बुलडाणा, दि. 20(जिमाका) : कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग बुलडाणा कार्यालयाकडून दि.26 सप्टेंबर 2023 रोजीचे पत्रान्वये धानोरी.क्र.(10.22 हेक्टर), कनका बु. (4.055 हेक्टर), घारोड क्र.1 20.13 हेक्टर, भुमराळा पाझर तलाव 4.21 हेक्टर हे तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी ठेक्याने देण्यासाठी नव्याने हस्तांतरित झाले असून, हे तलाव सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांसाठी मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार आहेत. या तलावांच्या निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव मागणी अर्ज 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत. शासन निर्णय अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका वाटप समितीचे मान्यतेने तलाव, जलाशय देण्याचे प्रस्तावित आहे. हे तलाव ठेका प्रक्रियेसाठी अटी-शर्तींची पुर्तता तलाव, जलाशयावर नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. तलाव ठेका नमुना-1 तलाव ठेका मागणीबाबतचा संस्थेचा ठराव व अर्ज,...
राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी.एल स्थूल यांचा दौरा बुलडाणा , दि .9 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी.एल स्थूल शनि वार, दि. 10 जून 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 10 जून 2017 रोजी सकाळी 6.08 वाजता मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामभवन बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 7.30 वाजता मोटारीने शासकीय विश्राम भवन बुलडाणा येथे आगमन, सकाळी 9 वाजता सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचेसोबत रूईखेड मायंबा येथील पिडीत महिलेसोबत चर्चा व शासकीय मदत, अन्य बाबींवर चर्चा, सकाळी 11 वाजता बुलडाणा येथून मोटारीने रूईखेड मायंबा येथे घटनास्थळाला भेट व ग्रामस्थांशी चर्चा, सोयीनुसार चिखली/भोकरदनमार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
बुलढाणा, दि. २९ मे (जिमाका) : राज्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याचे आदेश दि. २५ मे २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले असून हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच संबंधित अद्यावत नियम, परिपत्रके व आदेशांचा विचार करून प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती आणि निवडणूक प्रक्रिया दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कालमर्यादेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण प्रक्रियेत तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा सहभाग राहणार असून, सर्व तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांच्या सभा घे...
Comments
Post a Comment