भरती परीक्षांच्या सुधारणांसाठी टास्क फोर्सचा आज अमरावतीत संवाद
बुलढाणा, दि.16 (जिमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि
उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स उद्या, गुरुवार
१७ सप्टेंबर रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे विद्यार्थी, स्पर्धा
परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट
संवाद साधणार आहे.
नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय
amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
अमरावती विभागात १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथे संवाद होणार असून टास्क फोर्सच्या
या संवाद भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक
संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय
जाणून घेतले जाणार आहेत.
या
विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास
करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे
बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था
अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.
०००००
Comments
Post a Comment