२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री संजय राठोड
• १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह; युवकांच्या सहभागातून जनजागृतीवर भर • १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ • ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन बुलढाणा दि. 12 (जिमाका): माती आणि पाणी ही नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. राज्यातील नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’, तर १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभिय...