तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचे भारताचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दुबई येथे झाले उद्घाटन...!
Ø आयुष
हा जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत आहे
- प्रतापराव जाधव
बुलढाणा, दि.16(जिमाका) : आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी
आणि होमिओपॅथी पद्धतींचा विकास व जागतिक प्रचार
प्रसारात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आज आयुष केवळ राष्ट्रीय मर्यादेत
सीमित नसून, जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास
आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले
तिसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद
व प्रदर्शनीचे आयोजन दुबई येथे करण्यात आले
आहे. या परिषदेचे उद्घाटन दि.15 फेब्रुवारी भारताचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव
जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला
यूएईमधील भारताचे राजदूत डॉ. दीपक मित्तल,
दुबई हेल्थ ऑथॉरिटीचे महासंचालक
हिज एक्सलन्सी डॉ. अल्वी अलशेख अली, दुबईतील भारताचे कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवान,
आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. ईसा
एम. फतकी आदी उपस्थित होते. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनीच्या उद्घाटनाचा
सन्मान मला मिळत आहे, ही माझ्यासाठी भारतासाठी
अभिमानाची बाब असल्याचे सांगून भारत सरकार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आज पारंपरिक
ज्ञानपरंपरा आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या केंद्रस्थानी पोहोचला असल्याचे त्यांनी
सांगीतले. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समतोलाची
संपूर्ण अवस्था होय, जी निसर्गाशी संतुलन राखून साध्य होत असल्याचे त्यांनी सांगीतले
.
दुबई येथील आयुष परिषद ही प्रत्येक
वर्षी अधिक लोकप्रिय होत असल्याचे पाहून मला मनस्वी आनंद होत आहे.IACE च्या या तिसऱ्या
परिषदेत 1 हजाराहून अधिक नोंदणीकृत प्रतिनिधी,
सुमारे 100 प्रदर्शक आणि विक्रमी संख्या असलेले अभ्यागत सहभागी झाले आहेत. हे आयुष
पद्धती आणि एकात्मिक आरोग्य सेवांबद्दल वाढत्या जागतिक उत्सुकतेचे प्रतीक असल्याचे
त्यांनी म्हटले आहे .
संयुक्त अरब अमिराती सरकार आणि
दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
या तिसऱ्या IACE चे विषय – “मन
आणि शरीराच्या आरोग्यासाठी आयुष उपचार” – समकालीन आणि जागतिक पातळीवर अत्यंत सुसंगत आहे.
आज जग वाढता ताण, मानसिक आरोग्य
समस्या आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत आयुष पद्धती
स्वीकारार्ह उपाय प्रदान करतात आणि शरीर, मन व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित
करत असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य चर्चेत आज प्रतिबंधात्मक,
सर्वसमावेशक (होलिस्टिक) वेलनेस आणि एकात्मिक आरोग्यसेवेवर अधिक भर दिला जात आहे. या
क्षेत्रात आयुषकडे शतकानुशतकांचे लिखित ज्ञान व आधुनिक वैज्ञानिक प्रमाण आहे.
या परिषदेत “मन
व शरीराच्या आरोग्यासाठी आयुष उपचार” या विषयावरील मसुदा श्वेतपत्रावर (Draft White
Paper) आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा होत आहे. या श्वेतपत्राचा उद्देश
शारीरिक, मानसिक आणि मानस-सामाजिक आरोग्यासाठी पुराव्यावर आधारित आयुष उपचारांची सुसंगत
मांडणी करणे हा आहे.
मला विश्वास आहे की अंतिम स्वरूप
दिल्यानंतर हे श्वेतपत्र जागतिक धोरण निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल आणि एकात्मिक
आरोग्य क्षेत्रातील सरकारे, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था व आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी
ज्ञानसंग्रह (Knowledge Repository) म्हणून कार्य करेल.डिसेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली
येथे पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या WHO जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. हा जागतिक
आरोग्य व्यवस्थेत पारंपरिक वैद्यक समाविष्ट करण्याच्या दिशेने ऐतिहासिक टप्पा ठरला.
दिल्ली घोषणापत्राच्या स्वीकारामुळे
पुराव्यांची निर्मिती, सुरक्षितता मानके आणि जबाबदारीपूर्वक पारंपरिक वैद्यक समाकलनाबाबत
जागतिक बांधिलकी दृढ झाली आहे. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत जाहीर झालेल्या मुक्त
व्यापार करारामुळे आयुष उत्पादने, आरोग्य सेवा, शिक्षण आणि संशोधन भागीदारीसाठी नवीन
संधी निर्माण झाल्या आहेत.या संधींचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपल्याला नियामक अनुपालन,
गुणवत्ता मानके, फार्माकोपियल अनुरूपता आणि जागतिक प्रमाणन अधिक बळकट करणारे आहे.
दुबईचे जागतिक स्थान लक्षात
घेता, ही परिषद व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य आयुष
सेवा आणि वैद्यकीय पर्यटनाचा विस्तार 2002 मध्ये TCAM अंतर्गत आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी
आणि नैसर्गिक उपचारांना यूएईने दिलेली मान्यता ही सहकार्याची मजबूत पायाभरणी असल्याचे
त्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या अलीकडील अर्थसंकल्पीय
घोषणांमुळे आयुष क्षेत्राबाबतची बांधिलकी स्पष्ट होते.
अशा प्रकारच्या परिषदांमुळे
ज्ञाननिर्मिती, वैज्ञानिक संवाद आणि भविष्यातील धोरणात्मक आराखड्यांना दिशा मिळत आहे
.भारत सर्व भागीदार देशांसोबत एकात्मिक, सशक्त आणि शाश्वत जागतिक आरोग्य व्यवस्था निर्माण
करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी यावेळी केले.
पुढील तीन दिवसांत होणाऱ्या
चर्चा वैज्ञानिक सहकार्य वाढवतील, भागीदारी बळकट करतील आणि आयुषला जागतिक आरोग्य क्षेत्रात
विश्वासार्ह व पुराव्याधारित योगदानकर्ता म्हणून स्थापित करतील, असा विश्वास भारताचे
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केला
00000









Comments
Post a Comment