Posts

Showing posts from November, 2017

news 30.11.2017 dio buldana

Image
ग्रंथालय चळवळ टिकल्याशिवाय नवी पिढी घडणार नाही                                                      -  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर   * जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन  शतायुशी ग्रंथालयांचा सन्मान दोन दिवसीय ग्रंथोत्सव         बुलडाणा, दि. 30 :       देशात आणि राज्यात ग्रंथालय चळवळ अतिशय जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही कायम आहेत. या ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढील देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही.  त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केली.  ...

news 23.11.2017 dio buldana

नवमतदारांना मिळणार स्मार्ट ओळखपत्र…! ·         30 नोव्हेंबर 2017 पर्यंत विशेष मोहिम ·         सहस्त्रक मतदार म्हणून होणार गौरव बुलडाणा, दि. 23 :   संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 15 ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान बीएलओ घरोघरी जावून मतदार यादीत नाव नोंदविणे व अन्य मतदारासंबंधी कामे करणार आहे. सदर बीएलओ घरी आल्यानंतर त्यांना सहकार्य करून आपले नाव मतदार यादीत नसल्यास ते नोंदवावे. तसेच बीएलओ 1 ते 8 नमुन्यांची माहिती संकलीत करून ऑनलाईन मोबाईल ॲपवर अपलोड करणार आहे. या नव मतदारांना स्मार्ट मतदान ओळखपत्र देण्यात येणार आहे.    या कार्यक्रमादरम्यान 21 व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2000 रेाजी जन्म झाला व 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्ष पुर्ण करीत असलेल्या मतदारांना सहस्त्रक मतदार अर्थात मिलेनीयम वोटर्स म्हणून संबोधण्यात येणार आहे. जे मतदार सहस्त्रक मतदार म्हणून नोंदणी करतील अशा मतदारांचा घरोघरी जावून बीएलओ सत्कार करणार...

news 20.11.2017 dio buldana

Image
वझर येथील बंधाऱ्यातील पक्ष भिंतीजवळील खडकांमधील नैसर्गिक भेगांमधून झिरपा झिरपा पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजूने नाल्यामध्ये, वझर येथील चारही बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा बुलडाणा , दि.20 -   जलयुक्त शिवार अभियानातंर्गत खामगांव तालुक्यातील वझर येथील पश्चिमेकडील नाल्यावर क्रमांक 1 व 2 बंधारा निर्माण करण्यात आला आहे. तर बोर्डी नदीवर क्रमांक 3 व 4 बंधाऱ्याचे बांधकाम झालेले आहे. अशाप्रकारे एकूण चार बंधारे वझर शिवारात आहे. या चार बंधाऱ्यापैकी क्रमांक 1,2 व 3 चे बांधकाम मार्च 2016 मध्ये आणि बंधारा क्रमांक 4 चे काम नोव्हेंबर 2016 मध्ये पूर्ण झालेले आहे. या सिमेंट नाला बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आलेला आहे.  येथील बंधाऱ्यांची कामे गुणनियंत्रण यंत्रणेकडून झालेल्या संधानकाचे कामाचे चाचणी अहवाल प्राप्त आहेत. जिगांव उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली असता बंधाऱ्यांच्या भिंतीमधून कुठल्याही प्रकारचा झिरपा येत नसल्याचे निदर्शनास आले. मात्र नाल्यातील झिरपा हा पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजुने कठीण खडकाला असलेल्या नैसर्गिक भेगांमधून होत असल्याचे निदर्शनास आले आहे.     ...

news 18.11.2017 dio buldana

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर 24 नोव्हेंबर पर्यंज अर्ज स्वीकारणार युवकांनी स्वयंरोजगारासाठी योजनेचा लाभ घ्यावा बुलडाणा , दि.1 8 -   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाला सन 2017-18 आर्थिक वर्षाकरीता उद्दिष्ट प्राप्त झाले  आहे. सदर उद्दिष्ट व्यावसायिक प्रशिक्षण योजनेतंर्गत देण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं 6 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, बुलडाणा यांच्याकडे सादर करावीत.    अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र व इच्छूक उमेदवारांची निवड व्यवसाय प्रशिक्षण योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी मात्र मातंग व चर्मकार संवर्गातील सर्व जाती व त्यामध्ये येणारे सर्व उपजातीचे लाभार्थी पात्र असणार नाही.  योजनेसाठी अर्जदार हा जिल्ह्याचा रहीवासी असा...

jalyukt shivar succes story

Image
           यशकथा : जलयुक्त पावले… ‘साखरखेर्ड्या’चे शिवार फुलले भूजल पातळीत वाढ तलांवामधील गाळ काढून जलसाठ्याचे निर्माण     बुलडाणा, दि. 6 : जिल्ह्यातील अर्वषण ग्रस्त तालुका असलेला सिंदखेड राजा. कायम पाणीटंचाईने ग्रासलेला.. त्यातही साखरखेर्डा परीसर कायम पाणीटंचाईग्रस्त. अशा टंचाईग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी या भागात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. 26 हजार लोकसंख्येचे मोठे गाव असलेल्या साखरखेर्डा गावाचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. या कामांमुळे परिसरात पडून वाहत जाणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरत आहे. परिणामी विहीरींची पाणी पातळी वाढून रब्बी हंगाम शेतकरी घेत आहे.    एवढ्या मोठी लोकसंख्या असलेल्या गावच्या पाणी पुरवठ्याची समस्या जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे निकाली निघण्यास यश मिळाले आहे. गावाला ऐतिहासिक व पौराणिकदृष्ट्या महत्वसुद्धा लाभलेले आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गाय...