Posts

Showing posts from June, 2017

NEWS 29.6.2017 DIO BULDANA

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात 3 जुलै रोजी लोकशाही दिन    बुलडाणा ,   दि.29 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा ,   यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 जुलै 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी , नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.           जिल्ह्यातील शासकीय ,   निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत ,   त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्या...

news 28.6.2017 dio buldana

 ‘ महाराष्ट्र माझा ’   छायाचित्र स्पर्धा जाहीर *             निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन *             पंचवीस ,   वीस व पंधरा हजार रुपयांची पारितोषिके *             तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे बुलडाणा ,   दि.   28 :   महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन ,   ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित   ‘ महाराष्ट्र माझा ’   छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने ...

NEWS 27.6.2017 DIO BULDANA

Image
शासनाच्या कर्जमाफी निर्णयामुळे 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 होणार कोरा - कृषिमंत्री * जिल्हा परिषदेत कर्जमाफीबद्दल सत्कार कार्यक्रम * शेतकऱ्यांना खरीप हंगामात होणार लाभ बुलडाणा, दि.27 - राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील शेतकऱ्यांची 30 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीमुळे शेतकरी आनंदीत झाला असून येणाऱ्या खरीप हंगामात मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयाचे अनेक फायदे होणार आहे. त्यापैकी राज्यातील जवळपास 40 लक्ष शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.    कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पहिल्यांदाच बुलडाणा शहरात आगमन झाले. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री सत्काराला उत्तर देताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प मुख्य क...

news 23.6.2017 DIO BULDANA

Image
खरीप हंगाम 2017 करीता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू 31 जुलै 2017 पर्यंत शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यावा कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक, कापूस व सोयाबिनला 40 हजार रूपये विमा संरक्षण प्रति हेक्टरी कापसाला 2000, तर सोयाबीनला 800 रूपये हप्ता जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी नियुक्त बुलडाणा, दि. 23 -   खरीप हंगाम 2017 साठी जिल्ह्यात प्रधानमंत्री  पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार  पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखून शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती मिळणार आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर य...

news 22.6.2017 DIO BULDANA

अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पं. दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे बुलडाणा, दि.22 -   राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वीत आहे. तर जिल्हास्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह, अथवा पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यापैकी कोणत्याही एका योजनेची निवड करावी .   विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आत www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. स्वयंम योजनेकर...