पावसाळ्यात मासे, खेकड्यांची शिकार टाळा मत्स्य संस्था, मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
पावसाळ्यात मासे, खेकड्यांची शिकार टाळा
मत्स्य संस्था,
मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 14 :
पावसाळी हंगामात जिल्ह्यातील तलाव, जलाशय आणि नद्यांमध्ये गोड्या
पाण्यातील खेकड्यांचे नैसर्गिक प्रजनन मोठ्या प्रमाणावर सुरू असते. मात्र, या
काळात गरोदर मादी खेकडे, अंडी व पिल्ले धारण केलेल्या माशांची शिकार होणे
पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक असल्यामुळे संस्था, मच्छीमारांना केले आहे.
पावसाळी हंगामात खेकडे, विशेषतः
मादी खेकडे पकडणे टाळावे. अशा संवर्धनात्मक उपक्रमामुळे पुढील काळात खेकड्यांचा
साठा वाढून जैवविविधतेचे संतुलन राखण्यास मदत होते.
मच्छीमार बांधवांना आणि मत्स्य सहकारी संस्थांनी पुढाकार घेवून
प्रजनन हंगामात नदीतील मासे व खेकडे यांच्या शिकार टाळून नैसर्गिक संवर्धनाला
हातभार लावावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment