर करण्यास 30 जुन 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.     त्यानुसार सदर अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पुरविण्याबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा   http://csmssy.mahaonline.gov.in   या पोर्टलवर...